शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
4
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
5
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
6
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
7
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
8
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
9
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
10
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
11
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!
12
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
13
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
14
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
15
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
16
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
17
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
18
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
19
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
20
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट

कोल्हापुरात महसुली आयुक्तालय हवेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 06:31 IST

‘लोकमत’ने वारंवार पश्चिम महाराष्ट्रासाठी आता दोन महसुली आयुक्तालयांची गरज आहे, हे लक्षात आणून दिले.

‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीचा १४ वा वर्धापनदिन काल साजरा झाला. त्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि कृषिमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. तेव्हा महाराष्ट्राची महसुली रचना, नगरपंचायतीची स्थापना, वाढते शहरीकरण, आदी विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्राचा भूगोल वाढत नाही किंवा कमी होत नाही; मात्र त्यात बदल खूप होत आहेत. त्याप्रमाणे प्रशासकीय महसुली रचना बदलत नाही किंवा तसे जाणीवपूर्वक प्रयत्न होत नाहीत. संपूर्ण राज्याची प्रशासकीय रचना बदलत नाही. ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि ‘लोकमत’ने वारंवार पश्चिम महाराष्ट्रासाठी आता दोन महसुली आयुक्तालयांची गरज आहे, हे लक्षात आणून दिले.महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. तेव्हा २६ जिल्ह्यांचा महाराष्ट्र होता. पश्चिम महाराष्ट्रात पाच, कोकणात चार, मराठवाड्यात पाच, खानदेशात चार आणि विदर्भात आठ जिल्हे होते. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ अशी पाच महसुली आयुक्तालये होती. त्यामध्ये एकमेव अमरावतीची भर पडली. २६ जिल्ह्यांपैकी काहींचे विभाजन झाले आणि आता ३६ जिल्हे झाले आहेत. कोकणात सात, खानदेशात पाच, विदर्भात अकरा, मराठवाड्यात आठ आणि पश्चिम महाराष्ट्रात पाच जिल्हे आहेत. सर्व महसुली विभागात जिल्ह्यांचे विभाजन होऊन दहा नव्या जिल्ह्यांची भर पडली. पश्चिम महाराष्ट्राचा पुणे विभागीय आयुक्तालय हा एकमेव त्यास अपवाद आहे. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या पाचपैकी एकाही जिल्ह्याचे विभाजन झाले नाही.पुणे महसुली विभागाची लोकसंख्या अमाप वाढते आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या आता एक कोटीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. इतर चार जिल्हेही तगडे आहेत. त्यामध्ये कोल्हापूर हा जिल्हा सर्व पातळीवर प्रगती साधून पुढे येतो आहे. वास्तविक महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांचा (छोटे शेतकरी) जिल्हा आहे. याच जिल्ह्यात आणि कोल्हापूर शहराला विकासाचे पाऊल पुढे टाकण्यासाठी सर्वाधिक संधी आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर वारंवार उपेक्षा होते आहे.पुणे महसूल विभागाचा व्याप प्रचंड आहे. नागरीकरण वाढते आहे. औद्योगीकरणाचा विस्तार वाढत चालला आहे. कृषी क्षेत्रात प्रचंड बदल झाले आहेत. उसाशिवाय द्राक्ष, डाळिंबे, फळभाज्या, आदींची शेती विकसित झाली आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडते. ती अधिक व्यापक करण्याची गरज आहे. ही गरज ओळखून ‘लोकमत’ने अनेकवेळा पुणे महसुली विभागाचे विभाजन करून कोल्हापूरला आयुक्तालय स्थापन करावे अशी मांडणी केली होती. त्यामध्ये कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांचा समावेश करावा. पुणे विभागात पुणे आणि सोलापूर हा विभाग लहान वाटत असला तर नाशिक विभागातून नगर जिल्हा वेगळा करून पुण्याला जोडावा. अन्यथा नगरचा सर्व व्यवहार पुण्याशीच आहे. पुणे, सोलापूर आणि नगर असा महसुली विभाग होऊ शकतो.- वसंत भोसले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRevenue Departmentमहसूल विभागchandrakant patilचंद्रकांत पाटील