शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कोल्हापूरची विमान ‘सेवा’ हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:54 IST

​​​​​​​महाराष्ट्राने हवाई वाहतुकीविषयी फारशा गांभीर्याने यापूर्वी विचारच केला नाही, त्यामुळे विमानतळ असूनही वाहतूक नाही. हवाई‘सेवा’ हवेतच लटकली आहे.

- वसंत भोसलेमहाराष्ट्राने हवाई वाहतुकीविषयी फारशा गांभीर्याने यापूर्वी विचारच केला नाही, त्यामुळे विमानतळ असूनही वाहतूक नाही. हवाई‘सेवा’ हवेतच लटकली आहे. महाराष्ट्रात लहान-मोठी अठ्ठावीस विमानतळे आहेत. त्यापैकी सहा विमानतळांवर उड्डाणाची दिवस-रात्र सोय आहे. तीनच विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय वाहतूक होते. या सहा विमानतळांशिवाय चार नियोजित विमानतळे आहेत. त्यामध्ये नवी मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, आदींचा समावेश आहे. या सर्व विमानतळांवरून हवाई वाहतूक होण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत. परिणामी सुमारे दोन डझन विमानतळांच्या धावपट्ट्या केवळ ऊन-पाऊस खात पडून आहेत. शेकडो एकर जमीन त्यासाठी वापरली आहे. शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, दोन-चार जिल्हे वगळता तब्बल तीस जिल्ह्यांसाठी जवळपास सोयीची हवाई सेवा उपलब्ध नाही.कोल्हापूर, नाशिक आणि जळगाव विमानतळांवरून हवाई वाहतूक सुरू करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू करण्यात येणार होती. त्यातील नाशिक आणि जळगावची सेवा सुरू झाली आहे. मात्र कोल्हापुरची विमानसेवा अद्याप हवेतच आहे. कोल्हापुरची सेवा सुरू करण्यासाठी डिसेंबरअखेरची मुदत होती. पहिल्या दिवसाच्या विमान प्रवासासाठी दोनशेहून अधिक प्रवाशांनी नोंदणीसाठी चौकशीही केली होती. कोल्हापूरच्या सेवेसाठी आठवड्यातील केवळ तीनच दिवस (मंगळवार, बुधवार आणि रविवार) परवानगी देणार असे सांगितले होते. विमान कंपनीने ही परवानगी सहा दिवसांची असावी, अशी मागणी केली आहे. दुपारी दीड वाजता मुंबईतून विमानाचे उड्डाण करून अडीच वाजता कोल्हापुरात पोहोचणार आणि कोल्हापूरहून परत साडेचार वाजता मुंबईत पोहोचणार आहे. ही वेळ गैरसोयीची आहे. मुंबईहून विमानाने कोल्हापूरला दुपारी येऊन काही उपयोग नाही. सकाळचा वेळ वाया जातो. शिवाय कामे करून तातडीने मुंबईला परतता येत नाही. हीच स्थिती कोल्हापूरहून मुंबईला जाणाºया प्रवाशांची असणार आहे. तातडीने जाऊन कामे करून परत जाता येत नसेल तर हवाई मार्गाचा वापर कोण करेल ?महाराष्ट्राची मुळात एक अडचणच आहे. मुंबईशी संपूर्ण राज्यातील प्रमुख शहरे हवाई मार्गाने जोडण्यासाठी मुंबईचे विमानतळ हेच महाराष्ट्राचे राहिलेले नाही. येथे सुमारे ९०० विमानांची ये-जा आहे. त्यामुळे हा विमानतळ प्रचंड व्यस्त असतो. दहा-वीस प्रवाशांच्या जिल्ह्यातून येणाºया विमानाला जागा किंवा वेळ देताच येत नाही. या विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नव्या मुंबईचा विमानतळ तातडीने उभा करावा लागेल. जेणेकरून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक तिकडे वर्ग करता येईल आणि मुंबईच्या विमानतळाला श्वास घेण्यास अवधी मिळेल. त्या वेळेत कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, जळगाव, नांदेड, शिर्डी, आदी प्रमुख विमानतळांवरून होणाºया विमानांच्या वाहतुकीसाठी योग्य वेळ देता येईल. शिवाय पुण्यासाठीसुद्धा पुरंदर येथील नियोजित विमानतळ तातडीने पूर्ण होण्याची गरज आहे. पुण्यासाठी विमानतळ कोठे उभा करायचा याची चर्चाच दहा वर्षे चालू होती. चाकण की तळेगाव की पुरंदर यात वेळ गेला. आता पुरंदरची जागा निश्चित झाली आहे. प्रत्यक्ष काम केव्हा सुरुवात होणार माहीत नाही. विमान कंपनीच्या मागणीमुळे कोल्हापुरची विमान सेवा हवेतच लटकली आहे.