शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कोल्हापूरची विमान ‘सेवा’ हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:54 IST

​​​​​​​महाराष्ट्राने हवाई वाहतुकीविषयी फारशा गांभीर्याने यापूर्वी विचारच केला नाही, त्यामुळे विमानतळ असूनही वाहतूक नाही. हवाई‘सेवा’ हवेतच लटकली आहे.

- वसंत भोसलेमहाराष्ट्राने हवाई वाहतुकीविषयी फारशा गांभीर्याने यापूर्वी विचारच केला नाही, त्यामुळे विमानतळ असूनही वाहतूक नाही. हवाई‘सेवा’ हवेतच लटकली आहे. महाराष्ट्रात लहान-मोठी अठ्ठावीस विमानतळे आहेत. त्यापैकी सहा विमानतळांवर उड्डाणाची दिवस-रात्र सोय आहे. तीनच विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय वाहतूक होते. या सहा विमानतळांशिवाय चार नियोजित विमानतळे आहेत. त्यामध्ये नवी मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, आदींचा समावेश आहे. या सर्व विमानतळांवरून हवाई वाहतूक होण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत. परिणामी सुमारे दोन डझन विमानतळांच्या धावपट्ट्या केवळ ऊन-पाऊस खात पडून आहेत. शेकडो एकर जमीन त्यासाठी वापरली आहे. शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, दोन-चार जिल्हे वगळता तब्बल तीस जिल्ह्यांसाठी जवळपास सोयीची हवाई सेवा उपलब्ध नाही.कोल्हापूर, नाशिक आणि जळगाव विमानतळांवरून हवाई वाहतूक सुरू करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू करण्यात येणार होती. त्यातील नाशिक आणि जळगावची सेवा सुरू झाली आहे. मात्र कोल्हापुरची विमानसेवा अद्याप हवेतच आहे. कोल्हापुरची सेवा सुरू करण्यासाठी डिसेंबरअखेरची मुदत होती. पहिल्या दिवसाच्या विमान प्रवासासाठी दोनशेहून अधिक प्रवाशांनी नोंदणीसाठी चौकशीही केली होती. कोल्हापूरच्या सेवेसाठी आठवड्यातील केवळ तीनच दिवस (मंगळवार, बुधवार आणि रविवार) परवानगी देणार असे सांगितले होते. विमान कंपनीने ही परवानगी सहा दिवसांची असावी, अशी मागणी केली आहे. दुपारी दीड वाजता मुंबईतून विमानाचे उड्डाण करून अडीच वाजता कोल्हापुरात पोहोचणार आणि कोल्हापूरहून परत साडेचार वाजता मुंबईत पोहोचणार आहे. ही वेळ गैरसोयीची आहे. मुंबईहून विमानाने कोल्हापूरला दुपारी येऊन काही उपयोग नाही. सकाळचा वेळ वाया जातो. शिवाय कामे करून तातडीने मुंबईला परतता येत नाही. हीच स्थिती कोल्हापूरहून मुंबईला जाणाºया प्रवाशांची असणार आहे. तातडीने जाऊन कामे करून परत जाता येत नसेल तर हवाई मार्गाचा वापर कोण करेल ?महाराष्ट्राची मुळात एक अडचणच आहे. मुंबईशी संपूर्ण राज्यातील प्रमुख शहरे हवाई मार्गाने जोडण्यासाठी मुंबईचे विमानतळ हेच महाराष्ट्राचे राहिलेले नाही. येथे सुमारे ९०० विमानांची ये-जा आहे. त्यामुळे हा विमानतळ प्रचंड व्यस्त असतो. दहा-वीस प्रवाशांच्या जिल्ह्यातून येणाºया विमानाला जागा किंवा वेळ देताच येत नाही. या विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नव्या मुंबईचा विमानतळ तातडीने उभा करावा लागेल. जेणेकरून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक तिकडे वर्ग करता येईल आणि मुंबईच्या विमानतळाला श्वास घेण्यास अवधी मिळेल. त्या वेळेत कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, जळगाव, नांदेड, शिर्डी, आदी प्रमुख विमानतळांवरून होणाºया विमानांच्या वाहतुकीसाठी योग्य वेळ देता येईल. शिवाय पुण्यासाठीसुद्धा पुरंदर येथील नियोजित विमानतळ तातडीने पूर्ण होण्याची गरज आहे. पुण्यासाठी विमानतळ कोठे उभा करायचा याची चर्चाच दहा वर्षे चालू होती. चाकण की तळेगाव की पुरंदर यात वेळ गेला. आता पुरंदरची जागा निश्चित झाली आहे. प्रत्यक्ष काम केव्हा सुरुवात होणार माहीत नाही. विमान कंपनीच्या मागणीमुळे कोल्हापुरची विमान सेवा हवेतच लटकली आहे.