शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

‘इगो’ बाजूला तर ठेवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:32 IST

कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या तक्रारींची आकडेवारी पाहता भारतीय कुटुंबव्यवस्थेला ‘इगो’ने ग्रासल्याचे चित्र आहे.

इंग्रजीतल्या ‘इगो’ आणि मराठीतल्या ‘अहंकारा’ने भारतीय कुटुंब व्यवस्था सध्या ग्रासली आहे. रावणाच्या अहंकाराचा टिकाव लागला नाही तर आपल्यासारख्या सामान्यांचे काय ? असे पौराणिक दाखले घरातील जेष्ठ मंडळी देत असली तरी ‘इगो’ भारतीय कुटुंबव्यवस्थेतील कलहाचे प्रमुख कारण ठरतेय. कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या तक्रारींची आकडेवारी पाहता भारतीय कुटुंबव्यवस्थेला ‘इगो’ने ग्रासल्याचे चित्र आहे. एकट्या नागपूर कुटुंब न्यायालयात कौटुंबिक कलहाच्या वर्षाला सरासरी सव्वातीन हजारावर तक्रारी दाखल होत आहेत. नागपूर कुटुंब न्यायालयात २००८ ते २०१७ या १० वर्षांत कौटुंबिक वादाची (कलहाची) ३३ हजार ५६६ प्रकरणे दाखल झाली होती. यंदा मार्चपर्यंत यात १०५२ प्रकरणांची आणखी भर पडली आहे. न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांकडून करण्यात येणारा युक्तिवाद लक्षात घेता स्वत:बद्दलचा अहंकार, एकमेकांना कमी लेखणे, जोडीदाराने आपल्या मनासारखे वागावे असा आग्रह धरणे, एकमेकांच्या कामात लुडबूड करणे, सहनशीलतेचा अभाव, विभक्त कुटुंब पद्धती, एकमेकांना पुरेसा वेळ देण्यास टाळाटाळ, विवाहबाह्य संबंध, शारीरिक व मानसिक छळ, आदी प्रमुख कारणांमुळे कौटुंबिक कलह वाढत असल्याचे स्पष्ट होेते. कौटुंबिक भांडणामुळे एका छताखाली राहणे अशक्य झाल्यानंतर पती-पत्नी, घटस्फोट, पोटगी, अपत्यांचा ताबा, राहायला घर मिळणे, स्त्रीधन परत मिळणे यासह अन्य विविध वैवाहिक अधिकार मिळविण्यासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेत असल्याचे चित्र आहे. या साºया वादामागे एकच शब्द दडलाय तो म्हणजे ‘इगो’. कौटुंबिक न्यायालयात समपुदेशक दोन्ही पक्षात तडजोड व्हावी यासाठी कौन्सिलिंग करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून वादाचा विषय समजून घेतात. मात्र न्यायालयातील समपुदेशकांनाही वेळेचे आणि नोकरीचे बंधन असते. यातच एखादा पक्षकार किंवा त्याचा वकील आक्रमक असल्यास किंवा कोणत्याही तडजोडीला मान्य नसल्यास तेही हतबल ठरतात. शेवटी वकील आणि पक्षकारालाही ‘इगो’ असतोच. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे पती-पत्नीमधील वाद, संबंध कायमचे तोडण्यापर्यंतच्या विकोपाला जात नव्हते. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी मध्यस्थी करीत वाद शांत करीत होते. आज मात्र कुणीच कुणाला समजून घेण्यास तयार नाहीत. मात्र क्षणभरासाठी का होईना आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा किंवा तुम्ही मानत असलेल्या परमेश्वराचे चित्र डोळ्यापुढे आणून बघा आणि ‘इगो’ला अंत:करणातून बाजूला ठेवा. यासाठी कौणत्याही कौन्सिलरची गरज पडत नाही. निश्चितच कौटुंबिक न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ कुणावर येणार नाही.

टॅग्स :FamilyपरिवारCourtन्यायालय