शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘इगो’ बाजूला तर ठेवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:32 IST

कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या तक्रारींची आकडेवारी पाहता भारतीय कुटुंबव्यवस्थेला ‘इगो’ने ग्रासल्याचे चित्र आहे.

इंग्रजीतल्या ‘इगो’ आणि मराठीतल्या ‘अहंकारा’ने भारतीय कुटुंब व्यवस्था सध्या ग्रासली आहे. रावणाच्या अहंकाराचा टिकाव लागला नाही तर आपल्यासारख्या सामान्यांचे काय ? असे पौराणिक दाखले घरातील जेष्ठ मंडळी देत असली तरी ‘इगो’ भारतीय कुटुंबव्यवस्थेतील कलहाचे प्रमुख कारण ठरतेय. कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या तक्रारींची आकडेवारी पाहता भारतीय कुटुंबव्यवस्थेला ‘इगो’ने ग्रासल्याचे चित्र आहे. एकट्या नागपूर कुटुंब न्यायालयात कौटुंबिक कलहाच्या वर्षाला सरासरी सव्वातीन हजारावर तक्रारी दाखल होत आहेत. नागपूर कुटुंब न्यायालयात २००८ ते २०१७ या १० वर्षांत कौटुंबिक वादाची (कलहाची) ३३ हजार ५६६ प्रकरणे दाखल झाली होती. यंदा मार्चपर्यंत यात १०५२ प्रकरणांची आणखी भर पडली आहे. न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांकडून करण्यात येणारा युक्तिवाद लक्षात घेता स्वत:बद्दलचा अहंकार, एकमेकांना कमी लेखणे, जोडीदाराने आपल्या मनासारखे वागावे असा आग्रह धरणे, एकमेकांच्या कामात लुडबूड करणे, सहनशीलतेचा अभाव, विभक्त कुटुंब पद्धती, एकमेकांना पुरेसा वेळ देण्यास टाळाटाळ, विवाहबाह्य संबंध, शारीरिक व मानसिक छळ, आदी प्रमुख कारणांमुळे कौटुंबिक कलह वाढत असल्याचे स्पष्ट होेते. कौटुंबिक भांडणामुळे एका छताखाली राहणे अशक्य झाल्यानंतर पती-पत्नी, घटस्फोट, पोटगी, अपत्यांचा ताबा, राहायला घर मिळणे, स्त्रीधन परत मिळणे यासह अन्य विविध वैवाहिक अधिकार मिळविण्यासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेत असल्याचे चित्र आहे. या साºया वादामागे एकच शब्द दडलाय तो म्हणजे ‘इगो’. कौटुंबिक न्यायालयात समपुदेशक दोन्ही पक्षात तडजोड व्हावी यासाठी कौन्सिलिंग करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून वादाचा विषय समजून घेतात. मात्र न्यायालयातील समपुदेशकांनाही वेळेचे आणि नोकरीचे बंधन असते. यातच एखादा पक्षकार किंवा त्याचा वकील आक्रमक असल्यास किंवा कोणत्याही तडजोडीला मान्य नसल्यास तेही हतबल ठरतात. शेवटी वकील आणि पक्षकारालाही ‘इगो’ असतोच. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे पती-पत्नीमधील वाद, संबंध कायमचे तोडण्यापर्यंतच्या विकोपाला जात नव्हते. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी मध्यस्थी करीत वाद शांत करीत होते. आज मात्र कुणीच कुणाला समजून घेण्यास तयार नाहीत. मात्र क्षणभरासाठी का होईना आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा किंवा तुम्ही मानत असलेल्या परमेश्वराचे चित्र डोळ्यापुढे आणून बघा आणि ‘इगो’ला अंत:करणातून बाजूला ठेवा. यासाठी कौणत्याही कौन्सिलरची गरज पडत नाही. निश्चितच कौटुंबिक न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ कुणावर येणार नाही.

टॅग्स :FamilyपरिवारCourtन्यायालय