शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

अपात्र आमदार पात्र ठरल्याने कर्नाटकचे राजकारण नव्या वळणावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 5:32 AM

त्या पार्श्वभूमीवर अपात्र आमदार निवडणुकीस उमेदवार म्हणून पात्र ठरल्याने कर्नाटकचे राजकारण नव्या वळणावर आले आहे.

विधानसभाध्यक्षांकडून आमदार अपात्र ठरविताना पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींचा गैर अर्थ लावण्यात आल्याचे या आमदारांचे म्हणणे होते. त्या पार्श्वभूमीवर अपात्र आमदार निवडणुकीस उमेदवार म्हणून पात्र ठरल्याने कर्नाटकचे राजकारण नव्या वळणावर आले आहे. कर्नाटकच्या राजकारणाला नवे वळण देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. गेल्या जुलै महिन्यात कॉँग्रेसच्या आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या सतरा आमदारांनी राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा इरादा जाहीर केला होता. तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष के.आर. रमेशकुमार यांनी राजीनामे स्वीकारण्यापूर्वी या आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याच्या कलम दहानुसार अपात्र जाहीर केले होते. शिवाय विद्यमान विधानसभेची मुदत संपेपर्यंत (२०२३) या आमदारांना निवडणुका लढविणे, मंत्रिपद किंवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासही मज्जाव केला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने या आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय योग्य असल्याचे ठरविताना त्यांनी स्वेच्छेने दिलेल्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यात दिरंगाई केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. राजकीय नैतिकतेच्या मुद्द्यावरून आमदारांना अपात्र ठरविणे किंवा त्यांचे राजीनामे न स्वीकारणे अयोग्य असल्याचेही निर्णयात नमूद केले आहे. आमदारांना त्यांच्या पदावर राहण्याचा किंवा राजीनामा देण्याचा हक्क आहे. त्यानंतर त्यांना राजकीय पक्षाच्या प्रवेशाचाही निर्णय घेऊन पोटनिवडणुका लढविता येऊ शकतात.

पक्षांतरबंदी आणि आमदारांना अपात्र ठरविण्यात गल्लत झाल्याचे नमूद केले गेले आहे. वास्तविक, या आमदारांचे राजीनामे न स्वीकारता त्यांना पाच वर्षांसाठी अपात्र घोषित करणे आणि त्यांचा भाजप समर्थनाचा निर्णय हा सर्व कर्नाटकाच्या राजकारणाचा भाग आहे. कर्नाटक विधानसभेची निवडणूक मे २०१८ मध्ये झाली. या निवडणुकीत भाजपला १०४ जागा मिळाल्या. मात्र, बहुमताचा ११५ आकडा गाठण्यासाठी अकरा जणांचा पाठिंबा आवश्यक होता. दरम्यान, जनता दलास काँग्रेसने पाठिंबा दिला. या पक्षांचे संख्याबळ ११७ वर गेले होते. तरीदेखील सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपने बी.एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. विधानसभा सभागृहात बहुमत सिद्ध न करता आल्याने या सरकारने आठवड्यातच राजीनामा दिला होता. तेव्हापासून जनता दल व काँग्रेस आघाडीचे एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून चालू होता. त्याच वेळी जनला दल आणि काँग्रेसमधील नेत्यांची सुंदोपसुंदी चालूच होती. परिणामी सतरा आमदारांनी राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी तातडीने न स्वीकारता त्यावर म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यांचे राजीनामे न स्वीकारता त्यांना अपात्र जाहीर करण्यात आले. परिणामी सरकारही अल्पमतात आले आणि दोन्ही पक्षांची आघाडीदेखील संकटात सापडली. कुमारस्वामी यांनी राजीनामा देताच बी.एस. येडियुराप्पा यांनी विद्यमान सभागृहाची संख्या लक्षात घेऊन बहुमताचा दावा केला. तो मान्य करून सरकारही आले. दरम्यान, अपात्रतेच्या निर्णयाविरुद्ध आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
विधानसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य ठरवितानाही त्यांना निवडणुका लढविण्यास अपात्र ठरविण्याचा निर्णय मात्र अयोग्य ठरवीत सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांना दिलासाच दिला आहे. या सतरापैकी पंधरा मतदारसंघांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या ५ डिसेंबर रोजी त्या होतील. भाजपने या राजीनामे दिलेल्या आमदारांना काल पक्षात प्रवेश दिला आहे. त्यातील १३ जणांना पोटनिवडणुकीत उमेदवारीही दिली आहे. त्यांच्या निवडीवर कर्नाटकातील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. भाजपचे संख्याबळ एका अपक्षाच्या पाठिंब्यासह १०५ आहे. बहुमतासाठी पंधरापैकी किमान दहा जागा जिंकाव्या लागतील. अपात्र आमदार ठरविताना पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींचा गैर अर्थ लावण्यात आल्याचे या आमदारांचे म्हणणे होते. त्या पार्श्वभूमीवर अपात्र आमदार निवडणुकीस उमेदवार म्हणून पात्र ठरल्याने कर्नाटकचे राजकारण नव्या वळणावर आले आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारण