शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी का कोमेजली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 06:58 IST

आशियाई स्पर्धा म्हटले की पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत भारतीय कबड्डी संघ सुवर्णपदक जिंकणार, हे समीकरण आतापर्यंत ठरलेले होते. मात्र, यंदा दोन तर सोडा, एकही सुवर्ण भारताला जिंकता आले नाही.

- विजय बाविस्कर

पानं का नासली? घोडा का अडला? भाकरी का करपली? या प्रश्नांप्रमाणेच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी का कोमेजली, या प्रश्नाचेही उत्तर एकच आहे... न फिरविल्याने! आशियाई स्पर्धा म्हटले की पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत भारतीय कबड्डी संघ सुवर्णपदक जिंकणार, हे समीकरण आतापर्यंत ठरलेले होते. मात्र, यंदा दोन तर सोडा, एकही सुवर्ण भारताला जिंकता आले नाही. महिलांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले तर पुरुष संघाची धाव कांस्यपदकापर्यंत मर्यादित राहिली.

अलीकडील काही वर्षांत प्रो-कबड्डी लीगमुळे या खेळात अनेक अर्थाने क्रांती घडून आली. या लीगमुळे कबड्डी या अस्सल मातीतील खेळाला पुन्हा लोकाश्रय मिळाला... खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळाले... इराण, इराक, जपान, कोरिया, पाकिस्तान हे संघही बलवान म्हणून पुढे येऊ लागले. मात्र, आजवर एखादा अपवाद वगळता कबड्डीतील आपल्या वर्चस्वाला धक्का बसला नव्हता. आशियाई स्पर्धा, विश्वचषक (?) म्हटले की आपणच विजेते असणार, हे तमाम भारतीयांनी गृहित धरले होते. मात्र, यंदाच्या आशियाई स्पर्धेत इराणच्या पुरुष तसेच महिला खेळाडूंनी भारताचे विमान जमिनीवर आणले. पण हे का झालं? आपले दोन्ही संघ चारीमुंड्या चीत झाले. संघनिवडीची प्रक्रिया, हे या पराभवामागील महत्त्वाचे कारण आहे. यासंदर्भातील एक उदाहरण अतिशय बोलके आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये आपल्याच महाराष्ट्रात ही घटना घडली होती. राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघात निवड झालेल्या एका गुणवान महिला खेळाडूला अन्याय्य पद्धतीने वगळण्यात आले. सराव शिबिर सुरू असताना तिच्या गर्भाशयात गाठ असून, कबड्डी खेळण्यास अक्षम असल्याचा साक्षात्कार कुठल्याही वैद्यकीय चाचण्या न घेता कबड्डीतील अधिकाऱ्यांना झाला होता. एवढ्या मोठ्या राज्याचा विचार करता क्रीडा क्षेत्रातील ही घटना तशी किरकोळ असली तरी, कबड्डीतील अधिकाºयांच्या या लज्जास्पद कृत्यामुळे पुरोगामी म्हणून टेंभा मिरविणाºया महाराष्ट्राची मान खाली गेली.

आशियाडसाठी संघ निवडताना काय प्रक्रिया राबविली गेली, याबाबत पारदर्शकता नव्हती. कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवडताना राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी ध्यानात घेतली जाते. मात्र, आशियाडसाठी निवडलेल्या भारतीय कबड्डी संघाबाबत असे काही जाणवले नाही. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी निवड चाचणी झाल्याचेही ऐकीवात नाही. प्रो-कबड्डी लीगमधील स्टार खेळाडूंना थेट संघात स्थान दिले. हे म्हणजे, रणजी स्पर्धा व इतर देशांतर्गत स्पर्धांमधील कामगिरी ध्यानात न घेता केवळ आयपीएलमध्ये चमकणाऱ्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघात स्थान दिल्यासारखे झाले. भारतीय कबड्डी महासंघात अनागोंदी माजली आहे. आशियाई स्पर्धा तोंडावर असतानाच दिल्ली उच्च न्यायालयाने संघनिवडीवरून त्यांना चपराक लगावली, हे गरजेचेच झाले. याकडे गंभीरपणे लक्ष देऊन वेळीच उपाययोजना केली नाही तर भारतीय कबड्डीची अवस्था हॉकीप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही.कबड्डीच्या प्रसाराचा विचार करता इतर देशांच्या कामगिरीकडे सकारात्मकपणे पाहता येईलही. पण हे होत असतानाच या खेळाचा जन्मदाता अशा पद्धतीने पराभूत होणे खचितच भूषणावह नाही.

टॅग्स :Kabaddiकबड्डीAsian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा