शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

कबड्डी का कोमेजली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 06:58 IST

आशियाई स्पर्धा म्हटले की पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत भारतीय कबड्डी संघ सुवर्णपदक जिंकणार, हे समीकरण आतापर्यंत ठरलेले होते. मात्र, यंदा दोन तर सोडा, एकही सुवर्ण भारताला जिंकता आले नाही.

- विजय बाविस्कर

पानं का नासली? घोडा का अडला? भाकरी का करपली? या प्रश्नांप्रमाणेच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी का कोमेजली, या प्रश्नाचेही उत्तर एकच आहे... न फिरविल्याने! आशियाई स्पर्धा म्हटले की पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत भारतीय कबड्डी संघ सुवर्णपदक जिंकणार, हे समीकरण आतापर्यंत ठरलेले होते. मात्र, यंदा दोन तर सोडा, एकही सुवर्ण भारताला जिंकता आले नाही. महिलांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले तर पुरुष संघाची धाव कांस्यपदकापर्यंत मर्यादित राहिली.

अलीकडील काही वर्षांत प्रो-कबड्डी लीगमुळे या खेळात अनेक अर्थाने क्रांती घडून आली. या लीगमुळे कबड्डी या अस्सल मातीतील खेळाला पुन्हा लोकाश्रय मिळाला... खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळाले... इराण, इराक, जपान, कोरिया, पाकिस्तान हे संघही बलवान म्हणून पुढे येऊ लागले. मात्र, आजवर एखादा अपवाद वगळता कबड्डीतील आपल्या वर्चस्वाला धक्का बसला नव्हता. आशियाई स्पर्धा, विश्वचषक (?) म्हटले की आपणच विजेते असणार, हे तमाम भारतीयांनी गृहित धरले होते. मात्र, यंदाच्या आशियाई स्पर्धेत इराणच्या पुरुष तसेच महिला खेळाडूंनी भारताचे विमान जमिनीवर आणले. पण हे का झालं? आपले दोन्ही संघ चारीमुंड्या चीत झाले. संघनिवडीची प्रक्रिया, हे या पराभवामागील महत्त्वाचे कारण आहे. यासंदर्भातील एक उदाहरण अतिशय बोलके आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये आपल्याच महाराष्ट्रात ही घटना घडली होती. राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघात निवड झालेल्या एका गुणवान महिला खेळाडूला अन्याय्य पद्धतीने वगळण्यात आले. सराव शिबिर सुरू असताना तिच्या गर्भाशयात गाठ असून, कबड्डी खेळण्यास अक्षम असल्याचा साक्षात्कार कुठल्याही वैद्यकीय चाचण्या न घेता कबड्डीतील अधिकाऱ्यांना झाला होता. एवढ्या मोठ्या राज्याचा विचार करता क्रीडा क्षेत्रातील ही घटना तशी किरकोळ असली तरी, कबड्डीतील अधिकाºयांच्या या लज्जास्पद कृत्यामुळे पुरोगामी म्हणून टेंभा मिरविणाºया महाराष्ट्राची मान खाली गेली.

आशियाडसाठी संघ निवडताना काय प्रक्रिया राबविली गेली, याबाबत पारदर्शकता नव्हती. कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवडताना राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी ध्यानात घेतली जाते. मात्र, आशियाडसाठी निवडलेल्या भारतीय कबड्डी संघाबाबत असे काही जाणवले नाही. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी निवड चाचणी झाल्याचेही ऐकीवात नाही. प्रो-कबड्डी लीगमधील स्टार खेळाडूंना थेट संघात स्थान दिले. हे म्हणजे, रणजी स्पर्धा व इतर देशांतर्गत स्पर्धांमधील कामगिरी ध्यानात न घेता केवळ आयपीएलमध्ये चमकणाऱ्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघात स्थान दिल्यासारखे झाले. भारतीय कबड्डी महासंघात अनागोंदी माजली आहे. आशियाई स्पर्धा तोंडावर असतानाच दिल्ली उच्च न्यायालयाने संघनिवडीवरून त्यांना चपराक लगावली, हे गरजेचेच झाले. याकडे गंभीरपणे लक्ष देऊन वेळीच उपाययोजना केली नाही तर भारतीय कबड्डीची अवस्था हॉकीप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही.कबड्डीच्या प्रसाराचा विचार करता इतर देशांच्या कामगिरीकडे सकारात्मकपणे पाहता येईलही. पण हे होत असतानाच या खेळाचा जन्मदाता अशा पद्धतीने पराभूत होणे खचितच भूषणावह नाही.

टॅग्स :Kabaddiकबड्डीAsian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा