शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी का कोमेजली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 06:58 IST

आशियाई स्पर्धा म्हटले की पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत भारतीय कबड्डी संघ सुवर्णपदक जिंकणार, हे समीकरण आतापर्यंत ठरलेले होते. मात्र, यंदा दोन तर सोडा, एकही सुवर्ण भारताला जिंकता आले नाही.

- विजय बाविस्कर

पानं का नासली? घोडा का अडला? भाकरी का करपली? या प्रश्नांप्रमाणेच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी का कोमेजली, या प्रश्नाचेही उत्तर एकच आहे... न फिरविल्याने! आशियाई स्पर्धा म्हटले की पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत भारतीय कबड्डी संघ सुवर्णपदक जिंकणार, हे समीकरण आतापर्यंत ठरलेले होते. मात्र, यंदा दोन तर सोडा, एकही सुवर्ण भारताला जिंकता आले नाही. महिलांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले तर पुरुष संघाची धाव कांस्यपदकापर्यंत मर्यादित राहिली.

अलीकडील काही वर्षांत प्रो-कबड्डी लीगमुळे या खेळात अनेक अर्थाने क्रांती घडून आली. या लीगमुळे कबड्डी या अस्सल मातीतील खेळाला पुन्हा लोकाश्रय मिळाला... खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळाले... इराण, इराक, जपान, कोरिया, पाकिस्तान हे संघही बलवान म्हणून पुढे येऊ लागले. मात्र, आजवर एखादा अपवाद वगळता कबड्डीतील आपल्या वर्चस्वाला धक्का बसला नव्हता. आशियाई स्पर्धा, विश्वचषक (?) म्हटले की आपणच विजेते असणार, हे तमाम भारतीयांनी गृहित धरले होते. मात्र, यंदाच्या आशियाई स्पर्धेत इराणच्या पुरुष तसेच महिला खेळाडूंनी भारताचे विमान जमिनीवर आणले. पण हे का झालं? आपले दोन्ही संघ चारीमुंड्या चीत झाले. संघनिवडीची प्रक्रिया, हे या पराभवामागील महत्त्वाचे कारण आहे. यासंदर्भातील एक उदाहरण अतिशय बोलके आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये आपल्याच महाराष्ट्रात ही घटना घडली होती. राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघात निवड झालेल्या एका गुणवान महिला खेळाडूला अन्याय्य पद्धतीने वगळण्यात आले. सराव शिबिर सुरू असताना तिच्या गर्भाशयात गाठ असून, कबड्डी खेळण्यास अक्षम असल्याचा साक्षात्कार कुठल्याही वैद्यकीय चाचण्या न घेता कबड्डीतील अधिकाऱ्यांना झाला होता. एवढ्या मोठ्या राज्याचा विचार करता क्रीडा क्षेत्रातील ही घटना तशी किरकोळ असली तरी, कबड्डीतील अधिकाºयांच्या या लज्जास्पद कृत्यामुळे पुरोगामी म्हणून टेंभा मिरविणाºया महाराष्ट्राची मान खाली गेली.

आशियाडसाठी संघ निवडताना काय प्रक्रिया राबविली गेली, याबाबत पारदर्शकता नव्हती. कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवडताना राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी ध्यानात घेतली जाते. मात्र, आशियाडसाठी निवडलेल्या भारतीय कबड्डी संघाबाबत असे काही जाणवले नाही. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी निवड चाचणी झाल्याचेही ऐकीवात नाही. प्रो-कबड्डी लीगमधील स्टार खेळाडूंना थेट संघात स्थान दिले. हे म्हणजे, रणजी स्पर्धा व इतर देशांतर्गत स्पर्धांमधील कामगिरी ध्यानात न घेता केवळ आयपीएलमध्ये चमकणाऱ्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघात स्थान दिल्यासारखे झाले. भारतीय कबड्डी महासंघात अनागोंदी माजली आहे. आशियाई स्पर्धा तोंडावर असतानाच दिल्ली उच्च न्यायालयाने संघनिवडीवरून त्यांना चपराक लगावली, हे गरजेचेच झाले. याकडे गंभीरपणे लक्ष देऊन वेळीच उपाययोजना केली नाही तर भारतीय कबड्डीची अवस्था हॉकीप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही.कबड्डीच्या प्रसाराचा विचार करता इतर देशांच्या कामगिरीकडे सकारात्मकपणे पाहता येईलही. पण हे होत असतानाच या खेळाचा जन्मदाता अशा पद्धतीने पराभूत होणे खचितच भूषणावह नाही.

टॅग्स :Kabaddiकबड्डीAsian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा