शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कौमार्य परीक्षा पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 09:04 IST

एका बाजूने व्यापक प्रमाणावर प्रबोधन व दुसऱ्या बाजूने कायद्याचा धाक, यामुळेच विवाहातील काैमार्य परीक्षेसारख्या जाचक प्रथा बंद होऊ शकतील.

कृष्णा चांदगुडे, जात पंचायत मूठमाती, अभियानाचे राज्य कार्यवाह - 

अन्य कोणत्याही राज्याला लाभली नाही एवढी संत व समाजसुधारकांची जाज्वल्य परंपरा महाराष्ट्र राज्याला लाभली आहे, परंतु आपले सामाजिक मन मात्र वर्चस्ववादी प्रवृत्ती  सोडायला तयार नाही. सामाजिक सुधारणांवर समाजसुधारकांनी भर दिला, मात्र त्यांचे विचार अजूनही आपल्या पचनी पडत नाही. 

नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या एका घटनेमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डाॅक्टर असलेली वधू व अमेरिकन नेव्हीमध्ये अधिकारी असलेला वर. दोघांचेही परीवार उच्चशिक्षित असूनही या विवाहात नववधूची कौमार्य परीक्षा घेतली जाणार असल्याच्या बातमीने समाजमन ढवळून निघाले. खरे तर ही प्रथा एका विशिष्ट समाजात पाचशे वर्षांपासून घेतली जात असल्याचा दावा जात पंचायतच्या पंचांकडून केला जातो. परंपरेच्या नावाखाली त्याचा अगदी सहजपणे अंगीकार केला जातो. परंतु इतके दिवस हे काळोखात घडत असल्याने समाजासमोर आले नव्हते. सर्व काही अलबेल वाटत होते, मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने २०१३ मध्ये जात पंचायतींच्या मनमानी विरोधात लढा पुकारला. त्यानंतर जात पंचायतींच्या शिक्षांचे दाहक वास्तक समोर आले. जात पंचायतीकडून विशेषत: महिलांना क्रूर शिक्षा दिल्या गेल्या. यात महिलेस मानवी विष्ठा खाऊ घालणे, चारित्र्याच्या संशयावरून उकळत्या तेलात हात घालून नाणे बाहेर काढणे, तापलेली लालबुंद कुऱ्हाड हातावर ठेवणे, योनीमार्गात मिरचीची पूड कोंबणे, जिभेला चटका देणे, चाबकाने फटके मारणे, झाडाला बांधून ठेवणे.. इत्यादी शिक्षांचा समावेश आहे. याबरोबरच जात पंचायतकडून घेतली जाणारी अमानुष कुप्रथा म्हणजे कौमार्य परीक्षा ! 

एका समाजात लग्नाच्या रात्री नववधूला कौमार्य परीक्षा द्यावीच लागते. सुरुवातीला वर व वधू यांच्या शरीराची ज्येष्ठ व्यक्तीकडून तपासणी केली जाते. बांगड्या बांधून ठेवल्या जातात. अलंकार काढले जातात. एखादी टोकदार वस्तू कुठे लपविली नाही ना याची खात्री  करून  घेतली जाते. शरीरसंबंधांनंतर वस्त्रावर रक्ताचा डाग असेल तरच ते लग्न ग्राह्य धरले जाते, अन्यथा त्या वधूस तिच्या पूर्व आयुष्यातील लैंगिक संबंधांबद्दल विचारणा केली जाते. तिला मारहाण करण्यात येते. तिच्या परिवारास मोठा आर्थिक दंड करण्यात येतो. बऱ्याचदा हा दंड लाखांच्या घरात असतो. ते पैसे पंच आपसांत वाटून घेतात. दंडाची रक्कम पंचांना दिली नाही तर पंच अशा कुटुंबास बहिष्कृत करतात. अशा वाळीत टाकलेल्या कुटुंबाशी कुणी संबंध ठेवत नाही. त्यांच्याशी कुणी बोलत नाही. त्यांच्या मुला-मुलींशी कुणी लग्न करत नाही. त्यांच्या परिवारात कुणी मयत झाल्यास  त्यांच्या मयतीला कुणी खांदा देत नाही. अशा परिवाराचे जीवन असह्य होते. त्यामुळे ते बऱ्याच वेळा आत्महत्येचा पर्याय  निवडतात. खरे तर चारित्र्य व कौमार्य यांचा काही संबंध नाही; पण जात पंचायतचे पंच हे मान्य करत नाही. परंपरेच्या नावाखाली त्या कुप्रथांचा उदोउदो केला जातो. 

प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरल्याने व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानाच्या लढ्यामुळे राज्य सरकारने याची दखल घेतली. महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा धूसर बनत असल्याने सरकारने याबाबत सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा बनविला. असा कायदा बनविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. एका बाजूने हे सकारात्मक असले तरी कायद्याचे नियम अजून बनविले नाहीत. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कायद्याचा प्रचार -प्रसार करत आहे, परंतु सरकारनेही त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

विवाहात होणारी कौमार्य चाचणी बंद झालेली नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्या विरोधात लढा उभारला आहे. त्यामुळे एका बाजूने व्यापक प्रमाणावर प्रबोधन व दुसऱ्या बाजूने कायद्याचा धाक दाखवत जातपंचायतींना  मूठमाती देण्याची गरज आहे. 

टॅग्स :marriageलग्न