शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

न्यायदेखील चुकतो

By admin | Updated: April 1, 2016 04:09 IST

न्याय सहसा चुकत नाही आणि प्रसंगी चुकला तरी इतराना तसे म्हणण्याची प्राज्ञा नसते. परिणामी जेव्हां न्याय चुकतो तेव्हां त्याने स्वत:च ते उक्तीने वा कृतीने मान्य करावयाचे असते, जसे

न्याय सहसा चुकत नाही आणि प्रसंगी चुकला तरी इतराना तसे म्हणण्याची प्राज्ञा नसते. परिणामी जेव्हां न्याय चुकतो तेव्हां त्याने स्वत:च ते उक्तीने वा कृतीने मान्य करावयाचे असते, जसे ते आता उत्तराखंडच्या बाबतीत झाले आहे. त्या राज्यातील हरिष रावत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार खुद्द काँग्रेसमध्येच बंडाळी झाल्याने अल्पमतात आले म्हणून राज्यपालांनी रावत यांना गेल्या सोमवारी विधानसभेत शक्तिपरीक्षण करण्यास सांगितले होते. पण त्याच्या एकच दिवस अगोदर केन्द्राने रावत सरकार बरखास्त करुन आणि विधानसभा स्थगित ठेऊन राष्ट्रपती राजवट लागू केली. खरे तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सरकारच्या दबावापुढे झुकण्याचे कारण नव्हते. रालोआच्याच आधीच्या राजवटीत वाजपेयी सरकार उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करायला निघाले असता तत्कालीन राष्ट्रपती के.आर.नारायण यांनी संबंधित अध्यादेश विनास्वाक्षरी परत पाठविला होता. तसे उत्तराखंडबाबत झाले नाही. राष्ट्रपती राजवटीचा अंमल सुरु झाला तेव्हां त्याविरोधात काँग्रेस व रावत सरकार यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने लोकशाही विजयी करण्याच्या मिषाने रावत सरकारने शक्तिपरीक्षण करावे आणि ज्या नऊ काँग्रेसी बंडखोरांना विधानसभेच्या अध्यक्षांनी निलंबित केले होते त्यांनाही मतदानात सहभागी करुन घ्यावे असा निकाल दिला. त्यासाठी कालच्या गुरुवारचा मुहूर्तही न्यायालयानेच काढून दिला. केन्द्र सरकारने घेतलेला निर्णय अशा प्रकारे निरंक ठरविण्याच्या उच्च न्यायालयाच्या कृतीच्या विरोधात केन्द्र सरकार पुन्हा तिथेच गेले. रावत सरकार बरखास्त केले जाऊन तिथे राज्यपालांची सत्ता प्रस्थापित झालेली असताना रावत यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगणे म्हणजे ते सरकार अस्तित्वात असल्याचे गृहीत धरणे व त्यायोगे एकाच वेळी उत्तराखंडमध्ये दोन सरकारे असल्याचे मान्य करणे अयोग्य आणि अवैध असल्याचा युक्तिवाद केन्द्राने केला आणि मग उच्च न्यायालयाने आपणच दिलेला शक्तिपरीक्षणाचा निर्णय मागे घेऊन कृतीने आपली चूक मान्य केली. जी बाब केन्द्राच्या वकिलाने न्यायालयाच्या लक्षात आणून दिली ती बाब आपला आधीचा निवाडा जाहीर करताना न्यायालयाच्या लक्षात कशी येऊ नये हे एक आश्चर्यच म्हणायचे. अर्थात मुळातच या न्यायालयीन लढाईची गरज होती का हा यातील खरा महत्वाचा मुद्दा आहे. काँग्रेसमधील बंडाळीपायी रावत सरकार जर अल्पमतात आलेच होते तर त्याचे भवितव्य सोमवारी तसेही ठरलेच असते. तोपर्यंत केन्द्राने धीर धरण्यास काहीच हरकत नव्हती. पण केन्द्राला म्हणजे भाजपाला उत्तराखंड राज्याला आपल्या पंखाखाली घेण्याची झालेली घाई आणि या घाईवर मात करण्याची उच्च न्यायालयाची कृती यामधून समोर आला तो केवळ एक पोरखेळ.