शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

न्यायदेखील चुकतो

By admin | Updated: April 1, 2016 04:09 IST

न्याय सहसा चुकत नाही आणि प्रसंगी चुकला तरी इतराना तसे म्हणण्याची प्राज्ञा नसते. परिणामी जेव्हां न्याय चुकतो तेव्हां त्याने स्वत:च ते उक्तीने वा कृतीने मान्य करावयाचे असते, जसे

न्याय सहसा चुकत नाही आणि प्रसंगी चुकला तरी इतराना तसे म्हणण्याची प्राज्ञा नसते. परिणामी जेव्हां न्याय चुकतो तेव्हां त्याने स्वत:च ते उक्तीने वा कृतीने मान्य करावयाचे असते, जसे ते आता उत्तराखंडच्या बाबतीत झाले आहे. त्या राज्यातील हरिष रावत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार खुद्द काँग्रेसमध्येच बंडाळी झाल्याने अल्पमतात आले म्हणून राज्यपालांनी रावत यांना गेल्या सोमवारी विधानसभेत शक्तिपरीक्षण करण्यास सांगितले होते. पण त्याच्या एकच दिवस अगोदर केन्द्राने रावत सरकार बरखास्त करुन आणि विधानसभा स्थगित ठेऊन राष्ट्रपती राजवट लागू केली. खरे तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सरकारच्या दबावापुढे झुकण्याचे कारण नव्हते. रालोआच्याच आधीच्या राजवटीत वाजपेयी सरकार उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करायला निघाले असता तत्कालीन राष्ट्रपती के.आर.नारायण यांनी संबंधित अध्यादेश विनास्वाक्षरी परत पाठविला होता. तसे उत्तराखंडबाबत झाले नाही. राष्ट्रपती राजवटीचा अंमल सुरु झाला तेव्हां त्याविरोधात काँग्रेस व रावत सरकार यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने लोकशाही विजयी करण्याच्या मिषाने रावत सरकारने शक्तिपरीक्षण करावे आणि ज्या नऊ काँग्रेसी बंडखोरांना विधानसभेच्या अध्यक्षांनी निलंबित केले होते त्यांनाही मतदानात सहभागी करुन घ्यावे असा निकाल दिला. त्यासाठी कालच्या गुरुवारचा मुहूर्तही न्यायालयानेच काढून दिला. केन्द्र सरकारने घेतलेला निर्णय अशा प्रकारे निरंक ठरविण्याच्या उच्च न्यायालयाच्या कृतीच्या विरोधात केन्द्र सरकार पुन्हा तिथेच गेले. रावत सरकार बरखास्त केले जाऊन तिथे राज्यपालांची सत्ता प्रस्थापित झालेली असताना रावत यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगणे म्हणजे ते सरकार अस्तित्वात असल्याचे गृहीत धरणे व त्यायोगे एकाच वेळी उत्तराखंडमध्ये दोन सरकारे असल्याचे मान्य करणे अयोग्य आणि अवैध असल्याचा युक्तिवाद केन्द्राने केला आणि मग उच्च न्यायालयाने आपणच दिलेला शक्तिपरीक्षणाचा निर्णय मागे घेऊन कृतीने आपली चूक मान्य केली. जी बाब केन्द्राच्या वकिलाने न्यायालयाच्या लक्षात आणून दिली ती बाब आपला आधीचा निवाडा जाहीर करताना न्यायालयाच्या लक्षात कशी येऊ नये हे एक आश्चर्यच म्हणायचे. अर्थात मुळातच या न्यायालयीन लढाईची गरज होती का हा यातील खरा महत्वाचा मुद्दा आहे. काँग्रेसमधील बंडाळीपायी रावत सरकार जर अल्पमतात आलेच होते तर त्याचे भवितव्य सोमवारी तसेही ठरलेच असते. तोपर्यंत केन्द्राने धीर धरण्यास काहीच हरकत नव्हती. पण केन्द्राला म्हणजे भाजपाला उत्तराखंड राज्याला आपल्या पंखाखाली घेण्याची झालेली घाई आणि या घाईवर मात करण्याची उच्च न्यायालयाची कृती यामधून समोर आला तो केवळ एक पोरखेळ.