शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
3
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
4
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
5
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
6
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
7
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
8
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
9
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
10
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
11
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
12
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
13
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
14
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
15
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
16
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
17
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
18
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
19
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
20
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-

स्वप्नपूर्तीचा आनंद

By admin | Updated: July 25, 2016 03:36 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांनी गेली १० वर्षे ज्या प्रकल्पाच्या पूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तो वर्धा-यवतमाळ-नांदेड हा २८३ कि.मी. लांबीचा व १६०० कोटी रुपयांचा

लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांनी गेली १० वर्षे ज्या प्रकल्पाच्या पूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तो वर्धा-यवतमाळ-नांदेड हा २८३ कि.मी. लांबीचा व १६०० कोटी रुपयांचा रेल्वेमार्ग त्याच्या पूर्तीच्या दिशेने आता वाटचाल करू लागला आहे. त्याच्या उभारणीचा ६० टक्के खर्च केंद्र, तर ४० टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे. या मार्गाखाली येणारी जमीन संबंधित शेतकऱ्यांशी थेट वाटाघाटी करून दोन वर्षांच्या आत खरेदी करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याने त्याच्या वाटचालीत येऊ शकणाऱ्या कायदेशीर व न्यायालयीन अडचणीही दूर झाल्या आहेत. मुळात या प्रकल्पाचा पाठपुरावा २००८ च्या फेब्रुवारी महिन्यात सुरू झाला. दि. ११ फेब्रुवारी २००९ या दिवशी तेव्हाचे रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते त्याचे रीतसर उद्घाटन झाले. यवतमाळ हा जिल्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांनी ग्रासला असल्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जास्तीचा रोजगार प्राप्त व्हावा यासाठी विजय दर्डा यांनी केंद्र व राज्य या दोन्ही सरकारांकडे त्याच्या आरंभासाठी तगादा लावून धरला. संसदेच्या प्रत्येकच अधिवेशनात ते याविषयी सरकारकडे विचारणा करीत राहिले. काही महिन्यांपूर्वी आताचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन या प्रकल्पाचा समावेश रेल्वेच्या विशेष योजनेत करावा अशी मागणी त्यांनी केली व ती रेल्वेमंत्र्यांनी मान्य केली. तशा आशयाचे पत्रही रेल्वे मंत्रालयाने यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ पाठविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दर्डा यांनी नुकतीच भेट घेऊन हा प्रकल्प विशेष गतीने पूर्ण करावा अशी मागणी केली आणि फडणवीस यांनीही ती मान्य केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास विदर्भ व मराठवाड्यातील हजारो बेरोजगारांना काम मिळेल आणि त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या जलदगती दळणवळणामुळे त्या भागातील उद्योग व व्यवसायांनाही त्याची मोठी मदत होईल. लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी आणि आताचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबतच महाराष्ट्राचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांनीही या प्रकल्पाबाबत विशेष आस्थेने दर्डा यांना साहाय्य केले. शिवाय या भागातील लोकप्रतिनिधी व माध्यमे यांनीही या मागणीचा वेळोवेळी पाठपुरावा केला. गेली दहा वर्षे केंद्र सरकार आपल्या रेल्वे अंदाजपत्रकात या प्रकल्पाच्या पाहणीसाठी काही ना काही रकमेची तरतूद करीत आले. मात्र त्याच्या संपूर्ण उभारणीचा साकल्याने विचार करून त्यासाठी आवश्यक ती रक्कम उपलब्ध करून देणे आणि त्याच्या पूर्तीसाठी प्रशासनाला आवश्यक ते आदेश देणे ही बाब आता प्रथमच झाली आहे. या प्रकल्पामुळे विदर्भ व मराठवाड्यातील अविकसित भागांना विकासाच्या दिशेने अधिक जलद गतीने वाटचाल करणे आता शक्य होणार आहे. या विभागाचा विकासविषयक अनुशेषही त्यामुळे काहीसा भरून निघणार आहे. शिवाय अनेक वर्षांत विदर्भात येऊ घातलेला हा सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प आहे. त्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष धन्यवाद देणे गरजेचे आहे. विजय दर्डा यांचे आजवरचे प्रयत्न आता यशस्वी झाले यासाठी त्यांचेही अभिनंदन करणे आवश्यक आहे.