शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

Jammu & Kashmir: विलीनीकरणातील अडथळे खऱ्या अर्थाने दूर होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 03:27 IST

राज्यांचे विभाजन आणि सीमाबदल ही जरी नवी बाब नसली तरी, आतापर्यंत अनेक विशेषाधिकार आणि स्वायत्तता उपभोगलेल्या काश्मीरच्या बाबतीत ही मोठी उडी आहे.

- डॉ. रश्मिनी कोपरकर, आंतरराष्ट्रीय राजकारण अभ्यासकस्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय आहे, असं म्हणता येईल. यायोगे भारतीय संघराज्य प्रणालीवर दूरगामी परिणाम होणार आहे. राज्यांचे विभाजन आणि सीमाबदल ही जरी नवी बाब नसली तरी, आतापर्यंत अनेक विशेषाधिकार आणि स्वायत्तता उपभोगलेल्या काश्मीरच्या बाबतीत ही मोठी उडी आहे.भारतीय संविधानाच्या पहिल्याच कलमात काश्मीरला भारताचे १५वे राज्य म्हणण्यात आले. परंतु त्याची तत्कालीन पार्श्वभूमी लक्षात घेऊन संविधानात कलम ३७०चा अंतर्भाव करण्यात आला होता, ज्यात ‘तात्पुरती, संक्रमणात्मक आणि विशेष’ प्रावधाने अंतर्भूत होती. त्यानुसार काश्मीरला स्वतंत्र घटना आणि ध्वज अंगीकारण्याचा अधिकार मिळाला. उर्वरित भारताचे कायदेकानून येथे लागू न होता, नागरिकत्व, मालमत्ता, तसेच मूलभूत हक्कांविषयीचे वेगळे नियम स्वीकारण्यात आले. या राज्यासंदर्भात कायदे करण्याचा अधिकार केंद्रीय कायदेमंडळाला केवळ सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध आणि दळणवळण व दूरसंचार, याच क्षेत्रांत देण्यात आला.

मूलत: कलम ३७०चा अंतर्भाव जरी तात्पुरत्या स्वरूपात असला, तरी अनेक राजकीय कारणांमुळे ते रद्दबातल करण्याचा निर्णय लांबणीवर पडत गेला. भाजपच्या मूल सूत्रांमध्ये इतर अनेक मुद्द्यांप्रमाणेच ३७० हटवणेदेखील होते आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमताचे सरकार आल्यावर याबाबतीत निर्णय होणेही अपेक्षित होते. तसे असले तरी, या निर्णयाला जो इतर अनेक पक्ष आणि सामान्य जनतेचा पाठिंबा मिळतो आहे, त्याला विशेष महत्त्व आहे. यावरून हा विषय किती लक्षणीय आणि थकीत होता हे लक्षात येते. राजा हरिसिंगाने सही केलेला दस्तावेज, तसेच भारतीय आणि काश्मिरी घटनेतील कलमांनुसार, काश्मीर भारताचा अभिन्न भाग झाला, तरी कलम ३७० मधील काही अन्याय्य तरतुदींमुळे खऱ्या अर्थाने विलीनीकरण होण्यात अनेक अडथळे निर्माण होत होते. जे आता हळूहळू दूर होतील, अशी आशा आहे.
आजपासून काश्मीरची स्वतंत्र घटना रद्द होऊन तिथेही भारतीय संविधान सर्वार्थाने लागू होणार आहे. तसेच सरकारी इमारतींवर भारताचा तिरंगा फडकेल. काश्मिरी जनतेसाठी आतापर्यंत लागू असलेले दुहेरी नागरिकत्वही आता संपुष्टात येईल. या निर्णयाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे, काश्मिरातील मागासवर्गीयांना, अनुसूचित जनजातींना, तसेच गरीब सवर्णांना, शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण प्राप्त होईल. भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेला माहितीचा अधिकार आता तिथेही लागू होईल. काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत रूपांतर झाल्यामुळे, तेथील नागरिकत्वाबाबत पक्षपाती असलेल्या घटनेतील कलम ‘३५-अ’ची प्रासंगिकताही आता संपुष्टात आली आहे. भाषिक व सांस्कृतिक बाबतीत विभिन्न असलेल्या लडाख प्रांताला स्वतंत्र दर्जा दिल्यामुळे त्याची विशेषता जपण्यास मदत मिळेल. एकीकडे जम्मू-काश्मीर दिल्लीच्या थेट अधिपत्याखाली आल्यामुळे तेथील सुरक्षेचा जटिल विषय सोडवणे केंद्राला सुकर होईल. दुसरीकडे, भारतीय कायदे लागू झाल्याने देशातील उद्योजक गुंतवणुकीसाठी येथे वळतील. वाढते उद्योगधंदे, उत्तम शैक्षणिक संस्था, दळणवळणाच्या सोयी, पर्यटनाच्या संधी आणि सुधारित अर्थव्यवस्था याच्या जोरावर काश्मीर प्रांतही उर्वरित देशाप्रमाणे विकासाच्या मार्गावर अग्रेसर होईल.अर्थात हे मार्गक्रमण सोपे नाही. आज घेतलेले दोन महत्त्वाचे निर्णय हे त्या दिशेने केवळ पहिले पाऊल म्हणायला हवे. यायोगे ओढवलेला तेथील स्थानिक राज्यकर्त्यांचा आणि काही नागरिकांचा विरोध, देशभरात घुसळले गेलेले वातावरण आणि पाकिस्तानातून येणारी सुरक्षा आव्हाने, या पार्श्वभूमीवर इथून पुढील प्रत्येक पाऊल सरकारला जपून टाकावे लागेल.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370