शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

जायकवाडीचे फुटके नशीब

By admin | Updated: October 21, 2015 04:04 IST

जायकवाडीचे पाणी मिळविण्यासाठी राजकीय आणि सामाजिक आघाडीवर एवढी सामसूम असेल, तर कर्मदरिद्रीपणाचा कळस यापेक्षा काय असू शकतो?

- सुधीर महाजनजायकवाडीचे पाणी मिळविण्यासाठी राजकीय आणि सामाजिक आघाडीवर एवढी सामसूम असेल, तर कर्मदरिद्रीपणाचा कळस यापेक्षा काय असू शकतो?मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना नगर-नाशिकमध्ये रब्बीच्या हंगामाची तयारी सुरू आहे, तीसुद्धा मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर. गोदावरीचे पाणी समन्यायी तत्त्वाने मिळावे या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळानेदेखील मराठवाड्याची १२.८४ द.ल.घ.मी. पाण्यावर बोळवण केली आणि एवढेसुद्धा पाणी द्यावे लागू नये यासाठी नगरमध्ये उच्च न्यायालयात जाण्याची तयारी चालू आहे. गोदावरी नदीवर पैठणला असलेल्या जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक जिल्ह्यातून हक्काचे पाणी सोडावे यासाठी हा आटापिटा चालू आहे. महामंडळाने १२.८४ द.ल.घ.मी. पाणी सोडण्याचा निर्णय घेतला; परंतु मराठवाड्यासाठी हक्काचे २२ द.ल.घ.मी. पाणी मिळायला पाहिजे. गेल्या वर्षी ७.११ द.ल.घ.मी. पाणी सोडले; त्यापैकी केवळ चार द.ल.घ.मी. पाणी येथपर्यंत पोहोचले. मुळात मराठवाड्याचा पाणीप्रश्न हा अलीकडे निर्माण झाला. जायकवाडीच्या वर गोदावरी नदीवर धरणे बांधू नयेत, असा निर्णय २००४ साली सरकारने घेतला होता; परंतु राजकीय दांडगाईने निळवंडेसारखी धरणे बांधण्यात आली. याचा परिणाम जायकवाडीत येणाऱ्या पाण्यावर झाला. गेल्या वर्षी उशिरा पाणी सोडले, त्यामुळे निम्मे पाणी तर कोरड्या जमिनीतच मुरले. आता पाणी सोडले तरी किमान चार द.ल.घ.मी. पाणी नदीतच मुरणार. म्हणजे फक्त आठ-साडेआठ द.ल.घ.मी. पाणी जायकवाडीत पोहोचणार.या पाण्यामुळे औरंगाबाद, जालना, नांदेड या मोठ्या शहरांसह गोदाकाठच्या अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. पाणी १५ आॅक्टोबरपर्यंत सोडायला हवे होते; पण महामंडळानेच उशिरा निर्णय घेतला. वास्तविक हे पाणी साठ्याचा अंदाज घेऊन जुलै-आॅगस्टमध्येच सोडायला पाहिजे, त्यावेळी पाण्याची नासाडी कमी होते; परंतु नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणे अगोदर भरून घेतली जातात. आताही पाणी सोडताना धरणांमधील साठा तपासला पाहिजे. शिवाय मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन थोडे जास्तीचे पाणी सोडले तर योग्य होईल. पाणी सोडताना काही निकष कसोशीने पाळले पाहिजेत. एक तर कालवे भरून घेतले जाऊ नयेत. कालवे, छोटे तलाव यातील पाणीसाठा तपासला जावा, वीजपुरवठा बंद ठेवावा. पाण्याच्या या मुद्यावर अहमदनगरमधील राजकीय नेते पक्ष आणि वैयक्तिक पातळीवरील मतभेद विसरून एकत्र येताना नेहमीच दिसतात. गेल्या वेळी आंदोलन झाले होते आणि आता जुळवाजुळव चालू आहे. एकीकडे पाण्याच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारायचे आणि दुसरीकडे न्यायालयात लढाई लढायची; शिवाय राजकीय ताकदीचा वापर करायचा, अशा तीन पातळ्यांवर नगरकर सक्रिय असतात. मराठवाड्यात अशा जनआंदोलन आणि राजकीय प्रयत्नांचाही दुष्काळ आहे. जायकवाडीचे हक्काचे पाणी मिळविण्यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरत नाही आणि जनताही सुस्त आहे. आमचे पाणी पळविले अशी कोणी ओरडही करीत नाही. मराठवाडा जनता विकास परिषद निष्ठेने हा प्रश्न लावून धरते. गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या तोंडावर गंगापूर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी जायकवाडीच्या वरची धरणे बॉम्बने उडवा, अशी गर्जना केली. बंब हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. हा प्रश्न त्यांच्याच सरकारकडे मांडून ते हक्काचे पाणी आणू शकले असते; पण सत्ताधारी आहोत याचा त्यांना विसर पडला असावा. प्रसार माध्यमांमध्ये घोषणा करून पाणी मिळत नसते. पिंडाला कावळा शिवला या पद्धतीने त्यांनी ‘टायमिंग’ साधून घोषणा केली आणि पाणी सोडल्यानंतर आपल्या प्रयत्नांमुळेच पाणी मिळाले, असे म्हणायलाही ते मोकळे झाले. पैठणच्या आमदारांच्या तर हा प्रश्न गावीही नाही. हे सारे सत्ताधारी आहेत. राजकीय आणि सामाजिक आघाडीवर एवढी सामसूम असेल, तर जायकवाडी तहानलेलेच राहणार. कर्मदरिद्रीपणाचा कळस यापेक्षा आणखी काय असू शकतो?