शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

‘कसदार अभिनयाचा अभिनव साक्षात्कार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 02:00 IST

९५ मिनिटांच्या मुलाखतीचे थोडक्यात वर्णन करायचे झाले, तर त्याला मोदींच्या ‘कसदार अभिनयाचा अभिनव साक्षात्कार’ असेच म्हणता येईल.

जाहीर सभा असो की, विविध सरकारी कार्यक्रम, आक्रमक शैलीत संवाद फेकत, पंतप्रधान मोदी स्वत:ला नेहमी एखाद्या दबंग नेत्याच्या भूमिकेत सादर करीत आले आहेत. ५६ इंची छातीचाही अनेकदा त्यांनी उल्लेख केला आहे. चौफेर हल्ले चढवताना काँग्रेस, गांधी घराणे हे त्यांच्या खास आवडीचे विषय. जाहीर सभांद्वारे गांधी घराण्यावर अथवा अन्य विरोधकांवर कडवट टीका करताना, विचित्र शब्दकोट्या करीत मोदी तुटून पडत आले आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एशियन न्यूज इंटरनॅशनल (एएनआय)ला दिलेल्या प्रकट मुलाखतीत मात्र, पंतप्रधान मोदी अनपेक्षितरीत्या विनम्र रूपात प्रथमच पाहायला मिळाले. साडेचार वर्षांत स्वत:ला पत्रसृष्टीपासून कटाक्षाने दूर ठेवणारे पंतप्रधान एकाही जाहीर पत्रपरिषदेला सामोरे गेले नाहीत. साहजिकच बहुतांश वृत्तवाहिन्यांनी या मुलाखतीचे थेट प्रसारण केले. विरोधकांवर आपण हल्ले चढविले, तरी शहरी मध्यमवर्गीय पूर्वीसारखा प्रतिसाद देत नाहीत. समाज माध्यमांवर आपल्या भाषणांची यथेच्छ खिल्ली उडविली जाते. तेव्हा निवडणुकीच्या काळात नेहमीची शैली कामाची नाही, हे मोदींच्या लक्षात आले असावे. राहुल गांधींचे काही प्रयोगही पंतप्रधानांच्या बदलत्या शैलीला कारणीभूत ठरले असावेत. लोकसभेत राहुल गांधींनी मोदींना थेट सुनावले, ‘प्रधानमंत्री हमेशा नफरत की बात करते है और हम प्यार की बात करते है.’ पंतप्रधानांच्या आसनाजवळ जाऊन राहुलनी त्यांना मिठीही मारली. हे पे्रमालिंगन पंतप्रधानांच्या बहुदा जिव्हारी लागले असावे. मग आपल्या बदलत्या रणनीतीनुसार नेहमीचा आवेश बाजूला ठेवून, जनतेशी स्वैर संवाद साधण्याची संधी त्यांनी एएनआयच्या मुलाखतीद्वारे घेतली. हिंदुत्व अथवा अयोध्येतील राम मंदिर हा अजेंडा भाजपाच्या दिग्विजयासाठी फारसा उपयुक्त नाही, हे तीन राज्यांतल्या पराभवानंतर मोदींच्या पुरेपूर लक्षात आले असावे, म्हणूनच या वादग्रस्त विषयावर संभावित पवित्रा घेत, राम मंदिरासाठी वटहुकूम काढणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरच या विषयाचा निर्णय सरकार घेईल, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. नोटाबंदीच्या निर्णयाने देशाला झटका दिला नाही, हे उत्तर देताना मोदींची देहबोली अन् चेहऱ्यावरचे आविर्भाव बरेच बचावात्मक होते. राहुल गांधींच्या ‘चौकीदार चोर है’ या घोषणेचा उद्धव ठाकरेंनीही अलीकडेच पुनरुच्चार केला. मुलाखतीत प्रश्नकर्तीने त्याचा उल्लेख करताच, आपल्या पक्षाची ताकद प्रत्येकाला वाढवायची असते, तेव्हा हे स्वाभाविक मानले पाहिजे, असे उत्तर देत, या अवघड प्रश्नाची मोदींनी बोळवण केली. शेतकºयांच्या समस्यांसाठी कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही़ मात्र राज्य सरकारांच्या कर्जमाफीच्या निर्णयांना आमचा विरोध नाही, असा ‘नरो वा कुंजरोवा’ पवित्रा पंतप्रधानांना घ्यावा लागला. भारतीय सैन्यदलाच्या सर्जिकल स्ट्राइकचा राजकारणासाठी वापर नको, हे एकीकडे मान्य करताना स्ट्राइक्सचे आॅपरेशन पूर्ण होईपर्यंत रात्रभर आपण कसे झोपलो नाही, अशा भावनात्मक प्रसंगाद्वारे सीमेवर देशासाठी प्राणांची बाजी लावणाºयांचा जाहीर गौरव करण्यात गैर काय? असा प्रतिसवालही त्यांनी केला अन् सर्जिकल स्ट्राइक्सचे सारे श्रेय पुन्हा एकदा स्वत:कडे घेतले. आपल्या प्राधान्यक्रमात देशाचे संरक्षण सर्वप्रथम आहे, असे नमूद करणाºया मोदींना सर्जिकल स्ट्राइक्सनंतर नेमके काय साधले गेले? ते स्पष्ट करता आले नाही. सरकारच्या विविध योजनांची मोदींनी पुन्हा एकदा उजळणी केली. चलनवाढीची टक्केवारी खूपच खाली आली, याचाही आवर्जून उल्लेख केला. मात्र, ती खाली का आली, त्याची कारणे स्पष्ट करण्याचे मोदींनी टाळले. बाजारपेठेत मंदी आहे, कोणत्याही मालाला हवा तसा उठाव नाही. शेतकºयांना आपला कृषिमाल रस्त्यांवर ओतावा लागतोय. चलनवाढ खाली येण्याची ही खरी कारणे आहेत. सामान्य जनतेला ही विसंगती समजते. मोदींनी प्रथमच आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रश्न उपस्थित करणारे काही अवघड प्रश्नही स्वीकारले. मात्र, त्याची उत्तरे देताना काठाकाठाने तरंगण्याची पळवाट त्यांनी शोधली. ९५ मिनिटांच्या मुलाखतीचे थोडक्यात वर्णन करायचे झाले, तर त्याला मोदींच्या ‘कसदार अभिनयाचा अभिनव साक्षात्कार’ असेच म्हणता येईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी