शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

इंजेक्शन पखालीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:55 AM

औरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न अठ्ठावीस दिवसांनंतरही सुटला नाही. तो शहरभर गाजत होताच आणि विधानसभेतही गाजला.

औरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न अठ्ठावीस दिवसांनंतरही सुटला नाही. तो शहरभर गाजत होताच आणि विधानसभेतही गाजला. शेवटी सरकार म्हणून काही तरी केले, असे दाखविण्याची जबाबदारी असतेच आणि ती पार पाडावी लागते म्हणून मिटमिटा येथे झालेल्या पोलीस कारवाईला जबाबदार ठरवून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना महिनाभराच्या सक्तीच्या रजेवर पाठविले आणि महानगरपालिकेचे आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली केली. या दोघांवरील कारवाईचे समर्थन करणे किंवा त्याचा विरोध करणे हा विषय नाही; पण यामुळे प्रश्न सुटणार आहे का? मुळात हा प्रश्न काही महिना-दोन महिन्यांत निर्माण झालेला नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून तो सोडविण्याचा प्रयत्न झालेला नाही. त्याला प्रशासन जेवढे जबाबदार त्यापेक्षाही जास्त नगरसेवक आणि महापौर. आपल्या कलाने काम करणारे अधिकारी औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींना चालत नाहीत. शैलेशकुमार शर्मा, बलदेवसिंग, प्रकाश महाजन, ओमप्रकाश बकोरिया, सुनील केंदे्रकर या कडक आणि नियमांनुसार काम करणाºया अधिकाºयांना येथे टिकू दिले नाही. प्रकाश महाजनांच्या विरोधात तर ठराव केला गेला. मात्र, या शहरात गेल्या पंचवीस वर्षांपासून महानगरपालिकेवर शिवसनेचे वर्चस्व आहे; पण या पाव शतकात रस्ते, पाणी, आरोग्य व दिवाबत्ती, अशा मूलभूत सेवा ते देऊ शकले नाहीत. धार्मिक तेढ तीव्र करून जनभावना चाळवायच्या आणि सत्तेचा सोपान चढायचा ही पद्धत त्यांनी अंगीकारली. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे मार्क्सने उगीच म्हटले नाही. कारण महिनाभर कचºयाचे ढीग लागूनही या शहराची जनता गुंगीत आहे. असे असताना हा प्रश्न तातडीने सोडवा, असे फर्मान ‘मातोश्री’वरूनही निघाले नाही. कचºयाचा नुसताच प्रश्न नाही, तर त्याला आर्थिक व राजकीय कंगोरे आहेत. कचºयाचा निपटारा करणाºया यंत्रणेत बहुतांश नगरसेवकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. ते जोपासण्याच्या अट्टहासात हे कचºयाचे शहर बनले. हा कचरा शहराच्या कोणत्याही भागात नको आहे. कारण जिकडे कचरा डेपो जाणार त्या भागातील जमिनीचे दर कोसळतात आणि शहरालगतच्या जमिनी या राजकीय हितसंबंधात जशा अडकल्या तशा मतपेटीच्या दबाव तंत्राचाही त्यांच्यावर प्रभाव आहे. कचºयाचा प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या परदेश वाºया झाल्या. देशातील प्रयोगदेखील पाहिले; पण दौºयाच्या नावाखाली ही फक्त मौजमजा होती. जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी होती, हे उघड झाले. प्रश्न पदाधिकारी आणि नगरसेवकांनाही सोडवायचा नाही. कारण तो सुटला तर यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. नियमांवर बोट ठेवून काम करणारा कोणताही आयुक्त नगरसेवकांना नको असतो. सरकारने केलेली कारवाई हा देखावा आहे. आजार हेल्याला आणि इंजेक्शन पखालीला, एवढेच म्हणता येईल.