शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

लोकमत आजचा अग्रलेख - निर्ढावलेल्या निर्लज्जपणाचे पुणेरी दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 05:36 IST

दरवर्षी भारतात ३० ते ३३ हजार बलात्काराचे गुन्हे नोंदविले जातात. देशात रोज ८८ ते ९० बलात्काराची प्रकरणे पोलिसांकडे नोंदवली जातात. न नोंदवली जाणारी प्रकरणे तर वेगळीच. बऱ्याच प्रकरणात बलात्कार करणारा इसम ओळखीचा, शेजारी वा नातेवाईक असतो;

ठळक मुद्देदरवर्षी भारतात ३० ते ३३ हजार बलात्काराचे गुन्हे नोंदविले जातात. देशात रोज ८८ ते ९० बलात्काराची प्रकरणे पोलिसांकडे नोंदवली जातात. न नोंदवली जाणारी प्रकरणे तर वेगळीच. बऱ्याच प्रकरणात बलात्कार करणारा इसम ओळखीचा, शेजारी वा नातेवाईक असतो;

पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे समाज खरोखर हादरला आहे, असे अद्याप तरी जाणवलेले नाही. पुण्यात वा राज्याच्या अन्य भागांत या भयंकर प्रकाराचे जे तीव्र पडसाद उमटायला हवे होते, संताप दिसायला हवा होता, तसे झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे बलात्कारासारख्या पाशवी गुन्ह्याबाबतही आपणास काही वाटेनासे झाले  की काय? आपण पूर्वीइतके संवेदनशील राहिलो नाही की काय? याचे कदाचित राजकारण केले जाईल, सरकारवर आरोप केले जातील आणि कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची टीकाही होईल; पण निर्भया प्रकरणानंतर दिल्लीत आणि देशभर जो उद्रेक झाला होता, रस्त्या रस्त्यांवर लोक उतरून निषेध करीत होते, बलात्काऱ्यांना फाशीची मागणी करीत होते, तसे आता होईनासे झाले आहे. बलात्कार वा लैंगिक शोषण यापेक्षा हल्ली संबंधित मुलगी वा महिला कोणत्या जातीची, समाजाची, धर्माची वा आर्थिक गटाची होती, याला महत्त्व दिले जाते. आरोपीचीही जात, धर्म पाहिले जाते. बलात्कार झाला, त्या राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार आहे, ते पाहून अन्य पक्ष आपली भूमिका ठरवतात. हे विषण्ण करणारे आहे. पुण्याच्या प्रकरणातही पीडित मुलगी बिहारची आहे, मराठी नाही, यालाच महत्त्व दिले जाते. इतकी लहान मुलगी मित्राला भेटायला घरातून बाहेर गेल्यामुळे अनेक जण तिच्याच चारित्र्याविषयी शंका घेत आहेत.

दरवर्षी भारतात ३० ते ३३ हजार बलात्काराचे गुन्हे नोंदविले जातात. देशात रोज ८८ ते ९० बलात्काराची प्रकरणे पोलिसांकडे नोंदवली जातात. न नोंदवली जाणारी प्रकरणे तर वेगळीच. बऱ्याच प्रकरणात बलात्कार करणारा इसम ओळखीचा, शेजारी वा नातेवाईक असतो; पण पीडितेचे कुटुंबीय अनेकदा पोलिसांत तक्रारच करीत नाहीत. बदनामी होईल, मुलीचा विवाह होणार नाही, तक्रार केली तर आरोपी त्रास देतील, अशी त्यांची भीती असते. जे हिंमत दाखवून तक्रार करायला जातात, त्यांना पोलिसांची चौकशी नकोशी होते. पोलीसही पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेतात, तिनेच गुन्हा केला असावा, असे वागवतात आणि कित्येकदा आरोपींनाच पाठीशी घालतात. अलीकडील काळात काही राजकारणी, लोकप्रतिनिधी यांनीही बलात्कार केल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यांच्यावर खटले नोंदवले गेल्यानंतरही त्यांना भेटायला त्यांच्या पक्षाचे नेते बिनदिक्कत कारागृहात जातात. हा एका प्रकारे पोलीस यंत्रणेवर दबाव आणण्याचाच प्रकार आहे. असे घडले की आरोपपत्रात कच्चे दुवे मुद्दामच ठेवले जातात. त्यासाठी काही आरोपी मोठ्या रकमा मोजतात. काही वेळा ‘आस्ते कदम चालू द्या प्रकरण’ असा सल्लेवजा आदेश येतो. पीडितेला मात्र न्यायालयात वर्षानुवर्षे खेटे घालावे लागतात. तिथे काही वेळा आरोपीचे वकील भलतेसलते प्रश्न विचारून त्रास देतात. दुसरीकडे जामिनावरील आरोपींकडून दमदाटी, धमक्या येत राहतात. त्यामुळे एकूणच भ्रष्ट यंत्रणा, बलात्काराविषयी असंवेदनशीलता यामुळे ७० टक्के आरोपी सहज सुटतात. बलात्काऱ्याला शिक्षा होण्याचे प्रमाण आता जेमतेम ३० टक्क्यांवर आले आहे. हे प्रमाण १९७३ साली ४४ टक्के आणि १९८३ साली ३८ टक्के होते. गुन्हा सिद्ध होणे व शिक्षा होणे याचे प्रमाण जवळपास १४ टक्क्यांनी खाली का आले, याचा विचार पोलीस, सरकार यांना का करावासा वाटत नाही? निर्भया बलात्कार प्रकरणानंतर गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा व्हावी, हे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालावेत, अशी जोरदार मागणी झाली. केंद्र सरकारने ती मान्य केली, कायद्यात दुरुस्त्या केल्या गेल्या.

आता आरोप सिद्ध झाल्यास फाशीच्या शिक्षेचीही तरतूद आहे; पण त्यामुळे बलात्काराचे गुन्हे कमी झालेले नाहीतच. किंबहुना त्यात सातत्याने वाढच होत आहे. म्हणजे शिक्षा कितीही कडक करण्यात आली, तरी गुन्हेगारांना त्याचे काही वाटत नाही, त्यांना शिक्षेची भीतीही वाटेनाशी झाली आहे. शिक्षा काहीही असली तरी आपण सुटू, असे वाटण्याइतका निर्ढावलेपणा त्यांच्यात असतो. शिवाय फाशीची अंमलबजावणी होण्यात कैक वर्षे लोटतात. फाशीची शिक्षा रद्द व्हावी, यासाठीही कज्जेदलाली सुरू राहते. खालच्या न्यायालयातून वरच्या न्यायालयात, असे करता करता अनेक वर्षे जातात. तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली होते वा तो निवृत्त होतो. त्यामुळे तारखांना तो हजरही राहत नाही. दुसरीकडे गुन्हेगार म्हातारा होतो वा आजारी पडतो. मग आता तरी शिक्षा सौम्य करावी, अशी विनंती होते. दरम्यानच्या काळात संबंधित प्रकरणातील गांभीर्य, चीड, संताप मागे पडतो. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा या राज्यांत बलात्कारांचे गुन्हे अधिक घडत असले तरी पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रातही असे प्रकार घडतच आहेत. पुण्यातील प्रकार महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद आहे. त्यामुळे जात, धर्म, पक्ष न पाहता सर्वांनीच त्याविरोधात आवाज उठवायला हवा.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस