शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

पाकिस्तान सरकारसाठी भारताची साखर कडू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 6:26 AM

sugar : पाकिस्तान व्यापार महामंडळाने आता तिसऱ्यांदा ५० हजार टन साखर खरेदीसाठीची आंतरराष्ट्रीय निविदा प्रसिद्ध केली आहे. मात्र, बंदी असलेल्या देशांतील व्यापाऱ्यांना या निविदा भरू नयेत, असे त्यामध्ये स्पष्ट केलेले आहे.

- चंद्रकांत कित्तुरे (वृत्त संपादक, लोकमत, कोल्हापूर)

भारतात मुबलक साखर आहे. पाकिस्तानात मात्र तिचा तुटवडा आहे. यामुळे तेथील साखरेचे दर १०० रुपयांवर गेले आहेत. ते दर कमी करायचे कसे? तर साखरेची आयात करून. ही साखर कुठून आणायची तर भारतातून, असा एक प्रस्ताव आला. पाकिस्तान व्यापार महामंडळानेच तो मंजूर केला. भारत तसा पाकिस्तानचा कट्टर शत्रू; पण व्यापार उदिमात हे शत्रुत्व काँग्रेस सरकारच्या कार्यकालात फारसे आड येत नव्हते. 

भारतात मोदी सरकार सत्तेवर आले. पुलवामात अतिरेक्यांचा हल्ला झाला. तो पाकिस्तानपुरस्कृत होता हे स्पष्ट होताच त्याचा बदला घेण्यासाठी भारताने बालाकोटला सर्जिकल स्ट्राइक केले. त्यानंतर जम्मू काश्मीरसाठी  ३७० व्या कलमान्वये असलेला विशेष दर्जा रद्द केला. त्यासाठी हे कलमच रद्द करून जम्मू काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केले. तेव्हापासून या दोन्ही देशांतले व्यापार उदिमासह सर्व संबंध बंद आहेत. पाकिस्तानी व्यापार महामंडळाच्या प्रस्तावामुळे ते पुन्हा चालू होतील, अशी आशा वाटू लागली होती. मात्र, खेळाच्या मैदानावर मैत्रीच्या बाता करणारे पंतप्रधान इम्रान खान त्याला अनुकूल नव्हते. त्यामुळे त्यांच्या सरकारने व्यापार महामंडळाचा प्रस्ताव फेटाळून लावला. परिणामी दोन पारंपरिक शत्रूंमध्ये पुन्हा व्यापार आणि वाटाघाटी सुरू होण्याच्या आशाही मावळल्या.

जगभरातील साखर उत्पादक राष्ट्रांमध्ये पाकिस्तानही आहे. मात्र, यंदा तेथे साखरेचे उत्पादन ५६ लाख टन अपेक्षित आहे. देशाची गरज भागवायला ते पुरेसे नाही. पाच लाख टन साखर बाहेरून आणावी लागेल, तरच देशातील साखरेचे दर नियंत्रणात आणता ये‌तील, असे तेथील तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळेच भारतातून साखर आयातीचा प्रस्ताव चाचपून पाहिला गेला. भारत सरकारने त्यावर अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. 

पाकिस्तान सरकारनेच तो फेटाळल्याने विषयच मिटला. खरे तर भारतातून साखर आयात करणे पाकिस्तानला खूप सोपे आणि स्वस्त पडते. कारण रस्ता मार्गानेही ती जाऊ शकते. ब्राझीलमधून साखर आणायची झाल्यास ती पाकिस्तानात यायला ४५ ते ६० दिवस लागतात. उलट भारतातून ती अवघ्या चार दिवसांत पोहोचू शकते. भारतात अतिरिक्त साखर आहे. त्यामुळेच सरकारने ६० लाख टन साखर निर्यात करण्याचे लक्ष्य दिले आहे. पाकिस्तानात साखर पाठविणे भारतालाही सोयीचे आणि कमी खर्चाचे आहे; कारण रस्ता, रेल्वे मार्गाने साखर जाऊ शकते. भारतीय साखर वाहतूक भाड्यासह ३९८ डॉलर प्रतिटन या दरात पाकिस्तानला मिळू शकते. अन्य देशांतील साखरेपेक्षा किमान २५ डॉलरने ती स्वस्त पडते. तरीही इम्रान सरकारला ती नको आहे.

पाकिस्तान व्यापार महामंडळाने आता तिसऱ्यांदा ५० हजार टन साखर खरेदीसाठीची आंतरराष्ट्रीय निविदा प्रसिद्ध केली आहे. मात्र, बंदी असलेल्या देशांतील व्यापाऱ्यांना या निविदा भरू नयेत, असे त्यामध्ये स्पष्ट केलेले आहे. यापूर्वीच्या दोन निविदा जादा दराच्या होत्या. प्रतिटन साखरेसाठी ५४० अमेरिकन डॉलर असा दर त्यामध्ये होता. त्यामुळे अमान्य करण्यात आल्या होत्या. 

येत्या १४ एप्रिलपासून पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. या महिन्यात नागरिकांकडून साखरेचा वापर जादा होतो. दर वाढलेले असल्यामुळे सरकारविरोधात ते‌थे मोठी नाराजी आहे. ती कमी करावी यासाठी परदेशातून साखर आयातीचा पाकिस्तानचा आटापिटा सुरू आहे. या तिसऱ्या निविदेला कसा प्रस्ताव मिळतो यावरच रमजानमध्ये साखर स्वस्त होणार की, आणखी महागणार हे ठरणार आहे.साखरेबरोबरच कापसाचीही पाकिस्तानमध्ये टंचाई आहे. दोन देशांतील व्यापार सुरू झाला तर भारतातून कापसाचीही पाकिस्तानला निर्यात होऊ शकते.

दोन्ही देशांत वाटाघाटीचे आणि व्यापाराचे पर्व पुन्हा सुरू होण्याची आशा उंचावल्याने दोन्ही देशांतील व्यापाऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या होत्या. उभय देशांतील नागरिकांनाही हे हवे आहे.  मात्र, काश्मीरचा प्रश्न आपल्याला हवा त्या पद्धतीने सुटल्याशिवाय भारताशी मैत्रीचे संबंध सुरू करायचे नाहीत, अशी भूमिका इम्रानखान सरकारची आहे. कारण काश्मीरच्या प्रश्नावरच तेथील राजकारण चालते. खरे तर या दोन शेजारी राष्ट्रांनी भौगोलिक राजकारण न करता भौगोलिक अर्थकारण करायला हवे.

डबघाईला आलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला त्यामुळे मोठी उभारी मिळू शकते. यात दोन्ही देशांचा फायदा आहे. यासाठी जीवनावश्यक वस्तूंची आयात - निर्यात राजकीय शत्रुत्वापासून दूर ठेवली पाहिजे; कारण यात भरडला जातो तो सर्वसामान्य नागरिकच; पण राजकीय नेते, सत्ताधाऱ्यांना त्याचे देणेघेणे नसते. भारताविरुद्ध जनतेला चिथावणे यातच पाकिस्तान सरकारचे हित सामावले आहे. त्यामुळेच त्याला भारतीय साखरेचा मधुमेह झाला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPakistanपाकिस्तानIndiaभारत