शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Independence Day 2021 : अन् अमेरिकी गहू खाणारा देश बदलला!, ‘पंचवार्षिक’ अभिमान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 09:08 IST

Celebrating Happy Independence Day 2021: स्वतंत्र भारताच्या विकासाची वाट कृषी क्षेत्रातून काढता येऊ शकते, यावर ते ठाम होते. म्हणूनच पहिल्या पंचवार्षिक योजनेत कृषी-औद्योगिक विकास आणि सिंचन योजनांवर भर देण्यात अला.

- नंदकिशोर पाटील

राज्यघटनेतील लोककल्याणकारी संघराज्याच्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप देण्यात पंचवार्षिक योजनांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. लोकशाहीची तत्त्वे तळागाळापर्यंत रुजवायची असतील तर सर्वसामान्य माणसांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे, या नीतीवर पंचवार्षिक योजनांची आखणी करण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर समाजवादी विचारसरणीचा पगडा होताच. त्यामुळे जोसेफ स्टालिन यांनी सोव्हिएत युनियनमध्ये यशस्वीपणे राबविलेल्या पंचवार्षिक योजनेचे प्रारूप नेहरूंनी भारतात आणले आणि १९५१ मध्ये पहिली पंचवार्षिक योजना लागू केली.

स्वतंत्र भारताच्या विकासाची वाट कृषी क्षेत्रातून काढता येऊ शकते, यावर ते ठाम होते. म्हणूनच पहिल्या पंचवार्षिक योजनेत कृषी-औद्योगिक विकास आणि सिंचन योजनांवर भर देण्यात अला. हिराकूड, भाक्रा-नांगलसारख्या धरणांची पायाभरणी केली. कधीकाळी अमेरिकेतील गव्हावर विसंबून राहणारा देश बघताबघता अन्नधान्याच्या बाबतीत नुसता स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार देश बनला. नेहरूंची दूरदृष्टी आणि पंचवार्षिक योजनांची ही फलश्रुती आहे.

गेल्या ७४ वर्षांच्या कालखंडात आजवर बारा पंचवार्षिक योजना झाल्या. हरितक्रांती, श्वेतक्रांती, अणुऊर्जा, अण्वस्त्र निर्मिती, औद्योगिक विकास, संगणक क्रांती आणि जागतिकीकरण असे महत्त्वाचे टप्पे पार करत भारताची आज विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे वाटचाल सुरू आहे.

पंचवार्षिक योजनांचे फलित काय?- भारताच्या आर्थिक विकासाची पायाभरणी- सर्वसमावेशक विकास सूत्राची अंमलबजावणी- कृषी उत्पादनात स्वयंपूर्ण- औद्योगिक विकासाला चालना- शिक्षणाचे सार्वत्रीकरण, साक्षरता वाढली- हरितक्रांती, धवलक्रांती- अवकाश संशोधनात भरारी- अण्वस्त्रांची निर्मिती- पायाभूत सुविधांचा विकास- दळणवळण सुलभ- सिंचन क्षमतेत वृद्धी- आदिवासी, मागास वर्गांचा विकास

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन