शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

जबाबदारीचे भान महत्त्वाचे!

By किरण अग्रवाल | Published: July 12, 2018 7:40 AM

चिथावणीखोर, सामाजिक सलोख्यास बाधा आणणाऱ्या खोट्या संदेशाचे आदान-प्रदान हा अलीकडे दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरू लागला आहे.

नोकरीवर असलेल्या नोकरदारास कामगार कायद्याची व त्यातून मिळणाऱ्या अधिकाराची माहिती असते तशी आपल्या कर्तव्य व जबाबदारीची जाण असतेच असे नाही. मतस्वातंत्र्याचे वा अभिव्यक्तीचे तसेच काहीसे आहे. बोलताना, लिहिताना व इकडचे संदेश तिकडे धाडतानाही यासंबंधीचे भान बाळगले जात नाही, म्हणूनच अफवांचे बाजार तेजीत येतात व लोकांना हकनाक जीव गमावण्याची वेळ येते. सरकारला सोशल मीडियाला वेसण घालायची वेळ आली आहे तीदेखील त्यामुळेच.

चिथावणीखोर, सामाजिक सलोख्यास बाधा आणणाऱ्या खोट्या संदेशाचे आदान-प्रदान हा अलीकडे दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरू लागला आहे. कारण आलेल्या संदेशाची खातरजमा न करता त्यावर प्रतिक्रिया देण्याची वा अभिव्यक्त होण्याची सवय आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे. दुसरे म्हणजे, सोशल माध्यमावर आलेला संदेश इकडून उचलून तिकडे फॉरवर्ड करण्यात बहुतेकांचा कल असतो. कारण स्वत: डोकं न लावता अगर संदेश लिखाणाची तसदी न घेता रेडिमेड माहितीचे प्रसारण करून आपली अद्ययावतता दर्शवून देण्याची त्यांची धडपड असते. त्यामुळे सर्वात अगोदर किंवा इतरांच्या पुढे राहण्याच्या प्रयत्नात संदेशाची सत्यता न पडताळता तो पुढे ढकलून देण्याची प्रवृत्ती बळावली आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांना सजग होत, चुकीचे किंवा खोटे काय आहे ते तुम्हीच ओळखा हे सांगण्यासाठी मोहीम हाती घ्यावी लागली आहे. पण प्रश्न खरा हाच आहे की, हे दुसऱ्याने कुणी आपणास सांगण्याची मुळात गरज का भासावी? आपलेच आपणास हे का समजू अगर उमजू नये?

प्रत्येकाला आपले स्वत:चे भलेबुरे जसे कळते, तसे समाजासाठी काय चांगले वा तोट्याचे हे का कळत नाही किंवा त्या अंगाने विचार का केला जात नाही, हा यातील प्रश्न आहे. आपल्या सामाजिक जाणिवा तितक्या प्रगल्भ नाहीत, हे त्याचे उत्तर आहे. प्रगत साधनांमुळे माणूस प्रगत झाला, हातात अत्याधुनिक मोबाइल आल्याने जणू जग त्याच्या मुठीत आले; पण या जगात वावरायचे कसे याचे ज्ञान त्याच्या ठायी नाही. शिक्षण घेऊनही सुशिक्षितपणाचा अभाव आढळावा अशी ही स्थिती आहे. विशेष म्हणजे, तरु ण पिढी ही अधिक शिकली, सवरलेली आहे. पण तिच्या सामाजिक जाणिवा खूपच तकलादू असल्याचे दिसून येते. सोशल माध्यमाला सदोदित चिपकून वा बिलगून असणारी मंडळी त्यावरील अंगठेछाप प्रतिसादात अडकून बसते. खोट्या समाधानात स्वत्व हरवून बसलेली ही मंडळी मग विचार न करता दुसºयाच्या हातचे बाहुले होऊन बसते. दुसरीकडून आलेला कसलाही संदेश त्यातील सत्यता पडताळून न पाहता आपल्या संपर्कातील इतरांना पाठवून लोक मोकळे होतात, आपत्ती ओढवते ती त्यातूनच. सोशल माध्यमांवरील संदेशाचे आवागमान म्हणूनच चिंतेचा विषय होऊन बसला आहे.

समाजात तेढ निर्माण होणारे जे काही प्रसंग अलीकडील काळात घडलेत, त्यामागे अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या भडकावू संदेशांचा वाटा मोठा राहिल्याचे दिसून आले आहे. मुले पळविणाºयांची टोळी आल्यासारख्या अफवा पसरविणाºया संदेशांनीही अनोळखी इसमांबद्दल शंकेचे वातावरण निर्माण केले. अशा गैरसमजुतीच्या कारणातून देशभरात २७ निष्पापांचे प्राण घेतले गेले. म्हणूनच याबाबत समाजमन जागृत करण्याची गरज बनली आहे. व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल माध्यमांवर डोळे वटारले गेल्यावर त्यांनी अशी जनजागरणाची मोहीम हाती घेतली आहे, तसेच पोलीस खातेही शाळा-शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी व पालकांना तसेच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सच्या प्रमुखांना जाणीव करून देत आहेतच. पण सुजाण नागरिक म्हणून आपणच आपली जबाबदारी ओळखून अशा अफवा पेरणाºया संदेशांना रोखले तर अप्रिय घटनांना संधी मिळणार नाही.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलWhatsAppव्हॉट्सअॅपFacebookफेसबुक