शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वीज नसेल, तर टॉवरचा ‘वरचा मजला’ कसा गाठायचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 05:44 IST

एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर झाल्याने चटईक्षेत्र निर्देशांकाचे घोटाळे कदाचित थांबतील; पण नागरी सुविधांचे काय?

संदीप प्रधान

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मुंबईवगळता राज्यभराकरिता एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली (युनिफाइड डीसीआर) लागू करण्यास मंजुरी दिली हे स्वागतार्ह पाऊल आहे. २०१२ सालापासून राज्य सरकार एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू करण्याबाबत बोलत होते. अखेर तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारला ते शक्य झाले. त्यामुळे आघाडीची अथवा महाआघाडीची सरकारे कुचकामी असतात, त्यांच्या काळात मोठे धोरणात्मक निर्णय होत नाहीत, असे दावे करणाऱ्या विरोधकांना  चोख उत्तर मिळाले आहे. या निर्णयामुळे चटईक्षेत्र निर्देशांकाच्या गैरवापराला चाप बसेल, नियमांच्या सुसूत्रीकरणामुळे राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नात वाढ होईल व वाढीव प्रमाणात घरे निर्माण झाल्याने घरांच्या किमती आटोक्यात येतील, असा राज्य सरकारचा दावा आहे.

या नियमावलीनुसार, १५० चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडधारकांना स्वत:च्या वापराच्या घराच्या बांधकामाकरिता स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसेल, तर ३०० चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडधारकांना अर्ज केल्यानंतर १० दिवसांत परवानगी देण्याची तरतूद आहे. मार्च २०१८ मध्ये या नियमावलीचा मसुदा जाहीर करून त्यावर हरकती व सूचना मागवल्या होत्या. याचा अर्थ मागील भाजप सरकारच्या काळात हे धोरण तयार झाले आणि महाविकास आघाडी सरकारने ते लागू केले. वरकरणी दोन्ही सरकारांमध्ये अनेक कारणास्तव मनभिन्नता  असली तरी बांधकाम क्षेत्रातील धोरणांवर एकमत आहे.  मुंबईखेरीज सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींकरिता ही नियमावली लागू होणार असल्याने भविष्यात क्लस्टर डेव्हलपमेंट व टाऊनशिप स्कीम यांना हे धोरण उपकारक ठरेल. त्यामुळे छोट्या शहरांमधील लहान बिल्डर बाजूला पडून मोठ्या शहरातील टाऊनशिप उभ्या करणाऱ्या बड्या बिल्डरांचे उखळ पांढरे होणार आहे.  सर्व शहरांमध्ये निवासी इमारतींना देय चटईक्षेत्र निर्देशांकाखेरीज ६० टक्के, तर व्यापारी इमारतींकरिता देय चटईक्षेत्र निर्देशांकाखेरीज ८० टक्के प्रोत्साहनपर चटईक्षेत्र निर्देशांक प्राप्त होणार आहे. अशा मोठ्या विकास योजनांमध्ये १५ टक्के क्षेत्र हे मनोरंजनाकरिता राखीव असेल. कागदावर हे धोरण अत्यंत सुंदर, आकर्षक दिसते, हे निर्णय जसेच्यातसे प्रत्यक्षात उतरले तर छोट्या शहरांचा नियोजनबद्ध विकास शक्य आहे.

अनेक छोट्या शहरांमध्ये बैठी घरे अथवा एक मजली बंगले बांधण्याची पद्धत सध्या रूढ आहे. घरासमोर अंगण, मागे शेत किंवा वाडी असे चित्र पाहायला मिळते. बहुमजली इमारतींमध्ये वास्तव्य करण्याची सवय व इच्छाशक्ती छोट्या शहरांमध्ये कमी आहे. अशा लोकांना टॉवरमधील घरांत कोंबणे हे त्यांची घुसमट करणारे ठरू शकते. चाळी किंवा बैठ्या झोपड्यांमध्ये आयुष्य काढलेल्या मुंबई-ठाण्यातील कुटुंबांचाही पुनर्विकासानंतर चार भिंतीत बंद जीवन जगताना जीव घुसमटतो. ठाणे, पुणे, डोंबिवली वगैरे शहरांत जागेची कमतरता असल्याने आकाशाच्या दिशेला इमले बांधून लोकांची घराची गरज भागवणे ही निकड आहे. त्यामुळे राज्यातील छोट्या शहरांमध्ये गरज असेल व लोकांची मानसिकता असेल तर आणि तरच बहुमजली इमारती उभ्या राहातील, शिवाय बहुमजली इमारत उभी करायची तर बांधकामाचा खर्च वाढतो. लिफ्ट, अन्य सुविधा द्याव्या लागतात. बहुमजली इमारत बांधली तर बिल्डरला जास्त नफा होणार हे दिसताच  जमीनमालकाची अतिरिक्त रकमेची मागणी वाढते. त्यामुळे बहुमजली इमारती छोट्या शहरांत उभ्या राहिल्या तर घरांच्या किमती कमी होतील हा दावा मिथक आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जळगाव असो 

सांगली-सातारा, अनेक शहरांत वीज, पाणी, कचरा यांच्या व्यवस्थापनाचे प्रश्न सुटलेले नाहीत. आठवड्यातील दोन दिवस लोडशेडिंग असलेल्या छोट्या शहरांत टॉवर उभे राहिले तर लोकांनी वरचा मजला कसा गाठायचा?  टॉवरला पाणीपुरवठा करण्याइतपत पुरेशी यंत्रणा आहे का? टॉवर उभारले गेल्यावर खरोखरच लोकसंख्या वाढली तर कचरा व्यवस्थापनाचे काय करायचे?- असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. त्यामुळे हे धोरण अंमलात येताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल.

( लेखक वरिष्ठ सहायक संपादक आहेत )

टॅग्स :electricityवीजHomeघरGovernmentसरकार