शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

वीज नसेल, तर टॉवरचा ‘वरचा मजला’ कसा गाठायचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 05:44 IST

एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर झाल्याने चटईक्षेत्र निर्देशांकाचे घोटाळे कदाचित थांबतील; पण नागरी सुविधांचे काय?

संदीप प्रधान

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मुंबईवगळता राज्यभराकरिता एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली (युनिफाइड डीसीआर) लागू करण्यास मंजुरी दिली हे स्वागतार्ह पाऊल आहे. २०१२ सालापासून राज्य सरकार एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू करण्याबाबत बोलत होते. अखेर तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारला ते शक्य झाले. त्यामुळे आघाडीची अथवा महाआघाडीची सरकारे कुचकामी असतात, त्यांच्या काळात मोठे धोरणात्मक निर्णय होत नाहीत, असे दावे करणाऱ्या विरोधकांना  चोख उत्तर मिळाले आहे. या निर्णयामुळे चटईक्षेत्र निर्देशांकाच्या गैरवापराला चाप बसेल, नियमांच्या सुसूत्रीकरणामुळे राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नात वाढ होईल व वाढीव प्रमाणात घरे निर्माण झाल्याने घरांच्या किमती आटोक्यात येतील, असा राज्य सरकारचा दावा आहे.

या नियमावलीनुसार, १५० चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडधारकांना स्वत:च्या वापराच्या घराच्या बांधकामाकरिता स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसेल, तर ३०० चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडधारकांना अर्ज केल्यानंतर १० दिवसांत परवानगी देण्याची तरतूद आहे. मार्च २०१८ मध्ये या नियमावलीचा मसुदा जाहीर करून त्यावर हरकती व सूचना मागवल्या होत्या. याचा अर्थ मागील भाजप सरकारच्या काळात हे धोरण तयार झाले आणि महाविकास आघाडी सरकारने ते लागू केले. वरकरणी दोन्ही सरकारांमध्ये अनेक कारणास्तव मनभिन्नता  असली तरी बांधकाम क्षेत्रातील धोरणांवर एकमत आहे.  मुंबईखेरीज सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींकरिता ही नियमावली लागू होणार असल्याने भविष्यात क्लस्टर डेव्हलपमेंट व टाऊनशिप स्कीम यांना हे धोरण उपकारक ठरेल. त्यामुळे छोट्या शहरांमधील लहान बिल्डर बाजूला पडून मोठ्या शहरातील टाऊनशिप उभ्या करणाऱ्या बड्या बिल्डरांचे उखळ पांढरे होणार आहे.  सर्व शहरांमध्ये निवासी इमारतींना देय चटईक्षेत्र निर्देशांकाखेरीज ६० टक्के, तर व्यापारी इमारतींकरिता देय चटईक्षेत्र निर्देशांकाखेरीज ८० टक्के प्रोत्साहनपर चटईक्षेत्र निर्देशांक प्राप्त होणार आहे. अशा मोठ्या विकास योजनांमध्ये १५ टक्के क्षेत्र हे मनोरंजनाकरिता राखीव असेल. कागदावर हे धोरण अत्यंत सुंदर, आकर्षक दिसते, हे निर्णय जसेच्यातसे प्रत्यक्षात उतरले तर छोट्या शहरांचा नियोजनबद्ध विकास शक्य आहे.

अनेक छोट्या शहरांमध्ये बैठी घरे अथवा एक मजली बंगले बांधण्याची पद्धत सध्या रूढ आहे. घरासमोर अंगण, मागे शेत किंवा वाडी असे चित्र पाहायला मिळते. बहुमजली इमारतींमध्ये वास्तव्य करण्याची सवय व इच्छाशक्ती छोट्या शहरांमध्ये कमी आहे. अशा लोकांना टॉवरमधील घरांत कोंबणे हे त्यांची घुसमट करणारे ठरू शकते. चाळी किंवा बैठ्या झोपड्यांमध्ये आयुष्य काढलेल्या मुंबई-ठाण्यातील कुटुंबांचाही पुनर्विकासानंतर चार भिंतीत बंद जीवन जगताना जीव घुसमटतो. ठाणे, पुणे, डोंबिवली वगैरे शहरांत जागेची कमतरता असल्याने आकाशाच्या दिशेला इमले बांधून लोकांची घराची गरज भागवणे ही निकड आहे. त्यामुळे राज्यातील छोट्या शहरांमध्ये गरज असेल व लोकांची मानसिकता असेल तर आणि तरच बहुमजली इमारती उभ्या राहातील, शिवाय बहुमजली इमारत उभी करायची तर बांधकामाचा खर्च वाढतो. लिफ्ट, अन्य सुविधा द्याव्या लागतात. बहुमजली इमारत बांधली तर बिल्डरला जास्त नफा होणार हे दिसताच  जमीनमालकाची अतिरिक्त रकमेची मागणी वाढते. त्यामुळे बहुमजली इमारती छोट्या शहरांत उभ्या राहिल्या तर घरांच्या किमती कमी होतील हा दावा मिथक आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जळगाव असो 

सांगली-सातारा, अनेक शहरांत वीज, पाणी, कचरा यांच्या व्यवस्थापनाचे प्रश्न सुटलेले नाहीत. आठवड्यातील दोन दिवस लोडशेडिंग असलेल्या छोट्या शहरांत टॉवर उभे राहिले तर लोकांनी वरचा मजला कसा गाठायचा?  टॉवरला पाणीपुरवठा करण्याइतपत पुरेशी यंत्रणा आहे का? टॉवर उभारले गेल्यावर खरोखरच लोकसंख्या वाढली तर कचरा व्यवस्थापनाचे काय करायचे?- असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. त्यामुळे हे धोरण अंमलात येताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल.

( लेखक वरिष्ठ सहायक संपादक आहेत )

टॅग्स :electricityवीजHomeघरGovernmentसरकार