शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

अस्थानासारखी माणसे तपास यंत्रणांच्या सर्वोच्चस्थानी असल्यास न्याय मिळणं अवघडच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 02:55 IST

अस्थानासारखी माणसे सरकारच्या तपास यंत्रणांवरील सर्वोच्चस्थानी राहिली तर सामान्य जनतेला न्याय मिळण्याची शक्यताच संपत असते.

अस्थानासारखी माणसे सरकारच्या तपास यंत्रणांवरील सर्वोच्चस्थानी राहिली तर सामान्य जनतेला न्याय मिळण्याची शक्यताच संपत असते. त्यातही विरोधी पक्षांचे काम करणाऱ्या प्रामाणिक माणसांचाच त्यांच्याकडून छळ होण्याचा संभव अधिक असतो.सरकारी अधिकाºयांना व कर्मचाºयांना एखाद्या राजकीय पक्षाविषयी आस्था असणे समजण्याजोगे असले तरी त्या आस्थेचा परिणाम त्यांच्या सरकारी कामकाजावर होऊ नये हा प्रशासनाचा नियम आहे. असे असताना राकेश अस्थाना हे सीबीआय या सरकारी तपास यंत्रणेचे अधिकारीच भाजपच्या हितासाठी आपले पद राबवीत असतील तर ते प्रशासन व तपास यंत्रणा या दोहोंसाठीही अपात्र आहेत, असे म्हटले पाहिजे. मुळात पोलीस खात्यात असताना अस्थाना यांनी बिहारचे नेते लालूप्रसाद यांना लक्ष्य बनवून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांना चारा घोटाळ्यात गुन्हेगार ठरविले व त्यापैकी काहींना तुरुंगवास घडविला. तरीही ते सारे जनतेच्या पाठिंब्यावर विधिमंडळ व संसदेवर निवडून आले. पुढे अस्थाना यांना गुजरात कॅडरमध्ये घेतले तेव्हा त्यांच्याकडे गोध्रा हत्याकांडाचा तपास सोपविण्यात आला. या हत्याकांडानंतर त्या राज्यात उसळलेल्या धार्मिक दंगलीत दोन हजारांवर मुस्लिमांची कत्तल झाली. मात्र त्या आरोपातील सगळ्या गुन्हेगारांना सहीसलामत सोडून देण्याची व्यवस्था अस्थानांनी केलेल्या तपासात केली गेली. परिणामी, फासावर जाणारे, जन्मठेप होऊ शकणारे व वर्षानुवर्षांची सक्तमजुरी होऊ शकणारे सगळे आरोपी मोदींच्या व या अस्थानांचा जयजयकार करीत निर्दोष मुक्त झाले. आता या अस्थानांना सीबीआयचे सर्वोच्च पद देण्याचा बक्षिसी प्रयोग मोदींनी हाती घेतला आहे. मात्र नेमक्या याच वेळी त्यांच्या खात्याने त्यांच्यावर काही कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करून तसा गुन्हा त्यांच्याविरुद्ध दर्ज केला आहे. अस्थाना यांच्यावर मांस निर्यातदार मोईन कुरेशीकडून ३ कोटी रूपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे़ याच प्रकरणात सीबीआयचे एसआयटीचे अधिक्षक देवेंद्रकुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे़ सीबीआय हे सरकारच्या हातातील बाहुले आहे, असा आरोप सतत विरोधी पक्ष करत आलेला आहे़ विरोधी पक्ष ज्यावेळी सत्तेत येतात, त्यावेळी त्यांची वागणुकही तशीच असते़ अस्थाना यांच्यावरचा हा गुन्हा नोंदविण्यामागे मोदींची काही नवी नाराजी आहे की खात्यामधील अधिकाºयांची परस्पराविषयीची द्वेषभावना आहे, याचीच चर्चा सध्या देशात सुरू आहे. सीबीआय ही गुप्तपणे चौकशी करणारी सरकारी यंत्रणा आहे. तिचे वरिष्ठ अधिकारी संशयातित असणे आवश्यक आहे. कारण तिच्या तपासावरच आता देशाचा विश्वास राहिला आहे. पण अस्थाना प्रकरणाने त्या संस्थेच्या अब्रूची लक्तरे बाहेर आली आहे. राहुल गांधींनी या प्रकरणावर टीका करताना सरकारने सीबीआयची रया घालविली असे म्हटले तर भाजपचे माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी सीबीआयचा सरकारने नेहमीच राजकीय वापर केला, अशी टीका केली आहे. अस्थानासारखी माणसे सरकारच्या तपास यंत्रणांवरील सर्वोच्चस्थानी राहिली तर सामान्य जनतेला न्याय मिळण्याची शक्यताच संपत असते. त्यातही विरोधी पक्षांचे काम करणाºया प्रामाणिक माणसांचाच त्यांच्याकडून छळ होण्याचा संभव अधिक असतो. आजच्या घटकेला विरोधी नेत्यांविरुद्ध जे मोठमोठे दावे दाखल होत आहेत त्याच्या खरेपणाविषयीच जनतेच्या मनात संशय निर्माण होत असतो. तरीही कधी काळी मोदींच्या जवळचे असणारे व गुजरातमधील उजव्या विचाराच्या गुन्हेगारांना संरक्षण देणारे अस्थाना एका लाच प्रकरणात आरोपी ठरत असतील तर या प्रकरणाची सूत्रे खोलवर दडली आहेत हे लक्षात येते व त्याची चौकशीही तशीच होण्याची गरज असते. ज्या प्रकरणाचा वा गुन्हेगारीचा संबंध थेट देशाच्या सर्वोच्च नेत्यापर्यंत जोडला जात असेल तर त्याची चौकशी थातूरमातूर स्वरूपाची होऊन चालणार नाही. त्या आरोपांना गोलमोल उत्तरेही देता येणार नाहीत. अशा वेळी देशाच्या संसदेनेच आपल्या सभासदांची एक चौकशी समिती यासाठी नेमली पाहिजे व अमेरिकेतील समित्यांच्या कामकाजाप्रमाणे तिचेही कामकाज देशाला दाखविले पाहिजे. ज्या सरकारात मंत्री दोषी व वरिष्ठ अधिकारी अपराधी असतात त्याने इतरांवर केलेले आरोपही मग तथ्यहीन व सूडबुद्धीने केले असे वाटू लागते. सबब अस्थानांची सखोल चौकशी करून त्यात ते दोषी आढळल्यास त्यांना त्यांचे खरे स्थान दाखविलेच पाहिजे. असे झाले तरच जनतेचा सीबीआयवरचा विश्वास अबाधित राहिल़