शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

मानव

By admin | Updated: January 14, 2015 03:44 IST

मानव या शब्दामध्ये तीन अक्षरे आहेत. यामध्ये ‘मा’ म्हणजे अज्ञान, ‘न’ म्हणजे नष्ट करून, ‘व’ म्हणजे वर्तन करणारा! याचा पूर्ण अर्थ असा की, अज्ञान नष्ट करून वर्तन करणारा तो मानव!

अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले - मानव या शब्दामध्ये तीन अक्षरे आहेत. यामध्ये ‘मा’ म्हणजे अज्ञान, ‘न’ म्हणजे नष्ट करून, ‘व’ म्हणजे वर्तन करणारा! याचा पूर्ण अर्थ असा की, अज्ञान नष्ट करून वर्तन करणारा तो मानव! परंतु, प्रश्न असा आहे की, मानवाच्या ठिकाणी असलेले हे अज्ञान नष्ट करण्याकरिता मानवाने काय केले पाहिजे? योगवासिष्ठामध्ये वसिष्ठ मुनी अज्ञान नष्ट करण्याकरिता संतसंगती, शास्त्रश्रवण, स्वप्रयत्न अशा तीन मार्गांनी मानवाने स्वत:च्या ठिकाणचे अज्ञान नष्ट करावे, असे सांगतात. मानवाच्या सर्व दु:खाचे मूळ हे त्याचे आत्मस्वरूपाविषयीचे अज्ञान आहे, असे वेदांतशास्त्र स्पष्ट सांगते. हे अज्ञान घालविण्याकरिता ज्ञानाचीच गरज आहे आणि आत्मस्वरूपाविषयीचे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार हा फक्त मानव योनीलाच भगवंतांनी दिलेला आहे. वास्तविक विचार केला असता अलीकडच्या काळामध्ये मानवच मानवाला जाणत नाही, असेच आपल्याला दिसून येते. एका नावेमधून तीन मनुष्य नदीमध्ये विहार करायला निघाले. परंतु, अचानक मोठे वादळ आले आणि नाव पाण्यामध्ये बुडू लागली. तिघेही भगवंताचा धावा करू लागले. भगवान तिथे प्रकट झाले व तिघांकडेही पाहून भगवान म्हणाले की, मी कोणाही एकाला वाचवितो, बोला कोणाला वाचवू? त्यातील दोघे म्हणू लागले, देवा मला वाचवा. परंतु, तिसरा एका कडेला शांत बसलेला होता. भगवंतांनी त्याला विचारले, ‘तू काहीच बोलत नाही, तू सांग ना कोणाला वाचवायचे’, तो मनुष्य म्हणू लागला, ‘देवा मी ज्याला वाचव म्हणेन त्याला वाचवशील?’, देव म्हणाला, ‘हो वाचवेन’, सांग कोणाला वाचवायचे? तो मनुष्य म्हणाला, ‘देवा वाचवायचे असेल तर ‘वाचव मानवाला’!या कथेमध्ये इतर भाग जरी काल्पनिक असला तरी ‘वाचव मानवाला’ ही मात्र वस्तुस्थिती आहे. मानवाचे जीवन हे त्याच्या बाह्य संपत्तीवरून श्रेष्ठ ठरत नसून त्याच्या आंतरिक संपत्तीवरून श्रेष्ठ ठरत असते. त्या आंतरिक संपत्तीलाच संत ज्ञानेश्वर महाराजांनी दैवी संपत्ती असे म्हटले आहे. आंतरिक संपत्तीला सोडून मिळविलेली बाह्य संपत्ती ही मानवाच्या सुखाला कारण होऊ शकत नाही. बऱ्याच वेळा मनुष्य बाह्य संपत्तीने मोठा झाला की तो आपण मनुष्य आहोत, हेच विसरून जातो आणि मानवाचा दानव होतो आणि म्हणूनच मानव कोणत्याही क्षेत्रात कार्य करीत असला तरी त्याच्या मानवी जीवनाला अध्यात्म्याचा स्पर्श असावा, त्याचे ‘मन’ हे सत्वगुणी असावे, असे झाले तर संत निळोबाराय म्हणतात तसे,‘तनु मानवी दिव्य रुपीच केली।’ही अवस्था प्राप्त होईल.