शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

अभ्यासू नेता अकाली हरपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 06:27 IST

काँग्रेस पक्षात राहूनही स्वत:च्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जाणारे अभ्यासू आणि अचूक विश्लेषण करणारा नेते गुरुदास कामत यांचे अकाली जाणे प्रत्येकाला हुरहूर लावणारे आहे.

काँग्रेस पक्षात राहूनही स्वत:च्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जाणारे अभ्यासू आणि अचूक विश्लेषण करणारा नेते गुरुदास कामत यांचे अकाली जाणे प्रत्येकाला हुरहूर लावणारे आहे. एनएसयुआयच्या माध्यमातून युवकांची मोट बांधण्याचे काम करत त्यांनी काँग्रेसमध्ये काम सुरू केले. तरुणांना विश्वास देत त्यांनी केलेल्या कामामुळे ते पक्षात व तरुणांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाले. रजनी पटेल यांच्या तालमीत तयार झालेले गुरुदास सुरुवातीपासूनच ‘गुरु’ या नावाने लोकप्रिय होत गेले. या लोकप्रियतेनेच त्यांना युवक काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले. मुंबईतला तरुण शिवसेनेसोबत असतानाच्या काळात ‘गुरु’नी तरुणांना काँग्रेसकडे वळवण्यासाठी जाणीवपूर्वक काम केले. त्यांचा हाच गुण दिल्लीकरांना भावला. राजीव गांधी यांनी त्यांच्यातले हे वेगळेपण हेरले आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर कामत यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. पाचवेळा पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि मुंबईकरांनीही त्यांना निवडून दिले. आपल्या कामामुळे मुंबईत काँग्रेसचा चेहरा अशी त्यांची ओळख होत गेली. पक्षातल्या बड्या नेत्यांनी त्यांच्यावर कायम विश्वास टाकला. राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध जुळले. त्यामुळे दिल्लीच्या दरबारी राजकारणात ते चांगले रुळले. आजच्या काळात कोणता नेता कधी पक्ष बदलेल याचा काहीही नेम नसताना, गुरुदास यांनी पक्षासोबत टोकाची निष्ठा ठेवली. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. दिसायला अत्यंत रुबाबदार असे व्यक्तिमत्त्व आणि मराठी, इंग्रजी व हिंदी या तीनही भाषांवरचे प्रभुत्व या जशा ‘गुरु’ च्या जमेच्या बाजू होत्या तशीच कोणत्याही राजकीय घटनेचे अचूक विश्लेषण करण्याची त्यांची स्वत:ची अनोखी शैली होती. त्यामुळे ते माध्यमांना कायम सोर्स म्हणून जवळचे वाटू लागले. त्यातून त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. पक्षानेही त्यांना भरभरून दिले. देशाचे गृहराज्यमंत्रीही केले. मात्र मागेल ते मिळत आहे हे पाहून त्यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद मिळावे असे वाटू लागले. मात्र त्यांना दुय्यम खाते देऊ केले गेले. त्याचा राग मनात धरून त्यांनी शपथविधीलाच जाणे टाळले. तेथून त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा आली. ‘श्रद्धा आणि सबुरी’ या तत्त्वावर काँग्रेसचे राजकारण चालते. प्रतीक्षा करण्याची चिकाटी जेवढी जास्त तेवढे फळ जास्त असा एकंदरीत माहोल. जो पक्षाशी निष्ठावान राहतो त्याची पक्षात उशिरा का होईना कदर होतेच. ‘गुरु’कडे पक्षाविषयी, पक्षाच्या नेत्यांविषयी अमाप श्रद्धा होती, मात्र अभाव सबुरीचा होता. त्यानेच त्यांचे राजकीय नुकसानही केले. जुळवून घेण्याची वृत्ती न जोपासल्याचा फटका त्यांना बसला. त्यांच्या जाण्याने मुंबई काँग्रेसचा चेहरा नाहीसा झाला आहे.

टॅग्स :Gurudas Kamatगुरुदास कामतcongressकाँग्रेसMumbaiमुंबई