शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

अभ्यासू नेता अकाली हरपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 06:27 IST

काँग्रेस पक्षात राहूनही स्वत:च्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जाणारे अभ्यासू आणि अचूक विश्लेषण करणारा नेते गुरुदास कामत यांचे अकाली जाणे प्रत्येकाला हुरहूर लावणारे आहे.

काँग्रेस पक्षात राहूनही स्वत:च्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जाणारे अभ्यासू आणि अचूक विश्लेषण करणारा नेते गुरुदास कामत यांचे अकाली जाणे प्रत्येकाला हुरहूर लावणारे आहे. एनएसयुआयच्या माध्यमातून युवकांची मोट बांधण्याचे काम करत त्यांनी काँग्रेसमध्ये काम सुरू केले. तरुणांना विश्वास देत त्यांनी केलेल्या कामामुळे ते पक्षात व तरुणांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाले. रजनी पटेल यांच्या तालमीत तयार झालेले गुरुदास सुरुवातीपासूनच ‘गुरु’ या नावाने लोकप्रिय होत गेले. या लोकप्रियतेनेच त्यांना युवक काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले. मुंबईतला तरुण शिवसेनेसोबत असतानाच्या काळात ‘गुरु’नी तरुणांना काँग्रेसकडे वळवण्यासाठी जाणीवपूर्वक काम केले. त्यांचा हाच गुण दिल्लीकरांना भावला. राजीव गांधी यांनी त्यांच्यातले हे वेगळेपण हेरले आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर कामत यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. पाचवेळा पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि मुंबईकरांनीही त्यांना निवडून दिले. आपल्या कामामुळे मुंबईत काँग्रेसचा चेहरा अशी त्यांची ओळख होत गेली. पक्षातल्या बड्या नेत्यांनी त्यांच्यावर कायम विश्वास टाकला. राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध जुळले. त्यामुळे दिल्लीच्या दरबारी राजकारणात ते चांगले रुळले. आजच्या काळात कोणता नेता कधी पक्ष बदलेल याचा काहीही नेम नसताना, गुरुदास यांनी पक्षासोबत टोकाची निष्ठा ठेवली. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. दिसायला अत्यंत रुबाबदार असे व्यक्तिमत्त्व आणि मराठी, इंग्रजी व हिंदी या तीनही भाषांवरचे प्रभुत्व या जशा ‘गुरु’ च्या जमेच्या बाजू होत्या तशीच कोणत्याही राजकीय घटनेचे अचूक विश्लेषण करण्याची त्यांची स्वत:ची अनोखी शैली होती. त्यामुळे ते माध्यमांना कायम सोर्स म्हणून जवळचे वाटू लागले. त्यातून त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. पक्षानेही त्यांना भरभरून दिले. देशाचे गृहराज्यमंत्रीही केले. मात्र मागेल ते मिळत आहे हे पाहून त्यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद मिळावे असे वाटू लागले. मात्र त्यांना दुय्यम खाते देऊ केले गेले. त्याचा राग मनात धरून त्यांनी शपथविधीलाच जाणे टाळले. तेथून त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा आली. ‘श्रद्धा आणि सबुरी’ या तत्त्वावर काँग्रेसचे राजकारण चालते. प्रतीक्षा करण्याची चिकाटी जेवढी जास्त तेवढे फळ जास्त असा एकंदरीत माहोल. जो पक्षाशी निष्ठावान राहतो त्याची पक्षात उशिरा का होईना कदर होतेच. ‘गुरु’कडे पक्षाविषयी, पक्षाच्या नेत्यांविषयी अमाप श्रद्धा होती, मात्र अभाव सबुरीचा होता. त्यानेच त्यांचे राजकीय नुकसानही केले. जुळवून घेण्याची वृत्ती न जोपासल्याचा फटका त्यांना बसला. त्यांच्या जाण्याने मुंबई काँग्रेसचा चेहरा नाहीसा झाला आहे.

टॅग्स :Gurudas Kamatगुरुदास कामतcongressकाँग्रेसMumbaiमुंबई