शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासू नेता अकाली हरपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 06:27 IST

काँग्रेस पक्षात राहूनही स्वत:च्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जाणारे अभ्यासू आणि अचूक विश्लेषण करणारा नेते गुरुदास कामत यांचे अकाली जाणे प्रत्येकाला हुरहूर लावणारे आहे.

काँग्रेस पक्षात राहूनही स्वत:च्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जाणारे अभ्यासू आणि अचूक विश्लेषण करणारा नेते गुरुदास कामत यांचे अकाली जाणे प्रत्येकाला हुरहूर लावणारे आहे. एनएसयुआयच्या माध्यमातून युवकांची मोट बांधण्याचे काम करत त्यांनी काँग्रेसमध्ये काम सुरू केले. तरुणांना विश्वास देत त्यांनी केलेल्या कामामुळे ते पक्षात व तरुणांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाले. रजनी पटेल यांच्या तालमीत तयार झालेले गुरुदास सुरुवातीपासूनच ‘गुरु’ या नावाने लोकप्रिय होत गेले. या लोकप्रियतेनेच त्यांना युवक काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले. मुंबईतला तरुण शिवसेनेसोबत असतानाच्या काळात ‘गुरु’नी तरुणांना काँग्रेसकडे वळवण्यासाठी जाणीवपूर्वक काम केले. त्यांचा हाच गुण दिल्लीकरांना भावला. राजीव गांधी यांनी त्यांच्यातले हे वेगळेपण हेरले आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर कामत यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. पाचवेळा पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि मुंबईकरांनीही त्यांना निवडून दिले. आपल्या कामामुळे मुंबईत काँग्रेसचा चेहरा अशी त्यांची ओळख होत गेली. पक्षातल्या बड्या नेत्यांनी त्यांच्यावर कायम विश्वास टाकला. राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध जुळले. त्यामुळे दिल्लीच्या दरबारी राजकारणात ते चांगले रुळले. आजच्या काळात कोणता नेता कधी पक्ष बदलेल याचा काहीही नेम नसताना, गुरुदास यांनी पक्षासोबत टोकाची निष्ठा ठेवली. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. दिसायला अत्यंत रुबाबदार असे व्यक्तिमत्त्व आणि मराठी, इंग्रजी व हिंदी या तीनही भाषांवरचे प्रभुत्व या जशा ‘गुरु’ च्या जमेच्या बाजू होत्या तशीच कोणत्याही राजकीय घटनेचे अचूक विश्लेषण करण्याची त्यांची स्वत:ची अनोखी शैली होती. त्यामुळे ते माध्यमांना कायम सोर्स म्हणून जवळचे वाटू लागले. त्यातून त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. पक्षानेही त्यांना भरभरून दिले. देशाचे गृहराज्यमंत्रीही केले. मात्र मागेल ते मिळत आहे हे पाहून त्यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद मिळावे असे वाटू लागले. मात्र त्यांना दुय्यम खाते देऊ केले गेले. त्याचा राग मनात धरून त्यांनी शपथविधीलाच जाणे टाळले. तेथून त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा आली. ‘श्रद्धा आणि सबुरी’ या तत्त्वावर काँग्रेसचे राजकारण चालते. प्रतीक्षा करण्याची चिकाटी जेवढी जास्त तेवढे फळ जास्त असा एकंदरीत माहोल. जो पक्षाशी निष्ठावान राहतो त्याची पक्षात उशिरा का होईना कदर होतेच. ‘गुरु’कडे पक्षाविषयी, पक्षाच्या नेत्यांविषयी अमाप श्रद्धा होती, मात्र अभाव सबुरीचा होता. त्यानेच त्यांचे राजकीय नुकसानही केले. जुळवून घेण्याची वृत्ती न जोपासल्याचा फटका त्यांना बसला. त्यांच्या जाण्याने मुंबई काँग्रेसचा चेहरा नाहीसा झाला आहे.

टॅग्स :Gurudas Kamatगुरुदास कामतcongressकाँग्रेसMumbaiमुंबई