शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

अरविंद केजरीवाल यांचे हे ‘असे’ कसे झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 08:12 IST

ते आधी म्हणाले, मला पदाचा मोह नाही! ... मग मुख्यमंत्री झाले! लोकप्रतिनिधीने साध्या घरात राहावे, असा त्यांचा आग्रह होता. हल्ली त्यांना दोन बंगले पुरत नाहीत!

- कपिल सिबल

पंजाब निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारणाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्रीपदाची दुसरी कारकीर्द संपत आली असताना अमरिंदर सिंग यांनी काॅंग्रेस पक्षाची साथ सोडून भाजपशी हातमिळवणी केली. आजचे राजकारण हा विचारसरणीला कोणतेही स्थान नसलेला धंदा झाला आहे, दुसरे काय?

अमरिंदर भाजपकडे जाताच त्या पक्षाने त्यांचे स्वागतच केले. अमरिंदर यांच्या पैशातून भाजप आघाडी चालवेल, अधिक जागा लढवेल, हे उघडच होते. अकाली दूर गेले नसते तर भाजपने हे कधीही केले नसते. दुसरीकडे अकाली दल बसपाला बरोबर घेऊन अनुसूचित जातींची मते मिळविण्याच्या मागे लागले... आणि सर्वात शेवटी ‘आप’चे अरविंद केजरीवाल! त्यांच्याकडे पंजाबात गमवावे असे काहीच नाही!

केजरीवाल यांची एकूणच वर्तन-शैली हा भारतीय राजकारणातील अनैतिकतेचा नजारा आहे. आपण सत्तेचे भुकेले नाही, प्रामाणिक सरकार देऊ, भ्रष्टाचार संपविण्याची शपथ आपण घेतली आहे, असे सांगत केजरीवाल पंजाबभर फिरले. ऑगस्ट २०११ ते ऑगस्ट २०१२ या कालखंडात हेच केजरीवाल ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ अभियानात आघाडीवर होते. अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना स्वत:चा पाया रचायचा होता. आपण लोकांचे राजकारण करायला आलो आहोत, असे ते सांगत आले. आयुष्यात कधीही निवडणूक लढवणार नाही, कोणतेही पद घेणार नाही, आपल्याला राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, असे ते पूर्वी सांगत. तरीही  नोव्हेंबर २०१२मध्ये त्यांनी ‘आप’ची स्थापना केली. पाठोपाठ निवडणूक लढवून मुख्यमंत्री झाले. यातूनच केजरीवाल, त्यांचे राजकारण खरे कसे आहे ते कळते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध त्यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्यावर २०१५मध्ये त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली आणि ते लागोपाठ दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. खरंतर केजरीवाल यांच्यासाठी भ्रष्टाचार हा विषय आता मागे पडला आहे. तसे होणे स्वाभाविक होते, कारण ‘आप’च्या ६२पैकी ३८ आमदारांवर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत. आपचे ७३ टक्के आमदार करोडपती आहेत. अन्य राजकीय पक्षांवर त्यांनी पुराव्यांशिवाय आरोप केले आणि दावे दाखल होण्याच्या भीतीने नंतर माफी मागितली.

२०१३च्या डिसेंबर महिन्यात केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांना पत्र लिहून आपली सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची विनंती केली. ‘परमेश्वर मला सांभाळेल’, असे सांगितले. २०१८ साली सत्तेवर येताच बहुधा त्यांचा देवावर विश्वास राहिला नसावा. कारण मुख्यमंत्र्याला सुरक्षा देण्यात केंद्र कुचराई करत आहे, असा ठपका ठेवणारा ठराव त्यांनी विधानसभेत संमत करून घेतला. हा दुतोंडीपणा नव्हे तर काय?

अलीकडेच पंजाबात केजरीवाल म्हणाले, ‘आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्याकडे पैसे नाहीत. मान अत्यंत प्रामाणिक आहेत. माणूस आमदार झाला की, त्याच्याकडे मोठ्या गाड्या, बंगले दिसू लागतात. मान सात वर्ष खासदार आहेत पण भाड्याच्या घरात राहतात.’

२०१३ साली विधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल म्हणाले होते, ‘आप हा पक्ष व्हीआयपी संस्कृतीच्या विरोधात असून, मी मुख्यमंत्री झालो तर साध्या घरात राहीन,  सरकारी गाडी वापरणार नाही. लोकप्रतिनिधींनी प्रशस्त बंगल्याऐवजी वन बेडरूम सदनिकेत राहिले पाहिजे. सुरक्षा कवच त्यांनी घेऊच नये.’ 

याच केजरीवाल यांनी शपथ घेतल्यावर दोनच दिवसात  शेजारी-शेजारी असलेले पाच खोल्यांचे दोन बंगले मागितले. सध्या केजरीवाल सिव्हिल लाईन्समधल्या सरकारी बंगल्यात राहतात आणि बंगल्याच्या नूतनीकरणासाठी ८.६१ कोटी रुपयांची निविदा नुकतीच काढण्यात आली आहे. आणि हेच केजरीवाल पंजाबातल्या मतदारांना ‘हे फुकट, ते फुकट’ असे सांगत सुटले आहेत... अर्थात त्यांच्या पक्षाचे सरकार आले तर!

या देशातल्या राजकारणाबद्दल बोलावे तेवढे थोडे आहे. आपले नेते भूतकाळात रमतात आणि दुतोंडी बोलतात. जे बोलतात ते त्यांना कधीच अभिप्रेत  नसते. आघाड्या बदलणे, विचारप्रणालीच नसणे, निव्वळ संधीसाधूपणा आणि जातींचे राजकारण असाच सगळा मामला चालतो. सामान्य लोकांशी त्यांना देणे-घेणे उरलेले नाही! 

टॅग्स :PoliticsराजकारणArvind Kejriwalअरविंद केजरीवालkapil sibalकपिल सिब्बल