शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

खाकी वर्दीच्या कॉलरला हात घालण्याची हिंमत कशी  होते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 06:26 IST

Police : लॉकडाऊनच्या काळात मुंबईत एका महिलेने पोलिसाला केलेली मारहाण अवघ्या राज्याने पाहिली.

- रवींद्र राऊळ(उप वृत्तसंपादक, लोकमत, मुंबई)

खाकी वर्दीचा धाक उतरणीला लागला असून, दिवसेंदिवस वाढत असलेले पोलिसांवरील हल्ले ही कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी बाब ठरत आहे. वाळूमाफिया, गुन्हेगारांकडून पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना घडतच असतात. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून संचारबंदीचा आदेश अमलात आणणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर सर्वसामान्यांकडून हल्ले झाल्याच्या तब्बल सातशे घटना नोंदल्या गेल्या आहेत. सामाजिक स्वास्थ्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. 

पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रकार पाहिले तर त्यामागची कारणे वेगवेगळी दिसतात. मरीन ड्राइव्ह येथे नाकाबंदीत अडवल्याच्या रागाने माथेफिरू तरुणाने थेट बॅगेतून कोयता काढून पोलीस अधिकाऱ्यांवर वार केले. अंबरनाथ पोलीस ठाण्याबाहेरच एकाने पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. एका घटनेत वाहतूक पोलिसालाच आपल्या गाडीच्या बोनेटवर घेऊन वेगाने गाडी चालवणाऱ्या आणि सोबत दोन दुचाकीस्वारांना जखमी करणाऱ्या चालकाचा व्हिडिओ समोर आला, तर सोलापूरमध्ये एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालण्यात आल्याचा प्रकार घडला. लॉकडाऊनच्या काळात मुंबईत एका महिलेने पोलिसाला केलेली मारहाण अवघ्या राज्याने पाहिली. वांद्रे येथे दोघा अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवताना अडवल्याने पोलिसावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. 

कोरोनाच्या काळातील पोलिसांची कामगिरी निर्विवाद वाखाणण्याजोगी आहे. नियम पाळण्यास भाग पाडत असल्याच्या रागातून पोलिसांना मारहाण होण्याचे असंख्य प्रकार या काळात घडले. मात्र, याचवेळी नागरिकांना कायदे पाळण्याची सक्ती करताना त्यांच्याशी कसे वर्तन करावे, याचेही भान पोलिसांनी बाळगणे आवश्यक आहे. कायदेशीर कारवाईचा मार्ग  न अवलंबता समोरच्याचा पाणउतारा करणे, अवमानकारक बोलणे, शिवीगाळ करणे, प्रसंगी मारहाण करत त्याचा आत्मसन्मान जाणीवपूर्वक ठेचणे, असे प्रकार पोलिसांकडून  होत असतात.

अनेकदा पोलीस नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी नाहक मारहाण करतात. कर्तव्यावरील पोलिसाने केलेली मारहाण दखलपात्र गुन्हा ठरत नसल्याचा पुरेपूर फायदा घेतला जातो. पोलिसांच्या नागरिकांसोबतच्या वर्तणुकीत सुधारणा होण्याच्या विषयाची चर्चा अनेक दशके सुरू आहे.  आवश्यक पथ्ये पाळण्याचे तंत्र, जमावाचे मानसशास्त्र हेरत कर्तव्य बजावणे पोलीस प्रशिक्षणात समाविष्ट केले गेले पाहिजे. मात्र, कामाच्या धबडग्यात अडकलेल्या वरिष्ठांना याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, असे चित्र आहे. पोलीस अ‍ॅट्रॉसिटी हा एक गंभीर विषय आहे.  वर्दीचा गैरफायदा घेत पोलीस किती अत्याचार करतात, हे गुपित नाही. तशा अनेक तक्रारी रेकॉर्डवर येत असतात; पण किती तक्रारींची तड लागते, किती दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होते, हा संशोधनाचा विषय आहे. निलंबन, चौकशीच्या फेऱ्यात चौकशी अधिकारी ‘डिपार्टमेंटचा माणूस’ म्हणून दोषी अधिकाऱ्यांना कसे पाठीशी घालतात, हेही उघड आहे. 

पोलिसांवर हल्ल्याचे काही पॅटर्न आहेत.  टोल नाक्यावरच्या अवैध वसुलीला वैतागून पोलिसांवर हल्ले होतात. वाळू तस्करीमध्ये  राजकीय नेते, ठेकेदार यांना प्रत्यक्षात पोलिसांचेच सहकार्य मिळते.  आंदोलन, मोर्चे, दंगली आदी ठिकाणी  केवळ गर्दीसाठी जमवलेल्या समाकंटकांकडून पोलिसांना सामूहिक मारहाण झाल्याची उदाहरणे आहेत. पोलिसांचा अपमान करण्यात सर्वाधिक आघाडीवर कोणी असेल तर ते राजकीय नेते. या प्रत्येकाचीच ‘आपण म्हणजेच कायदा’ अशी मानसिकता असते.  पोलीस कर्मचाऱ्याला मारझोड करणे, शिवीगाळ करणे, पोलीस म्हणजे आपले खासगी नोकर असल्यासारखे वागणाऱ्यांना कायद्याचा धाक  नसतो.  पोलिसांवर हात उचलणाऱ्यांमध्ये महिलांची वाढलेली संख्या ही सामाजिक दृष्टीने चिंतेची बाब ठरू लागली आहे.

कायदे कितीही कडक झाले तरी अंमलबजावणीतील त्रुटी जोपर्यंत दूर होत नाहीत, तोपर्यंत  पोलिसांचा धाक कोणालाच वाटणार नाही. अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राने एकजुटीने मुंबई, राज्य पोलिसांच्या सन्मानार्थ  आवाज उठवला होता.  पोलिसांचा आणि वर्दीचा हा सन्मान टिकायला हवा. 

टॅग्स :Policeपोलिस