शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

संस्कृतीचा प्राण जपण्याची आशा!

By किरण अग्रवाल | Published: December 09, 2017 5:07 AM

समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक उन्नयनाच्या विचारांचे मंथन ज्यात घडावे असे अपेक्षित आहे, त्या कुंभमेळ्याचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समावेश केला गेल्याने संस्कार व सामाजिक उद्बोधनाचा प्रवाह अविरत

समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक उन्नयनाच्या विचारांचे मंथन ज्यात घडावे असे अपेक्षित आहे, त्या कुंभमेळ्याचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समावेश केला गेल्याने संस्कार व सामाजिक उद्बोधनाचा प्रवाह अविरत, अखंडित राहण्याबरोबरच संस्कृतीचा प्राण जपला जाण्याची अपेक्षाही बळावून गेली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.देशातील अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन व नाशिक-त्र्यंबकेश्वर क्षेत्री दर बारा वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा दिवसेंदिवस ‘हायटेक’ होत चालल्याने तशीही त्याची कीर्ती जागतिक पातळीपर्यंत पोहोचली आहेच. ‘विरक्ती’चा उपदेश करीत अत्याधुनिक सुख-सुविधांत रमणाºया आणि तीर्थाची थोरवी सांगत असतानाच स्वत: मात्र बाटलीबंद पाण्याचा वापर करणाºया बाबा आणि त्यांच्या चेल्यांच्या अनेकविध कथांनी कुंभमेळ्याच्या कीर्तीत अधिकचीच भर घातली आहे. कुंभमेळ्यातील साधू-महंतांचे वर्तन व व्यवहार चर्चित ठरत असतानाच त्यांच्या असण्यापेक्षा ‘दिसण्या’चीही चर्चा मोठ्या प्रमाणात झडत असते. त्यामुळेही अलीकडच्या काळात कुंभमेळ्याला गर्दी उलटून ‘जत्रे’चे स्वरूप प्राप्त होत गेले. तो केवळ आध्यात्मिक सोहळा न राहता शासकीय यंत्रणांच्या व भाविकांच्या दृष्टीनेही ‘इव्हेंट’ ठरू लागला आहे. अशा या सोहळ्याला आता ‘युनेस्को’च्या यादीत स्थान मिळाल्याने कुंभमेळ्याला अधिकृतरीत्या जागतिक परिमाण लाभणार आहे. कुंभस्थळांच्या पर्यटन विकास व वृद्धीच्या दृष्टीने तर ही बाब महत्त्वाची ठरावीच; पण त्याशिवाय सिंहस्थ कुंभपर्वाच्या योजनेमागे अभिप्रेत असलेल्या संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने उपायात्मक गोष्टी घडून येण्याचीही अपेक्षा यानिमित्ताने पुन्हा बळावून जाणे स्वाभाविक ठरून गेले आहे.कुंभमेळ्याला आज भलेही काहीसे वेगळे रूप व स्वरूप आलेले दिसत असले तरी, समाजाच्या सर्वांगीण उन्नयनाच्या सम्यक कृतीचा एक प्रवाह म्हणून त्याकडे पाहिले गेले आहे. मनुष्याला अशाश्वताकडून शाश्वताकडे, सांताकडून अनंताकडे व ध्येयशून्यतेकडून ध्येयवादाकडे नेणाºया संस्कृतीचे विचारमंथन होणे, त्यातून अध्यात्माधिष्ठित समाजाच्या धारणा अधिक दृढ होणे व पर्यायाने संस्कृती संवर्धनाचे मूळ प्राणतत्त्व जपले जाणे अभिप्रेत आहे. आज हे तसे अपवादानेच घडते. बुवा-बाबांच्या चमत्कृतींपुढे साधू-सन्याशांचे अध्यात्म मागे पडते. आजचे भक्त दिखाऊपणाला भुलतात त्यामुळे परंपरांमागील हेतंूचाच संकोच झाल्याखेरीज राहात नाही. साधूंचे ‘जलवे’ पाहून झाले व गंगा-गोदास्नानाची तिसरी पर्वणी आटोपली की सारेच कसे एकदम रिते झाल्यासारखे भासते, यामागील कारणही हेच की कुंभमेळ्याच्या आयोजनामागील अध्यात्माची बैठक मोडताना दिसून येते आहे. या लयास जाऊ पाहणाºया अगर क्षीण होऊ पाहणाºया ‘नाळे’ला बळकटी देण्याचे काम ‘युनेस्को’च्या सहभागामुळे घडून येत असते. भारतातील वैदिक मंत्रोच्चार परंपरा, मणिपूर नृत्य, छाऊ नृत्य आदींच्या यापूर्वीच्या समावेशाने ते दिसूनही येते. त्यामुळेच ‘ग्लॅमर’च्या डोळे दिपवून सोडणाºया वावटळीत अंग चोरून तग धरू पाहणारा मूळ संस्कृतीच्या संवर्धनाचा प्रवाह कुंभमेळ्याचाही ‘युनेस्को’च्या ऐतिहासिक वारसा यादीतील समावेशाने अधिक प्रशस्त होण्याची आशा जागली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक