शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

आत्मविश्वासाचा राजमार्ग

By admin | Updated: January 18, 2015 00:31 IST

शालेय-महाविद्यालयीन जीवनात सर्वाधिक गरज भासते ती म्हणजे आत्मविश्वास आणि एकाग्रतेची.

योग विषय अनुभवजन्य असल्याने लहान मुलांना तो अनुभव जरुर द्या. मुलांच्या निमित्ताने त्यांच्या पालकांनीही योग हे प्रकरण नेमके आहे तरी काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आत्तापर्यंत ओळख न झालेला एक असा विषय समजेल, ज्यामुळे आयुष्याला वेगळी कलाटणी मिळेल. नावीन्याचा ज्यांना शोध आहे, अनुभव घेण्याची ज्यांना इच्छा आहे, अशा प्रयोगशील पालकांनीही योग विषयाचा अनुभव जरूर घ्यावा. आनंदाने जगण्याचा एक प्रशस्त मार्ग यातून निश्चितपणे मिळेल, याची खात्री बाळगा. पालक आणि पाल्य यांच्यातील संवादालाही यातून बळ मिळेल, संवाद अधिक सशक्त होईल. शालेय-महाविद्यालयीन जीवनात सर्वाधिक गरज भासते ती म्हणजे आत्मविश्वास आणि एकाग्रतेची. एकावेळी अनेक विषयांचा अभ्यास, शाळा-क्लासेस, खेळ, मित्र-मैत्रिणी, सहली, परीक्षा, सुट्ट्या, पुन्हा परीक्षा हे चक्र सुरूच असते. हे करीत असताना प्रत्येक ठिकाणी स्पर्धा ही ओघानेच आली. आत्मविश्वास कुठल्याही स्थितीत ढळू न देता एकाग्रतेने सगळ्या परीक्षांना सामोरे जाऊन त्यात यश मिळविणे हे शालेय-महाविद्यालयीन आयुष्यातील आव्हान असते. त्यामुळे या काळात निर्माण होणाऱ्या ताणाचेही नियोजन व्यवस्थित व्हायला हवे. किंबहुना ताण निर्माण न होता, कशा पद्धतीने सकस असे यश मिळवता येईल, यावर सध्या मोठे संशोधन सुरू आहे. योग विषयक अभ्यासामुळे ताणतणावांना दूर सारून निर्भेळ असे यश मिळवता येणे शक्य असल्यावर जगभरातील आरोग्य आणि शालेय शिक्षणात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे एकमत होत आहे. स्वत:च्या अंगी मूलभूत क्षमता असतानादेखील केवळ आत्मविश्वासाची कमतरता असल्याने विद्यार्थी एखादी गोष्ट करण्यासाठी धजावतात. शाळा अथवा महाविद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आवाहन केले जाते. तेव्हा क्षमता असूनही काही विद्यार्थी मागे राहतात. मात्र त्या वेळी पाल्यांशी पालकांचा संवाद अत्यंत आवश्यक आहे. या संवादातूनच पाल्यांमध्ये आत्मविश्वासाची पातळी कमी असल्याचे त्यांच्या लक्षात येऊ शकते. बहुतांशवेळा ही बाब त्या-त्या मुलांना लक्षात येण्याची शक्यता फारच कमी आहे. पहिले पालक आणि दुसरे शिक्षक यांना ही बाब लक्षात यायलाच हवी. अन्यथा अनेक छोटी रोपटी मोठे वृक्ष कधी बनूच शकणार नाहीत. लहानपणापासून योगविषयक आवड निर्माण झाली तर स्वत:तील जाणिवांचा विकास होतो. त्यामुळे साधारण नववी-दहावीतील विद्यार्थ्यांनादेखील आपण आत्मविश्वास आणि एकाग्रतेत कोठे कमी पडतो, हे समजणे शक्य आहे. योगाच्या अभ्यासातून या प्रश्नांवर हे विद्यार्थीदेखील स्वत: मार्ग काढू शकतात. तेवढ्या जाणिवा विकासनासाठी मात्र त्यांना योगाची आवड निर्माण करून त्यात गती निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. आयुष्यातील पाया म्हणजे शालेय जीवन. ही पायाभरणी संपूर्ण आयुष्यात पदोपदी तुम्हाला मार्ग दाखवत असते. आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या कार्यशाळांना मिळणारा प्रतिसाद आणि त्यात सहभागी होणाऱ्यांचे वय तपासले तरी ही बाब सहज लक्षात येतील. वय १२-१३ ते वय वर्षे ६५-७०पर्यंतच्या व्यक्तीही आत्मविश्वास कार्यशाळांमध्ये सहभागी होतात, आत्मविश्वास वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. चढउतार हे आयुष्यात असतातच. यश जसे आयुष्याचा भाग आहे तसेच अपयशदेखील येते. पण यशात हुरळून न जाता आणि अपयशात खचून न जाता पुढे जात राहणे अत्यावश्यक आहे. ‘योग’ शिक्षणातून यश आणि अपयश या दोन्ही विषयांकडे समदृष्टीने पाहण्याची क्षमता विकसित होते. शालेय जीवनात हे बाळकडू मिळल्यास अधिक क्षमतेने दोन्ही स्थितींमध्ये मार्गक्रमण सुरू राहते.