शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

यहाँ के हम सिकंदर !

By गजानन दिवाण | Updated: August 31, 2018 13:43 IST

अधिकारी असो वा राजकारणी, या शहरात काहीही केले तर चालते, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. हे सर्व जण स्वत:ला या शहराचे जणू ‘सिकंदर’ समजू लागले आहेत.

औरंगाबाद शहराचे सर्वांत मोठे दु:ख काय असेल, तर या शहराचे स्वत:चे आपले म्हणून असे कोणीच नाही. सर्वसामान्य नागरिक, राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यातील कोणालाही या शहराबद्दल आपलेपण नाही. त्यामुळे शहरातील कुठल्याच समस्येवर कायमचा तोडगा निघत नाही. राजकारणी स्वत:चे हित पाहतात. अधिकाऱ्यांना तीन वर्षे काढायची असतात आणि सर्वसामान्यांना स्वत:च्या जगण्यापलीकडे काहीच दिसत नाही.

अनेक महिन्यांपासून कच-याचा प्रश्न मार्गी न लागल्याने शहराची अक्षरश: कचराकुंडी झाली आहे. आता या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी ब्लॅक लिस्टेड कंपनीची निवड झाली आहे. ‘समांतर’चा घोळ अनेक वर्षांपासून सुरू असून, जायकवाडीत साठा असतानाही औरंगाबादकरांना वेळेवर पाणी मिळत नाही. या योजनेनंतर हा प्रश्न मिटेल, असे गृहीत धरले तरी नागरिकांना प्रचंड मोठी पाणीपट्टी मोजावी लागणार आहे. इन मीन दोन मोठे रस्ते असलेल्या या स्मार्ट सिटीत सुरळीतपणे साधी शहर बस धावत नाही. प्रत्येक समस्येचे हे असेच आहे. स्वत:चे हित जिथे दिसते तोच प्रश्न राजकारण्यांकडून उचलला जातो. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही सारखेच. विरोध कशाला आणि समर्थन कशाचे याचेही गणित ठरलेले असते. दोघांचाही उद्देश एकच. शहराच्या विकासाला हा मोठा अडसर आहेच. त्याहीपेक्षा मोठा धोका येथील सर्वसामान्य मानसिकतेचा आहे. कितीही-काहीही झाले तरी फार-फार तर सोशल मीडियावर व्यक्त होण्यापलीकडे औरंगाबादकर काहीच करीत नाहीत.

अधिकारी असो वा राजकारणी, या शहरात काहीही केले तर चालते, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. हे सर्व जण स्वत:ला या शहराचे जणू ‘सिकंदर’ समजू लागले आहेत. गणपती बाप्पाचे आगमन १५ दिवसांवर आले आहे. शहरातील सर्व खड्डे तोपर्यंत बुजविले जातील, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. ते बुजविले तरी आम्ही गणेशोत्सव दणक्यात साजरा करू आणि नाही बुजविले तरी दणक्यातच करू; पण पालिकेला जाब विचारण्याचे कष्ट घेणार नाही.

सहा महिन्यांपूर्वीच झोननिहाय डागडुजीच्या निविदा काढून साडेचार कोटी रुपये उधळण्यात आले. मोठा पाऊस होण्याआधीच पुन्हा खड्डे पडले. गेल्यावर्षीही पावसाळ्यात शहरभर खड्डे पडले होते. मनपा पदाधिका-यांनी प्रत्येक झोनमध्ये ५० लाख रुपयांच्या निविदा काढण्यास प्रशासनाला भाग पाडले. संपूर्ण शहरात केवळ ३० ते ४० टक्केच काम झाले. गेल्या पाच वर्षांत महापालिकेने केवळ खड्डे बुजविण्याच्या नावाखाली २० कोटींहून अधिक रकमेची उधळपट्टी केली. आता पुन्हा नव्याने निविदा काढली जाईल. आपल्या माणसाला काम दिले जाईल. थातूरमातूर काम करून गणेशोत्सवापुरते खड्डे बुजतीलही. एक पाऊस होताच पुन्हा खड्डे दिसू लागतील. गेल्या अनेक वर्षांपासून हे असेच सुरू आहे. ते करतील तीच पूर्व दिशा. तेच या शहराचे सिकंदर. कोण विचारेल जाब त्यांना?

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाPoliticsराजकारण