शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

यहाँ के हम सिकंदर !

By गजानन दिवाण | Updated: August 31, 2018 13:43 IST

अधिकारी असो वा राजकारणी, या शहरात काहीही केले तर चालते, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. हे सर्व जण स्वत:ला या शहराचे जणू ‘सिकंदर’ समजू लागले आहेत.

औरंगाबाद शहराचे सर्वांत मोठे दु:ख काय असेल, तर या शहराचे स्वत:चे आपले म्हणून असे कोणीच नाही. सर्वसामान्य नागरिक, राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यातील कोणालाही या शहराबद्दल आपलेपण नाही. त्यामुळे शहरातील कुठल्याच समस्येवर कायमचा तोडगा निघत नाही. राजकारणी स्वत:चे हित पाहतात. अधिकाऱ्यांना तीन वर्षे काढायची असतात आणि सर्वसामान्यांना स्वत:च्या जगण्यापलीकडे काहीच दिसत नाही.

अनेक महिन्यांपासून कच-याचा प्रश्न मार्गी न लागल्याने शहराची अक्षरश: कचराकुंडी झाली आहे. आता या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी ब्लॅक लिस्टेड कंपनीची निवड झाली आहे. ‘समांतर’चा घोळ अनेक वर्षांपासून सुरू असून, जायकवाडीत साठा असतानाही औरंगाबादकरांना वेळेवर पाणी मिळत नाही. या योजनेनंतर हा प्रश्न मिटेल, असे गृहीत धरले तरी नागरिकांना प्रचंड मोठी पाणीपट्टी मोजावी लागणार आहे. इन मीन दोन मोठे रस्ते असलेल्या या स्मार्ट सिटीत सुरळीतपणे साधी शहर बस धावत नाही. प्रत्येक समस्येचे हे असेच आहे. स्वत:चे हित जिथे दिसते तोच प्रश्न राजकारण्यांकडून उचलला जातो. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही सारखेच. विरोध कशाला आणि समर्थन कशाचे याचेही गणित ठरलेले असते. दोघांचाही उद्देश एकच. शहराच्या विकासाला हा मोठा अडसर आहेच. त्याहीपेक्षा मोठा धोका येथील सर्वसामान्य मानसिकतेचा आहे. कितीही-काहीही झाले तरी फार-फार तर सोशल मीडियावर व्यक्त होण्यापलीकडे औरंगाबादकर काहीच करीत नाहीत.

अधिकारी असो वा राजकारणी, या शहरात काहीही केले तर चालते, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. हे सर्व जण स्वत:ला या शहराचे जणू ‘सिकंदर’ समजू लागले आहेत. गणपती बाप्पाचे आगमन १५ दिवसांवर आले आहे. शहरातील सर्व खड्डे तोपर्यंत बुजविले जातील, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. ते बुजविले तरी आम्ही गणेशोत्सव दणक्यात साजरा करू आणि नाही बुजविले तरी दणक्यातच करू; पण पालिकेला जाब विचारण्याचे कष्ट घेणार नाही.

सहा महिन्यांपूर्वीच झोननिहाय डागडुजीच्या निविदा काढून साडेचार कोटी रुपये उधळण्यात आले. मोठा पाऊस होण्याआधीच पुन्हा खड्डे पडले. गेल्यावर्षीही पावसाळ्यात शहरभर खड्डे पडले होते. मनपा पदाधिका-यांनी प्रत्येक झोनमध्ये ५० लाख रुपयांच्या निविदा काढण्यास प्रशासनाला भाग पाडले. संपूर्ण शहरात केवळ ३० ते ४० टक्केच काम झाले. गेल्या पाच वर्षांत महापालिकेने केवळ खड्डे बुजविण्याच्या नावाखाली २० कोटींहून अधिक रकमेची उधळपट्टी केली. आता पुन्हा नव्याने निविदा काढली जाईल. आपल्या माणसाला काम दिले जाईल. थातूरमातूर काम करून गणेशोत्सवापुरते खड्डे बुजतीलही. एक पाऊस होताच पुन्हा खड्डे दिसू लागतील. गेल्या अनेक वर्षांपासून हे असेच सुरू आहे. ते करतील तीच पूर्व दिशा. तेच या शहराचे सिकंदर. कोण विचारेल जाब त्यांना?

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाPoliticsराजकारण