शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

मिठाच्या व्यसनामुळे हार्ट ॲटॅक! कशामुळे वाढते मीठ? आणि यावर उपाय काय?

By संतोष आंधळे | Updated: April 9, 2023 05:46 IST

आपण दिवसभरात किती मीठ खाल्ले, या प्रश्नाचे आपल्याला उत्तर देता येणार नाही. कारण आपल्याकडे कुणीही मोजून मापून मीठ खात नाही.

आपण दिवसभरात किती मीठ खाल्ले, या प्रश्नाचे आपल्याला उत्तर देता येणार नाही. कारण आपल्याकडे कुणीही मोजून मापून मीठ खात नाही. चवीला लागेल तेवढं मीठ आपण खात असतो. मिठाशिवाय जेवण, अशी कल्पना आपण करणार नाही. मात्र, याच मिठाच्या आपण इतके आहारी गेलो आहोत की, आपल्याला मिठाचे व्यसन लागले आहे, हे आपल्या ध्यानीमनीही येत नाही. या अतिरिक्त मिठाच्या सेवनाचा परिणाम थेट आपल्या हृदय आणि किडनीवर होतो. 

जागतिक आरोग्य परिषदेने मिठाचे सेवन किती करावे, याची मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. त्यानुसार दररोज ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. मात्र, अनेक वैद्यकीय संशोधन अहवालातून भारतीय माणूस सरासरी १० ते १२ ग्रॅम मीठ खात असल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ आपण दुपटीने मीठ खात आहोत. या अतिरिक्त मिठाच्या सेवनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन उच्च रक्तदाबाच्या (हायपरटेंशन) समस्येला आपल्याला सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबाचे रुग्ण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सर्वसाधारण पन्नाशीनंतर होणारा हा आजार आता तिशीच्या तरुणांना होताना दिसत आहे. आधुनिक जीवनशैलीतून हे सर्व प्रकार उदयास आले आहेत.

काही लोक जेवताना भाजीत अतिरिक्त मीठ घेतात. तसेच आधुनिक जीवनशैलीमुळे फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात मिठाचे प्रमाण असते. अनेक वेळा प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये चवीसाठी मीठ टाकावेच लागते.

रक्ताभिसरणासाठी रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसा जोर व दाब असणे आवश्यक असते. त्यात बिघाड झाल्यास त्याचा परिणाम हृदयाच्या आणि मेंदूच्या कार्यावर होऊ शकतो. यकृताचे विकार झाल्यानंतरसुद्धा मिठाच्या सेवनावर मर्यादा येतात. सुरुवातीच्या काळात रक्तदाबाची लक्षणे फारशी जाणवत नाहीत. मात्र, नंतर त्याचा त्रास जाणवण्यास सुरुवात होते.

कोणते आजार होऊ शकतात?- हृदयविकार- लठ्ठपणा- मेंदू विकार- उच्च रक्तदाब- किडनीचे विकारकशामुळे वाढते मीठ? मीठ अन्नपदार्थ टिकवण्यासाठी वापरले जात असल्याने वाळवण्याचे पदार्थ, पापड, लोणची यात मिठाचे प्रमाण अधिक असते.पॅकबंद अन्नपदार्थ उदा. वेफर्स, खारवलेल्या डाळी, खारवलेले काजू- पिस्ते, खारे शेंगदाणे, नाचोज, सॉसेस, शेजवानसारख्या चटण्या, वेगवेगळे स्प्रेड. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ उदा. चीज, बटर, मियॉनिज, ज्यूस आदी. रेडी टू कूक पदार्थांत पराठे, ग्रेव्ही असलेल्या भाज्या, टिक्की, कटलेट, बटाटा- मका - वाटाणे यांच्यापासून तयार केलेले व तळलेले पदार्थ.

 हे करा ! न शिजलेले मीठ, हे कच्चे मीठ मानले जाते. ते जास्त हानिकारक मानले जाते.समुद्री मिठापेक्षा सैंधव मीठ (खाणीतील), काळेमीठ (जमिनीतील), सरोवरातील (सांबरलवण), खाजणातील (बीडलवण) मीठ आलटून-पालटून वापरावे, असेही सुचवले जाते.

धोका किती? मिठाचा अतिरिक्त वापर कमी केला, तर दरवर्षी जगभरात १० लाख लोकांचा वेगवेगळ्या आजारांपासून जीव वाचू शकतो.रेडू टू कूक पदार्थ, फास्ट फूड, हॉटेलांतील पदार्थ, रस्तोरस्ती मिळणारे पदार्थ यातील मिठाचा सढळ वापर कमी करायला हवा.मेक्सिको, मलेशिया, सौदी अरेबिया, स्पेन, ब्राझील, चिली, झेक रिपब्लिक, लिथुआनिया, उरुग्वे आदी देशांनी मिठाचा वापर कमी करण्यात पुढाकार घेतला आहे.

जागतिक आरोग्य परिषदेने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. त्यापेक्षा रोज दुपटीने मीठ खाणे, हे व्यसन नाही तर काय आहे? सोडियमचे शरीरातील अतिरिक्त प्रमाण हे घातकच आहे. याबाबत आम्ही विशेष करून हृदयविकारांच्या रुग्णांना समुपदेशन करत असतो. आपल्याकडे लहानपणापासून केक, बिस्कीट, जंकफूड मुलांना खायला दिली जातात. यामध्ये मीठ मोठ्या प्रमाणात असते. - डॉ. विजय डिसिल्व्हा, संचालक, क्रिटिकल केअर विभाग, एशियन हार्ट इन्स्टिट्यूटआम्ही रुग्णांना रोज केवळ ३ ते ४ ग्रॅम मीठ खाण्याची परवानगी देतो. हे प्रमाण जागतिक आरोग्य परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षाही कमी आहे. किडनीचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर जास्त मीठ खाणे टाळले पाहिजे. मीठ पचविण्यास किडनीला अतिरिक्त परिश्रम घ्यावे लागतात. त्यामुळे मीठ कमी खाणेच योग्य आहे.- डॉ. जतीन कोठारी, संचालक, किडनी विकार विभाग, नानावटी मॅक्स रुग्णालय

टॅग्स :Heart Diseaseहृदयरोग