शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

जीव ओतून नरेंद्र मोदींसाठी काम केले, मग प्रशांत किशोर यांचे भाजपाशी का वाजले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 06:09 IST

साखरपुड्यातच लग्न मोडले, पुन्हा नाते जुळेल? सारे काही संपलेले नाही असे सावध निवेदन प्रशांत किशोर व काँग्रेस अशा दोघांनीही दिले आहे. आगामी महिन्यात बोलण्यांची चौथी फेरी होऊ शकते.

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर ऊर्फ पीके आणि काँग्रेस यांच्यात होऊ घातलेली सोयरिक अखेर मोडली आहे. परस्परांना साथ देण्यासाठी बोहोल्यावर चढण्याचा दोघांचा हा तिसरा प्रयत्न होता, पण साखरपुड्यातच लग्न मोडले. तिसऱ्या वेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी पीकेंची थेट बोलणी चालली होती. त्या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये इतर ज्येष्ठ नेते सामील होते, तरीही गाडे बिनसले. मिळालेल्या महितीनुसार यावेळी या चर्चासत्रांसाठी प्रियांका गांधी वड्रा यांनी पुढाकार घेतला होता. पीके यांची कॉंग्रेस पक्षाशी कोणतीच ध्येयधोरणात्मक बांधिलकी नसताना यावेळी पक्षाने स्वत:च दोन पावले पुढे टाकली होती. 

२०१४ साली मोदी यांच्याशी काडीमोड झाल्यावर २०१५ साली पीके यांनी नितीशकुमार यांच्याशी घरोबा केला. बिहारमध्ये भाजपला धूळ चारण्याचा त्यांचा मनोदय होता. नंतर २०१७ साली त्यांनी पंजाबात कॅ. अमरिंदरसिंग यांना मदत केली. आंध्रातील वायएसआर काँग्रेस, तेलंगणातील टीआरएस, तामीळनाडूत द्रमुक, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पीकेंच्या रणनीतीने निवडणूक जिंकायला मदत केली. या ठिकाणी मिळालेल्या यशामुळे निवडणूक रणनीतीकार म्हणून पीके यांना देशभरात चांगलीच मागणी वाढली. काँग्रेस पक्षापुढे मात्र पीकेंनी काही कठोर अटी ठेवल्या होत्या, असे कळते. निवडणुकीचे डावपेच आखताना संपूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे, त्यांचीच टीम देशभर प्रत्यक्ष सर्वेक्षण करून योग्य उमेदवार निवडील; या त्यापैकी प्रमुख अटी होत्या, म्हणतात. पक्षाचे सरचिटणीस (धोरण किंवा निवडणूक रणनीती) म्हणून रीतसर नेमणूक व्हावी अशीही त्यांची मागणी होती. पक्षश्रेष्ठींशी सल्लामसलत करून त्यांची टीम पक्ष नेत्यांचे ट्वीट्स नियंत्रित करील अशीही एक अट होती. 

अर्थातच १५० वर्षांचा इतिहास असणाऱ्या पक्षाला हे सगळे स्वीकारणे जरा जडच गेले, हे उघड आहे. मात्र दोन्ही बाजूंनी कडवट शेरेबाजी होऊन बोलणी फिस्कटली नाहीत हे त्यातल्या त्यात बरे झाले. सारे काही संपलेले नाही, असे अतिसावध निवेदन पीके आणि काँग्रेस अशा दोघांकडून आले आहे. आगामी महिन्यात बोलण्यांची चौथी फेरी होऊ शकते.

... पण वेळ निघून चाललीय!काँग्रेस पक्षाच्या बाबतीत वेळ भराभर निघून चाललाय यात शंका नाही. लोकसभेच्या ३५०च्या घरातील जागांवर भाजपशी लढायचे तर काँग्रेस पक्षाला स्टिरॉईड देण्याची गरज आहे. अजिबात उशीर न करता पक्षाने आता आपले घर तातडीने सावरले पाहिजे.  पक्ष राज्यामागून राज्य गमावत चाललाय. पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले असावे असे  एकूण चित्र आहे. सर्वत्र अस्तित्वाची लढाई चालू आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून किमान २०२४च्या निवडणुकीत तरी जाहीर करता येणार नाही हे सोनियांना कळून चुकले आहे. आता पीके प्रकरणावर पडदा पडला असेल तर गांधी कुटुंबाला पुन्हा नव्याने कंबर कसावी लागेल. पुढाकार घ्यावा लागेल.  १९९९ ते २००४  या दरम्यान सोनिया गांधी यांना ते अचूक जमले होते. यूपीए-१ त्यातूनच तयार झाली. सोनिया यांनी जे तेव्हा केले ते काँग्रेस पक्षातील ‘एम्पॉवर्ड ॲक्शन ग्रुप’ला  २०२४ साली राहुल गांधी यांच्यासाठी करता येईल? 

काळच याचे उत्तर देईल हे खरे!पीकेंचे भाजपशी का वाजले? २०१४ साली निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले, पण त्याचवेळी मोदी आणि प्रशांत किशोर यांचे बिनसले;  ते का? - याची एक वेगळीच कहाणी सांगितली जाते. पीके यांनी निवडणुकीदरम्यान जीव ओतून काम केले त्याबद्दल मोदी त्यांना बक्षिसी देऊ इच्छित होते. त्या निवडणुकीत अगदी दुरून कोणाची मदत झाली तरीही मोदी यांनी त्यांची आठवण ठेवली. मित्रांची आठवण ठेवून ते काहीना काही परतभेट जरुर देतात, असाच त्यांचा लौकिक आहे. संयुक्त राष्ट्रसंघातले प्रशांत किशोर यांचे काम मोदी यांनी निवडणुकांच्या दोन वर्षे आधी व २०१२ साली पाहिले होते. त्यांच्या क्षमतांवर मोदी फिदा होते. गांधीनगरला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक मजला पीके आणि त्यांच्या टीमला रणनीती आखण्यासाठी देण्यात आला होता.

मोदी यांनी त्यावेळी पक्षातल्या कोणावरही विश्वास न ठेवता स्वतंत्र मोहीम राबवली. मोदींचा मोठा विजय झाल्यावर आश्चर्यकारकरित्या पीके यांनी सरकारमध्ये सामील होण्याऐवजी पक्षात काम करण्याचा पर्याय निवडला. तुम्हाला काय काम पाहिजे ते शहा यांना भेटून ठरवून घ्या असे मोदी यांनी पीके यांना सांगितले म्हणतात. शहा त्यावेळी भाजपचे पक्षाध्यक्ष होते. शहा- पीके यांच्यात बरेच बोलणे झाले, पण ‘तुमच्यासाठी निवडणूक रणनीतीकार किंवा समन्वयक असे काही पद तयार करता येणार नाही’ असे शहा यांनी त्यांना सांगितले. संघ परिवाराच्या रचनेत ते बसणारे नाही असेही त्यांना सांगण्यात आले. असे काही स्वतंत्र पद तयार करायला पक्षातल्या इतर नेत्यांचाही विरोधच होता. मोदी त्यावेळी ल्यूटन्स दिल्लीला नवे होते. त्यांनीही आग्रह धरला नाही. सरकारमध्ये हवे ते पद मोदी यांनी देऊ केले, पण पीके यांनी नम्र नकार दिला. तेंव्हापासून पीके भाजपविरुद्ध धावाधाव करत आहेत. विश्वासार्ह चेहरा आणि चांगले मुद्दे समोर ठेवले तर २०२४ साली भाजपचा पराभव करता येऊ शकतो असे त्यांना ठामपणे वाटते. कॉंग्रेस पक्ष सैरभैर आहे आणि पीके यां ना २०१४ चा बदला घ्यायचा आहे. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाcongressकाँग्रेस