शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

स्वातंत्र्य मिळाले, त्याचे सुराज्य करण्याची जबाबदारी आपली !

By राजू इनामदार | Updated: August 31, 2022 06:17 IST

Baba Adhav: १४ ऑगस्ट १९४७. पहिल्या स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या. १५० वर्षांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त होणार. मी त्यावेळी मॅट्रिकला, म्हणजे आताच्या अकरावीत होतो.

- डॉ. बाबा आढावज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते१४ ऑगस्ट १९४७. पहिल्या स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या. १५० वर्षांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त होणार. मी त्यावेळी मॅट्रिकला, म्हणजे आताच्या अकरावीत होतो. राष्ट्र सेवा दलाचे काम करायचो. तिथेच समजले की १४ ऑगस्टला पुण्यातून भव्य मिरवणूक निघणार. मध्यरात्री १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावरील इंग्रजांचा युनियन जॅक खाली खेचणार व तिथे भारताचा तिरंगा फडकवणार. मंडईतून लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय असा मिरवणुकीचा मार्गही ठरला होता.

आम्हा मुलांना उत्सुकता होती ती युनियन जॅक खाली कसा येतो व तिरंगा वर कसा जातो, ते पाहण्याची. सुदैवाने मिरवणुकीची सर्व व्यवस्था पाहण्याची, म्हणजे त्यात शिस्त ठेवणे वगैरे जबाबदारी नेते मंडळींनी राष्ट्र सेवा दलावर सोपवली. सेवा दलातील कार्यक्रम, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे व यासारख्या नेत्यांची व्याख्याने, चर्चा, सेवा दल सैनिकांना ते देत असलेले धडे यातून मला स्वातंत्र्य चळवळ, देशातील तिचे परिणाम याची बरीच माहिती झाली होती. त्यामुळे १४ ऑगस्टचा प्रसंग ऐतिहासिक असणार हे मला लक्षात आले. आपण त्याचे साक्षीदार व्हायचे, हे मी मनोमन ठरवले.

सायंकाळी टिळक पुतळ्यापासून मिरवणूक सुरू झाली. पुण्यातील सर्व प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक जात होती. खादीचे कपडे घातलेले लोक शिस्तबद्धतेने मिरवणुकीत चालत होते. ‘भारत माता की जय’च्या घोषणा सगळीकडे दुमदुमत होत्या. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, काकासाहेब गाडगीळ असे पुण्यातील देशस्तरावरचे अनेक नेते मिरवणुकीत असल्याचे मला आठवते. रात्री १२ वाजता मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. तिथे पाहिले तर युनियन जॅक आधीच काढून घेतला होता. त्यामुळे आम्हाला फक्त तिरंगा वर जाताना व नंतर फडकताना दिसला; पण त्यात आनंद होता. दुसऱ्या दिवशीही म्हणजे १५ ऑगस्टलाही पुण्यात सगळीकडे दिवसभर जल्लोष होता. लोक एकमेकांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देत होते. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात जल्लोष होता. गोडधोड वाटले जात होते. स्वातंत्र्याचा जयघोष होत होता. लोक घोळक्याने फिरून स्वातंत्र्य चळवळीची चर्चा करताना दिसत होते.

त्याकाळात राष्ट्र सेवा दलाने दिलेली शिकवण, पहिल्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष मला आजपर्यंत प्रेरणा देत राहिला आहे. स्वातंत्र्य मिळवल्यावर माझे शिक्षण वगैरे झाले. डॉक्टर झालो. काही वर्षे राजकारणातही काढली. नगरसेवक झालो. गरिबांसाठी, समाजातील दीनदलित दुबळ्यांसाठी काम करायचे हे मी ठरवूनच टाकले होते. राजकारण त्याच्या आड येते म्हणून मी नंतर ते सोडूनच दिले. राजकारणातून बाहेर पडलो.स्वातंत्र्य मिळाले, आता त्याचे सुराज्य करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे मी समजतो. माझे नंतरचे सगळे सार्वजनिक जीवन मी त्यासाठीच व्यतीत केले. तेच आपले ध्येय ठरवले. ‘एक गाव एक पाणवठा’सारखी चळवळ असेल किंवा ‘हमाल पंचायत’, कचरा वेचकांसाठीचे काम असेल हे सगळे त्या प्रेरणेतूनच आले आहे. हमालांसाठी अनेक कायदे करून घेणे त्या चळवळीमुळेच शक्य झाले.

या सर्व चळवळींमध्ये अनेकांची साथ मिळाली. त्यांचे सहकार्य विसरता येणार नाही. माणसाला माणसाप्रती सहानुभूती हवी. प्रेम हवे. तेच नसेल तर मग माणूस म्हणवून घेण्यात काय अर्थ, असे मला वाटते. आज वयाच्या ९२ व्या वर्षीही मी गाव तिथे घटनामंदिर सुरू करण्याचा निर्धार केला आहे. हे मंदिर असे असेल की तिथे प्रवेश करण्यासाठी कोणालाही मज्जाव नसेल. गावातील कोणीही तिथे जाऊन घटनेचा अभ्यास करू शकेल. त्यात काय म्हटले आहे ते पाहू शकेल. प्रत्येक गावात असे एकतरी मंदिर असावेच, असा माझा प्रयत्न आहे. आमच्या कष्टकऱ्यांच्या शाळेपासून मी याची सुरुवात केली आहे.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी काय वाटते, याबद्दल काय सांगू? इंग्रजांबरोबर नाही तितके स्वकियांबरोबरच लढावे लागते आहे. किमान नीट राहता येईल, हा इथल्या प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. सरकारांनी त्यासाठी काम करण्याची गरज आहे. इथे दुसरेच दिसते आहे. कोट्यवधीची संपत्ती साठवून राजकारणी, सरकारी अधिकारी करणार तरी काय? भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. तशी ती होताना दिसत नाही. न्याय लवकर मिळत नाही. खटले प्रलंबित राहतात. सरकारी यंत्रणा निगरगट्ट झाल्या आहेत. सरकारकडून अपेक्षा बाळगावी तर आता सरकारच अशा मार्गाने तयार होत आहे की त्याची चीड यावी; पण हरकत नाही. कारण आपण स्वतंत्र आहोत, हेच भाग्याचे आहे. आम्ही लढायला घाबरत नाही. गरिबांना न्याय मिळण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढतच राहणार आहे.शब्दांकन : राजू इनामदार, उपमुख्य बातमीदार, लोकमत, पुणे    (लेखमाला समाप्त)

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावIndiaभारत