शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

विदर्भासाठी शुभवर्तमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 00:20 IST

२१व्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रे पादक्रांत केली आहेत. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. असे असतानाही भारतीय समाजात मुलींबद्दल असलेली भेदभावाची भावना अद्याप संपलेली नाही.

२१व्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रे पादक्रांत केली आहेत. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. असे असतानाही भारतीय समाजात मुलींबद्दल असलेली भेदभावाची भावना अद्याप संपलेली नाही. लिंगभेदाच्या मानसिकतेतून आम्ही बाहेर पडू शकलेलो नाही. जन्माला येणाºया मुलींचे घटणारे प्रमाण हा नेहमीच चिंतेचा विषय ठरला आहे. महाराष्टÑासारख्या सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या राज्यातही गेली अनेक वर्षे मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा कमीच राहिले. परंतु अलीकडेच जाहीर झालेल्या राष्टÑीय कुटुंब कल्याण विभागाच्या सर्वेक्षणातून शुभवर्तमान समोर आले आहे. राज्याच्या काही भागात मुलींच्या जन्माचे स्वागत होऊ लागले असून त्यात विदर्भाने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे नागपूर,भंडारा, वर्धा,अमरावती,गडचिरोली आदी वैदर्भीय जिल्ह्यांमध्ये मुलींचे प्रमाण हजारावर गेले आहे. वर्धा जिल्ह्याच्या शहरी भागात मुलींचे लिंगगुणोत्तर १,२६६ तर ग्रामीण भागात १,३७७ एवढे झाले आहे. अकोल्यात हे प्रमाण १,०६८ आहे. मुलींचा राज्यातील जन्मदर ८६७ वरुन ९२४ वर पोहोचला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे लिंगगुणोत्तरासोबतच मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाणही वाढले आहे. मुलींचे हे वाढते गुणोत्तर म्हणजे समाजाच्या बदलत्या मानसिकतेची चाहूलच म्हणायची. अर्थात हा केवळ एक प्रारंभ असून स्त्री-पुरुष समानतेच्या या लढ्यात अद्याप फार मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. अजूनही लाखो मुली जन्मापूर्वी गर्भातच संपविल्या जात आहेत. राज्यात गर्भलिंग परीक्षणावर बंदी असतानाही भ्रूणहत्येची प्रकरणे उघडकीस येत असतात,यावरुन त्याची प्रचिती येते. शहरातच नव्हे तर खेड्यापाड्यातही हा धंदा जोमात सुरु आहे. दुर्दैव हे की वंशाचा दिवा हवा या हव्यासापोटी मातापित्यांकडूनच अत्यंत क्रूरपणे स्त्रीभ्रूण गर्भातच कुस्करले जात आहेत. स्त्रीभ्रूण हत्या, महिला संरक्षण, सबलीकरण यासाठी शासनातर्फे वेळोवेळी अनेक कायदे तयार करण्यात आले. याशिवाय मुलींच्या जन्माबाबत लोकांचा संकुचित दृष्टिकोन बदलावा या अनुषंगाने राज्य आणि केंद्र सरकारतर्फे ‘लेक वाचवा’ यासारख्या मोहिमा राबविल्या जात आहेत. तरीही त्याचा अपेक्षित परिणाम समोर आलेला नाही. त्यामुळे या निष्पाप जीवांची हत्या रोखण्याकरिता यासंदर्भातील कायद्यांची अधिक कठोरपणे अंमलबजावणी करणे नितांत गरजेचे आहे. मुलींच्या गुणोत्तरातील ही सुधारणा निश्चितच समाधानकारक आहे. परंतु पुरेशी नक्कीच नाही. या भारतीय समाजातून स्त्रीभ्रूण हत्या पूर्णपणे थांबतील, तेव्हाच मुलींचे भवितव्य खºया अर्थाने सुरक्षित होणार आहे.

टॅग्स :WomenमहिलाGovernmentसरकार