शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पिंजऱ्यायातील पोपटाला शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 02:38 IST

बिहारच्या मुझफ्फरपूर बालिका वसतिगृह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाबद्दल सीबीआयचे अंतरिम महासंचालक नागेश्वर राव यांना लाखाचा दंड व कोर्ट उठेपर्यंत कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने ठोठावली.

बिहारच्या मुझफ्फरपूर बालिका वसतिगृह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाबद्दल सीबीआयचे अंतरिम महासंचालक नागेश्वर राव यांना लाखाचा दंड व कोर्ट उठेपर्यंत कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने ठोठावली. या प्रकरणात न्यायालयाचा आदेश डावलून चौकशी अधिकारी संयुक्त संचालक ए. के. शर्मा यांची परस्पर बदली केल्याने कोर्टाचा अवमान झाल्याच्या आरोपाचा राव सामना करीत होते. त्यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली, मात्र न्यायालयाने ती नामंजूर केली. परिणामी, राव यांना कैदेची शिक्षा भोगावी लागली. काही काळ का होईना, मोदी सरकारच्या इच्छेनुसार सीबीआय यंत्रणेचे नेतृत्व नागेश्वर राव यांच्या हाती होते. या काळात त्यांनी दिलेले बहुतांश आदेश व केलेली प्रत्येक कृती वादग्रस्त ठरली आहे. त्यामुळे राव यांना झालेली शिक्षा एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाकडून मोदी सरकारला मिळालेली सणसणीत चपराक आहे. लोकशाही व्यवस्थेत आणि सरकारी यंत्रणांच्या कारभारात पारदर्शकता आणण्याचे मोठमोठे दावे करीत २०१४ साली मोदी सरकार सत्तेवर आले. तथापि, विरोधकांना वेठीस धरण्यासाठी या सरकारने देशातली अग्रणी तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयचा यथेच्छ वापर केला, त्याच्या अनेक कहाण्या दररोज समोर येत आहेत. पाच वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयची संभावना ‘सरकारी पिंजºयातील पोपट’ अथवा ‘मालकाचा आवाज’ अशी केली होती. अल्पकालीन कारकिर्दीत नागेश्वर राव यांनी न्यायालयाचा हा शेरा खºया अर्थाने सार्थ ठरवला. मोदी सरकारच्या कारकिर्दीत सीबीआयचे महासंचालक अनिल सिन्हा निवृत्त झाले. त्यानंतर जवळपास वर्षभर हे पद रिक्त होते. मोदी सरकारने आपल्या खास मर्जीतले गुजरात केडरचे राकेश अस्थाना यांची विशेष संचालकपदी नियुक्ती केली. अस्थानांची प्रतिमा पहिल्या दिवसापासूनच स्वच्छ नव्हती. चार हजार कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाशी त्यांच्या संबंधाचा आरोप होता. तरीही नियम धाब्यावर बसवून सीबीआयमध्ये त्यांना घुसवण्यात आले. एका जनहित याचिकेने या नियुक्तीला आव्हान मिळाले. न्यायालयाने केंद्र सरकारकडे उत्तर मागितले. लगेच अस्थाना यांना हटवून महासंचालकपदी दिल्लीचे पोलीस आयुक्त आलोक वर्मांची नियुक्ती सरकारला करावी लागली. वर्मा यांनी तब्बल दोन वर्षे मोदी सरकारला सीबीआयचा दुरुपयोग करू दिला नाही. राफेल प्रकरणाच्या चौकशीची पूर्वतयारी त्यांनी सुरू करताच सरकारचे धाबे दणाणले. मग मध्यरात्री तुफान पोलीस बंदोबस्तात महासंचालक वर्मा अन् विशेष संचालक अस्थानांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश देत आपले विश्वासू नागेश्वर राव यांच्या हाती सरकारने अंतरिम महासंचालकाचा कार्यभार सोपविला. राव यांच्या वादग्रस्त आदेशांपैकी बिहारच्या बालिका वसतिगृह प्रकरणात चौकशी अधिकाºयाची तडकाफडकी बदली, हे फक्त अथांग जलसागरात वर दिसणारे हिमनगाचे छोटे टोक आहे. सीबीआयच्या महासंचालकपदी मध्य प्रदेशच्या शुक्ला यांची नियुक्ती होताच पदावरील अखेरच्या दिवशी राव यांनी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीवकुमार यांचे कार्यालय व निवासस्थानी ४० सीबीआय अधिकारी चौकशीसाठी पाठवून दिले. वस्तुत: शारदा चिट फंड प्रकरणात राजीवकुमार हे काही आरोपी नव्हेत तर साक्षीदार आहेत. सीबीआयच्या आधी या प्रकरणाची चौकशी करणाºया एसआयटीचे ते प्रमुख होते. एकापेक्षा अधिक राज्यांशी हे प्रकरण संबंधित असल्याने सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले होते. त्यानंतर पाच वर्षे सीबीआयची चौकशी मंदगतीने सुरू होती. मोदी सरकार व ममता बॅनर्जींचे बंगाल सरकार यांच्यादरम्यान राजकीय संघर्ष वाढताच, राव यांना स्फुरण चढले. अखेरच्या दिवसापर्यंत ‘राजापेक्षा राजनिष्ठे’च्या भूमिकेतून मोदी सरकारच्या मनमानी आदेशांची त्यांनी अंमलबजावणी केली. वेगळ्या प्रकरणात मंगळवारी त्यांना शिक्षा झाली आणि आपल्या दुष्कृत्याचा परिणाम भोगावा लागला. सीबीआयसारख्या अग्रणी तपास यंत्रणेची मात्र त्यात पुरती अब्रू गेली. मोदी सरकारने देशातील महत्त्वाच्या संस्थांची मोडतोड चालविल्याचा आरोप आहेच. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे ‘पिंजऱ्यायातील पोपटाला’ शिक्षा झाली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय