शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

भुतामुखी ब्रह्मज्ञान

By admin | Updated: October 14, 2015 22:22 IST

भारतात आणि खरे तर मुंबई शहरात गेल्या आठवडाभरात ज्या दोन अप्रिय घटना घडल्या, त्यांच्यामुळे पाकिस्तान सरकारचे ‘कनवाळू’ मन फारच व्यथित झालेले दिसते.

भारतात आणि खरे तर मुंबई शहरात गेल्या आठवडाभरात ज्या दोन अप्रिय घटना घडल्या, त्यांच्यामुळे पाकिस्तान सरकारचे ‘कनवाळू’ मन फारच व्यथित झालेले दिसते. आधी पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करणे संबंधित आयोजकांना भाग पडले आणि नंतर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमुद कसुरी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याआधी सदर सोहळ्याचे मुंबईतील यजमान सुधीन्द्र कुळकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले गेले. प्रकाशन समारंभ मात्र पोलिसांच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडला. पण दोन्ही कार्यक्रमांना जे गालबोट लागले त्याबद्दल पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने तीव्र चिंता व्यक्त करुन असा प्रकार पुन्हा होऊ नये अशी आशाही व्यक्त केली आहे. एकप्रकारे पाकिस्तानने भारताला सद्वर्तनाची, सहिष्णुतेची आणि संयमाची शिकवण देण्याचाच प्रयत्न केला आहे. जो देश आणि ज्या देशाचे सरकार प्रत्येक भारतीय वस्तुला पाकिस्तानात निषिद्ध मानते, त्या देशाने असे काही म्हणण्याचे धाडस करणे यालाच भुतामुखी ब्रह्मज्ञान म्हणायचे. अर्थात भारतीय परराष्ट्र विभागाने आपल्या शेजाऱ्याच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्याला प्रत्युत्तर देताना, सीमेपलीकडून घुसखोरी करणारे दहशतवादी आणि सीमेवर होणाऱ्या अतिरेकी कारवाया हाच भारताच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असून जोवर पाकिस्तान त्याला आळा घालीत नाही तोवर उभय देशांदरम्यान शांततेची चर्चा सुरुही होऊ शकत नाही असे म्हटले आहे. पण यात हेदेखील तितकेच खरे की मुंबईत झालेल्या प्रकारांवरुन पाकिस्तानला नाक वर करुन बोलण्याची संधी शिवसेनेने म्हणजे भारतानेच दिली आहे. सेनेने आजवर अनेक पाकी कलाकारांना विरोध केला असला तरी ज्या कलाकारांनी वा त्यांच्या येथील प्रायोजकांनी मातोश्रीपुढे गुळ-खोबरे ठेऊन उदबत्त्या पेटवल्या त्यांचे कार्यक्रम निर्वेध पार पडले आहेत. यात सिनेमे आहेत मालिका आहेत आणि बिग बॉससारखे रिअ‍ॅलिटी शोदेखील आहेत. अखेर राष्ट्रभक्तीदेखील ज्याच्या त्याच्या घराच्या उंबऱ्यापासूनच सुरु होत असते!