शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

भुतामुखी ब्रह्मज्ञान

By admin | Updated: October 14, 2015 22:22 IST

भारतात आणि खरे तर मुंबई शहरात गेल्या आठवडाभरात ज्या दोन अप्रिय घटना घडल्या, त्यांच्यामुळे पाकिस्तान सरकारचे ‘कनवाळू’ मन फारच व्यथित झालेले दिसते.

भारतात आणि खरे तर मुंबई शहरात गेल्या आठवडाभरात ज्या दोन अप्रिय घटना घडल्या, त्यांच्यामुळे पाकिस्तान सरकारचे ‘कनवाळू’ मन फारच व्यथित झालेले दिसते. आधी पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करणे संबंधित आयोजकांना भाग पडले आणि नंतर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमुद कसुरी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याआधी सदर सोहळ्याचे मुंबईतील यजमान सुधीन्द्र कुळकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले गेले. प्रकाशन समारंभ मात्र पोलिसांच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडला. पण दोन्ही कार्यक्रमांना जे गालबोट लागले त्याबद्दल पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने तीव्र चिंता व्यक्त करुन असा प्रकार पुन्हा होऊ नये अशी आशाही व्यक्त केली आहे. एकप्रकारे पाकिस्तानने भारताला सद्वर्तनाची, सहिष्णुतेची आणि संयमाची शिकवण देण्याचाच प्रयत्न केला आहे. जो देश आणि ज्या देशाचे सरकार प्रत्येक भारतीय वस्तुला पाकिस्तानात निषिद्ध मानते, त्या देशाने असे काही म्हणण्याचे धाडस करणे यालाच भुतामुखी ब्रह्मज्ञान म्हणायचे. अर्थात भारतीय परराष्ट्र विभागाने आपल्या शेजाऱ्याच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्याला प्रत्युत्तर देताना, सीमेपलीकडून घुसखोरी करणारे दहशतवादी आणि सीमेवर होणाऱ्या अतिरेकी कारवाया हाच भारताच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असून जोवर पाकिस्तान त्याला आळा घालीत नाही तोवर उभय देशांदरम्यान शांततेची चर्चा सुरुही होऊ शकत नाही असे म्हटले आहे. पण यात हेदेखील तितकेच खरे की मुंबईत झालेल्या प्रकारांवरुन पाकिस्तानला नाक वर करुन बोलण्याची संधी शिवसेनेने म्हणजे भारतानेच दिली आहे. सेनेने आजवर अनेक पाकी कलाकारांना विरोध केला असला तरी ज्या कलाकारांनी वा त्यांच्या येथील प्रायोजकांनी मातोश्रीपुढे गुळ-खोबरे ठेऊन उदबत्त्या पेटवल्या त्यांचे कार्यक्रम निर्वेध पार पडले आहेत. यात सिनेमे आहेत मालिका आहेत आणि बिग बॉससारखे रिअ‍ॅलिटी शोदेखील आहेत. अखेर राष्ट्रभक्तीदेखील ज्याच्या त्याच्या घराच्या उंबऱ्यापासूनच सुरु होत असते!