शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

भुतामुखी ब्रह्मज्ञान

By admin | Updated: October 14, 2015 22:22 IST

भारतात आणि खरे तर मुंबई शहरात गेल्या आठवडाभरात ज्या दोन अप्रिय घटना घडल्या, त्यांच्यामुळे पाकिस्तान सरकारचे ‘कनवाळू’ मन फारच व्यथित झालेले दिसते.

भारतात आणि खरे तर मुंबई शहरात गेल्या आठवडाभरात ज्या दोन अप्रिय घटना घडल्या, त्यांच्यामुळे पाकिस्तान सरकारचे ‘कनवाळू’ मन फारच व्यथित झालेले दिसते. आधी पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करणे संबंधित आयोजकांना भाग पडले आणि नंतर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमुद कसुरी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याआधी सदर सोहळ्याचे मुंबईतील यजमान सुधीन्द्र कुळकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले गेले. प्रकाशन समारंभ मात्र पोलिसांच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडला. पण दोन्ही कार्यक्रमांना जे गालबोट लागले त्याबद्दल पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने तीव्र चिंता व्यक्त करुन असा प्रकार पुन्हा होऊ नये अशी आशाही व्यक्त केली आहे. एकप्रकारे पाकिस्तानने भारताला सद्वर्तनाची, सहिष्णुतेची आणि संयमाची शिकवण देण्याचाच प्रयत्न केला आहे. जो देश आणि ज्या देशाचे सरकार प्रत्येक भारतीय वस्तुला पाकिस्तानात निषिद्ध मानते, त्या देशाने असे काही म्हणण्याचे धाडस करणे यालाच भुतामुखी ब्रह्मज्ञान म्हणायचे. अर्थात भारतीय परराष्ट्र विभागाने आपल्या शेजाऱ्याच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्याला प्रत्युत्तर देताना, सीमेपलीकडून घुसखोरी करणारे दहशतवादी आणि सीमेवर होणाऱ्या अतिरेकी कारवाया हाच भारताच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असून जोवर पाकिस्तान त्याला आळा घालीत नाही तोवर उभय देशांदरम्यान शांततेची चर्चा सुरुही होऊ शकत नाही असे म्हटले आहे. पण यात हेदेखील तितकेच खरे की मुंबईत झालेल्या प्रकारांवरुन पाकिस्तानला नाक वर करुन बोलण्याची संधी शिवसेनेने म्हणजे भारतानेच दिली आहे. सेनेने आजवर अनेक पाकी कलाकारांना विरोध केला असला तरी ज्या कलाकारांनी वा त्यांच्या येथील प्रायोजकांनी मातोश्रीपुढे गुळ-खोबरे ठेऊन उदबत्त्या पेटवल्या त्यांचे कार्यक्रम निर्वेध पार पडले आहेत. यात सिनेमे आहेत मालिका आहेत आणि बिग बॉससारखे रिअ‍ॅलिटी शोदेखील आहेत. अखेर राष्ट्रभक्तीदेखील ज्याच्या त्याच्या घराच्या उंबऱ्यापासूनच सुरु होत असते!