शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

खादीचा उद्योग नेणार २ हजार कोटींपर्यंत, गौतम हरी सिंघानिया यांची ‘लोकमत’शी विशेष बातचीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 05:08 IST

कापड उद्योगाचा ब्रँड बनविणाऱ्या रेमंड समुहाने शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना आमच्या उद्योगाने खादी व लिनन कापड व्यवसायात प्रवेश केला आहे.

दिनकर रायकरमुंबई : कापड उद्योगाचा ब्रँड बनविणाऱ्या रेमंड समुहाने शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना आमच्या उद्योगाने खादी व लिनन कापड व्यवसायात प्रवेश केला आहे. भविष्यात खादीचा उद्योग २ हजार कोटीपर्यंत नेण्याचा आमचा संकल्प आहे, असे कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जगात या ब्रँडची ख्याती आहे. ‘एक परिपूर्ण माणूस’ (ए कम्प्लीट मॅन) असे रेमंडचे घोषवाक्य आहे. आम्ही गरिबापासून अतिश्रीमंतांपर्यंत कपडे बनवतो. आमच्याकडे ११३ रुपये मीटरपासून ते ७ लाख ५० हजार रुपये मीटरपर्यंतचे कापड बनते. जगातले सर्वात चांगले कापड आम्ही बनवतो. देशातल्या ३८० हून अधिक शहरांत आमची १२१२ स्टोअर्स आहेत. २० हजार रिटेलर्स आहेत. महाराष्टÑात १२६ स्टोअर्स आहेत व देशात ९५३ विशेष स्टोअर्स आहेत. आता कमी लोकसंख्येच्या शहरांतही आम्ही व्यवसाय नेत आहोत असेही सिंघानिया म्हणाले.खादी व लिनन हे प्रकार प्रचंड लोकप्रिय आहेत व ते आरोग्यासही पोषक आहेत. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतल्याचे सांगून सिंघानिया म्हणाले, कंपनी ‘कापड निर्मिती’ या पारंपरिक उत्पादनावर अवलंबून राहणार नाही. आता ‘एथ्निक’ वस्त्रांवर आम्ही लक्ष केंद्रित केल्याचे सांगून सिंघानिया म्हणाले की, जगात या कपड्यांचा बाजार ५ हजार कोटींचा आहे.आम्ही आमच्या अनेक शोरुममध्ये अत्यंत प्रशिक्षित टेलर्स ठेवले आहेत. ते तुमच्या आवडीचे, हवे तसे शर्ट, पॅन्ट्स, सुट्स शिवून देतात. शेरवानी, जॅकेट, लग्नासाठीचे सुटही शिवून दिले जातात. ‘मेक टू आॅर्डर’ जॅकेटची किंमत १४ लाखापर्यंतहीआहे. लोकांची आवड बदलत आहे. त्यामुळेत्यांना हवे ते देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सिंघानिया म्हणाले.महाराष्टÑात रेमंडचा व्यवसाय वाढविण्यासाठी आम्ही अमरावतीची निवड केल्याचे सांगून ते म्हणालेकी, रेमन्ड्सने अनेक वर्षांनी मोठी भांडवली गुंतवणूक या वस्त्रोद्योग पार्कमधील कारखान्यात केली आहे. तिथे सध्या फक्त धागे तयार होत असले तरी शर्टिंग, खादी, लिनेन अशा विविधांगी उत्पादनाची पूर्ण साखळी तिथे उभी केली जाईल.सांगली, चिपळूण, रत्नागिरी, नांदेड या उद्योगदृष्ट्या मागास शहरांमध्येही आम्ही व्यवसाय सुरु करत आहोत. मात्र आपल्या कामगार कायद्यांची अवस्था दयनीय आहे. त्यात आमुलाग्र बदल करावेच लागतील असेही सिंघानिया यांनी निक्षून सांगितले. उद्योगांमध्ये शिस्त आणायला हवी व ही शिस्त येण्याआधी उद्योगांची उत्पादकतासुद्धा वाढयलाच हवी असेही सांगून ते म्हणाले की, आमचे महाराष्टÑात१२९६४ तर देशभरात २५०८८ कर्मचारी आहेत.इंजिनीअरिंग आणि आॅटोमोबाइल्समध्ये आम्ही व्यवसाय सुरु केला आहे. आम्ही कंडोमच्या व्यवसायात १९९१ मध्ये प्रवेश केला. ‘कामसूत्र’ हा ब्रॅन्ड आज लोकांच्या ‘कामजीवनात’ आनंद निर्माण करीत आहे, असे ते म्हणाले.सिंघानिया यांनी स्वत:च्या तीन आवडी सांगितल्या. सकाळी उठून व्यायाम, दिवसभर व्यवसाय आणि मोटार स्पोर्टसचा आनंद या तीन आवडी असल्याचे ते म्हणाले. याशिवाय कशात लक्ष घालण्यात मला वेळ नाही असे त्यांनी सांगितले.तुमचे वडिलांशी मालमत्तेवरून वाद झाले, असे विचारले असता ते हसत हसत म्हणाले, असे वाद तर घराघरात असतात. आम्ही त्याला अपवाद कसे राहू? पण आमच्या कुटुंबाचा नावलौकिक असल्याने माध्यमांनी हा विषय लावून धरला. मला त्याविषयी काहीच बोलायचे नाही.>होय, मराठीयेते की!एवढी वर्षे महाराष्टÑात आहात, मराठी येते की नाही? असे विचारले असता शुद्ध मराठीत ‘हो, मराठी येते की,’ असे उत्तर त्यांनी दिले. माझे वडील खेळाडू होते, मीही खेळाडू आहे. खेळावरील प्रेमापोटीच आम्ही देशातील खेळाडूंसाठी कपडे तयार करतो. जागतिक पातळीवरील खेळाडूंचे खेळाव्यतिरिक्त अधिकृत कपडे रेमंडचे असतात असेही सिंघानिया आवर्जून म्हणाले.>तीन वर्षांत कर्जमुक्त होऊ : वस्त्रोद्योगाची ९३ वर्षांची परंपरा व अनुभव पाठीशी असलेल्या रेमन्ड्स कंपनीच्या डोक्यावर २००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जापोटी कंपनीला दरवर्षी काही कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येत आहे. पण अमरावतीचा कारखाना कंपनीला कर्जातून बाहेर काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, एकदा उत्पादनांची पूर्ण साखळी तिथे उभी राहिली की, भांडवली गुंतवणूक थांबेल. कारखान्यातीला उत्पादनांची विक्री सुरू होईल. त्यातून कंपनी हळूहळू कर्जमुक्त होईल. अमरावती व इथिओपिया या दोन्ही ठिकाणची भांडवली गुंतवणूक अंतिम टप्प्यात आहे. कंपनी २०२०-२१ पासून कर्जमुक्त होण्यास सुरुवात होईल.