शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

खादीचा उद्योग नेणार २ हजार कोटींपर्यंत, गौतम हरी सिंघानिया यांची ‘लोकमत’शी विशेष बातचीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 05:08 IST

कापड उद्योगाचा ब्रँड बनविणाऱ्या रेमंड समुहाने शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना आमच्या उद्योगाने खादी व लिनन कापड व्यवसायात प्रवेश केला आहे.

दिनकर रायकरमुंबई : कापड उद्योगाचा ब्रँड बनविणाऱ्या रेमंड समुहाने शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना आमच्या उद्योगाने खादी व लिनन कापड व्यवसायात प्रवेश केला आहे. भविष्यात खादीचा उद्योग २ हजार कोटीपर्यंत नेण्याचा आमचा संकल्प आहे, असे कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जगात या ब्रँडची ख्याती आहे. ‘एक परिपूर्ण माणूस’ (ए कम्प्लीट मॅन) असे रेमंडचे घोषवाक्य आहे. आम्ही गरिबापासून अतिश्रीमंतांपर्यंत कपडे बनवतो. आमच्याकडे ११३ रुपये मीटरपासून ते ७ लाख ५० हजार रुपये मीटरपर्यंतचे कापड बनते. जगातले सर्वात चांगले कापड आम्ही बनवतो. देशातल्या ३८० हून अधिक शहरांत आमची १२१२ स्टोअर्स आहेत. २० हजार रिटेलर्स आहेत. महाराष्टÑात १२६ स्टोअर्स आहेत व देशात ९५३ विशेष स्टोअर्स आहेत. आता कमी लोकसंख्येच्या शहरांतही आम्ही व्यवसाय नेत आहोत असेही सिंघानिया म्हणाले.खादी व लिनन हे प्रकार प्रचंड लोकप्रिय आहेत व ते आरोग्यासही पोषक आहेत. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतल्याचे सांगून सिंघानिया म्हणाले, कंपनी ‘कापड निर्मिती’ या पारंपरिक उत्पादनावर अवलंबून राहणार नाही. आता ‘एथ्निक’ वस्त्रांवर आम्ही लक्ष केंद्रित केल्याचे सांगून सिंघानिया म्हणाले की, जगात या कपड्यांचा बाजार ५ हजार कोटींचा आहे.आम्ही आमच्या अनेक शोरुममध्ये अत्यंत प्रशिक्षित टेलर्स ठेवले आहेत. ते तुमच्या आवडीचे, हवे तसे शर्ट, पॅन्ट्स, सुट्स शिवून देतात. शेरवानी, जॅकेट, लग्नासाठीचे सुटही शिवून दिले जातात. ‘मेक टू आॅर्डर’ जॅकेटची किंमत १४ लाखापर्यंतहीआहे. लोकांची आवड बदलत आहे. त्यामुळेत्यांना हवे ते देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सिंघानिया म्हणाले.महाराष्टÑात रेमंडचा व्यवसाय वाढविण्यासाठी आम्ही अमरावतीची निवड केल्याचे सांगून ते म्हणालेकी, रेमन्ड्सने अनेक वर्षांनी मोठी भांडवली गुंतवणूक या वस्त्रोद्योग पार्कमधील कारखान्यात केली आहे. तिथे सध्या फक्त धागे तयार होत असले तरी शर्टिंग, खादी, लिनेन अशा विविधांगी उत्पादनाची पूर्ण साखळी तिथे उभी केली जाईल.सांगली, चिपळूण, रत्नागिरी, नांदेड या उद्योगदृष्ट्या मागास शहरांमध्येही आम्ही व्यवसाय सुरु करत आहोत. मात्र आपल्या कामगार कायद्यांची अवस्था दयनीय आहे. त्यात आमुलाग्र बदल करावेच लागतील असेही सिंघानिया यांनी निक्षून सांगितले. उद्योगांमध्ये शिस्त आणायला हवी व ही शिस्त येण्याआधी उद्योगांची उत्पादकतासुद्धा वाढयलाच हवी असेही सांगून ते म्हणाले की, आमचे महाराष्टÑात१२९६४ तर देशभरात २५०८८ कर्मचारी आहेत.इंजिनीअरिंग आणि आॅटोमोबाइल्समध्ये आम्ही व्यवसाय सुरु केला आहे. आम्ही कंडोमच्या व्यवसायात १९९१ मध्ये प्रवेश केला. ‘कामसूत्र’ हा ब्रॅन्ड आज लोकांच्या ‘कामजीवनात’ आनंद निर्माण करीत आहे, असे ते म्हणाले.सिंघानिया यांनी स्वत:च्या तीन आवडी सांगितल्या. सकाळी उठून व्यायाम, दिवसभर व्यवसाय आणि मोटार स्पोर्टसचा आनंद या तीन आवडी असल्याचे ते म्हणाले. याशिवाय कशात लक्ष घालण्यात मला वेळ नाही असे त्यांनी सांगितले.तुमचे वडिलांशी मालमत्तेवरून वाद झाले, असे विचारले असता ते हसत हसत म्हणाले, असे वाद तर घराघरात असतात. आम्ही त्याला अपवाद कसे राहू? पण आमच्या कुटुंबाचा नावलौकिक असल्याने माध्यमांनी हा विषय लावून धरला. मला त्याविषयी काहीच बोलायचे नाही.>होय, मराठीयेते की!एवढी वर्षे महाराष्टÑात आहात, मराठी येते की नाही? असे विचारले असता शुद्ध मराठीत ‘हो, मराठी येते की,’ असे उत्तर त्यांनी दिले. माझे वडील खेळाडू होते, मीही खेळाडू आहे. खेळावरील प्रेमापोटीच आम्ही देशातील खेळाडूंसाठी कपडे तयार करतो. जागतिक पातळीवरील खेळाडूंचे खेळाव्यतिरिक्त अधिकृत कपडे रेमंडचे असतात असेही सिंघानिया आवर्जून म्हणाले.>तीन वर्षांत कर्जमुक्त होऊ : वस्त्रोद्योगाची ९३ वर्षांची परंपरा व अनुभव पाठीशी असलेल्या रेमन्ड्स कंपनीच्या डोक्यावर २००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जापोटी कंपनीला दरवर्षी काही कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येत आहे. पण अमरावतीचा कारखाना कंपनीला कर्जातून बाहेर काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, एकदा उत्पादनांची पूर्ण साखळी तिथे उभी राहिली की, भांडवली गुंतवणूक थांबेल. कारखान्यातीला उत्पादनांची विक्री सुरू होईल. त्यातून कंपनी हळूहळू कर्जमुक्त होईल. अमरावती व इथिओपिया या दोन्ही ठिकाणची भांडवली गुंतवणूक अंतिम टप्प्यात आहे. कंपनी २०२०-२१ पासून कर्जमुक्त होण्यास सुरुवात होईल.