शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खादीचा उद्योग नेणार २ हजार कोटींपर्यंत, गौतम हरी सिंघानिया यांची ‘लोकमत’शी विशेष बातचीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 05:08 IST

कापड उद्योगाचा ब्रँड बनविणाऱ्या रेमंड समुहाने शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना आमच्या उद्योगाने खादी व लिनन कापड व्यवसायात प्रवेश केला आहे.

दिनकर रायकरमुंबई : कापड उद्योगाचा ब्रँड बनविणाऱ्या रेमंड समुहाने शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना आमच्या उद्योगाने खादी व लिनन कापड व्यवसायात प्रवेश केला आहे. भविष्यात खादीचा उद्योग २ हजार कोटीपर्यंत नेण्याचा आमचा संकल्प आहे, असे कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जगात या ब्रँडची ख्याती आहे. ‘एक परिपूर्ण माणूस’ (ए कम्प्लीट मॅन) असे रेमंडचे घोषवाक्य आहे. आम्ही गरिबापासून अतिश्रीमंतांपर्यंत कपडे बनवतो. आमच्याकडे ११३ रुपये मीटरपासून ते ७ लाख ५० हजार रुपये मीटरपर्यंतचे कापड बनते. जगातले सर्वात चांगले कापड आम्ही बनवतो. देशातल्या ३८० हून अधिक शहरांत आमची १२१२ स्टोअर्स आहेत. २० हजार रिटेलर्स आहेत. महाराष्टÑात १२६ स्टोअर्स आहेत व देशात ९५३ विशेष स्टोअर्स आहेत. आता कमी लोकसंख्येच्या शहरांतही आम्ही व्यवसाय नेत आहोत असेही सिंघानिया म्हणाले.खादी व लिनन हे प्रकार प्रचंड लोकप्रिय आहेत व ते आरोग्यासही पोषक आहेत. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतल्याचे सांगून सिंघानिया म्हणाले, कंपनी ‘कापड निर्मिती’ या पारंपरिक उत्पादनावर अवलंबून राहणार नाही. आता ‘एथ्निक’ वस्त्रांवर आम्ही लक्ष केंद्रित केल्याचे सांगून सिंघानिया म्हणाले की, जगात या कपड्यांचा बाजार ५ हजार कोटींचा आहे.आम्ही आमच्या अनेक शोरुममध्ये अत्यंत प्रशिक्षित टेलर्स ठेवले आहेत. ते तुमच्या आवडीचे, हवे तसे शर्ट, पॅन्ट्स, सुट्स शिवून देतात. शेरवानी, जॅकेट, लग्नासाठीचे सुटही शिवून दिले जातात. ‘मेक टू आॅर्डर’ जॅकेटची किंमत १४ लाखापर्यंतहीआहे. लोकांची आवड बदलत आहे. त्यामुळेत्यांना हवे ते देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सिंघानिया म्हणाले.महाराष्टÑात रेमंडचा व्यवसाय वाढविण्यासाठी आम्ही अमरावतीची निवड केल्याचे सांगून ते म्हणालेकी, रेमन्ड्सने अनेक वर्षांनी मोठी भांडवली गुंतवणूक या वस्त्रोद्योग पार्कमधील कारखान्यात केली आहे. तिथे सध्या फक्त धागे तयार होत असले तरी शर्टिंग, खादी, लिनेन अशा विविधांगी उत्पादनाची पूर्ण साखळी तिथे उभी केली जाईल.सांगली, चिपळूण, रत्नागिरी, नांदेड या उद्योगदृष्ट्या मागास शहरांमध्येही आम्ही व्यवसाय सुरु करत आहोत. मात्र आपल्या कामगार कायद्यांची अवस्था दयनीय आहे. त्यात आमुलाग्र बदल करावेच लागतील असेही सिंघानिया यांनी निक्षून सांगितले. उद्योगांमध्ये शिस्त आणायला हवी व ही शिस्त येण्याआधी उद्योगांची उत्पादकतासुद्धा वाढयलाच हवी असेही सांगून ते म्हणाले की, आमचे महाराष्टÑात१२९६४ तर देशभरात २५०८८ कर्मचारी आहेत.इंजिनीअरिंग आणि आॅटोमोबाइल्समध्ये आम्ही व्यवसाय सुरु केला आहे. आम्ही कंडोमच्या व्यवसायात १९९१ मध्ये प्रवेश केला. ‘कामसूत्र’ हा ब्रॅन्ड आज लोकांच्या ‘कामजीवनात’ आनंद निर्माण करीत आहे, असे ते म्हणाले.सिंघानिया यांनी स्वत:च्या तीन आवडी सांगितल्या. सकाळी उठून व्यायाम, दिवसभर व्यवसाय आणि मोटार स्पोर्टसचा आनंद या तीन आवडी असल्याचे ते म्हणाले. याशिवाय कशात लक्ष घालण्यात मला वेळ नाही असे त्यांनी सांगितले.तुमचे वडिलांशी मालमत्तेवरून वाद झाले, असे विचारले असता ते हसत हसत म्हणाले, असे वाद तर घराघरात असतात. आम्ही त्याला अपवाद कसे राहू? पण आमच्या कुटुंबाचा नावलौकिक असल्याने माध्यमांनी हा विषय लावून धरला. मला त्याविषयी काहीच बोलायचे नाही.>होय, मराठीयेते की!एवढी वर्षे महाराष्टÑात आहात, मराठी येते की नाही? असे विचारले असता शुद्ध मराठीत ‘हो, मराठी येते की,’ असे उत्तर त्यांनी दिले. माझे वडील खेळाडू होते, मीही खेळाडू आहे. खेळावरील प्रेमापोटीच आम्ही देशातील खेळाडूंसाठी कपडे तयार करतो. जागतिक पातळीवरील खेळाडूंचे खेळाव्यतिरिक्त अधिकृत कपडे रेमंडचे असतात असेही सिंघानिया आवर्जून म्हणाले.>तीन वर्षांत कर्जमुक्त होऊ : वस्त्रोद्योगाची ९३ वर्षांची परंपरा व अनुभव पाठीशी असलेल्या रेमन्ड्स कंपनीच्या डोक्यावर २००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जापोटी कंपनीला दरवर्षी काही कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येत आहे. पण अमरावतीचा कारखाना कंपनीला कर्जातून बाहेर काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, एकदा उत्पादनांची पूर्ण साखळी तिथे उभी राहिली की, भांडवली गुंतवणूक थांबेल. कारखान्यातीला उत्पादनांची विक्री सुरू होईल. त्यातून कंपनी हळूहळू कर्जमुक्त होईल. अमरावती व इथिओपिया या दोन्ही ठिकाणची भांडवली गुंतवणूक अंतिम टप्प्यात आहे. कंपनी २०२०-२१ पासून कर्जमुक्त होण्यास सुरुवात होईल.