शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

निवडणुकीच्या खिंडीत गणपती पावतो

By संदीप प्रधान | Updated: September 9, 2018 04:54 IST

गणेशोत्सव आणि राजकारण यांचे नाते घरातील गणपती सार्वजनिक झाला, तेव्हापासून घट्टच आहे.

गणेशोत्सव आणि राजकारण यांचे नाते घरातील गणपती सार्वजनिक झाला, तेव्हापासून घट्टच आहे. माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांनी निवडणूक सुधारणा केल्यामुळे राजकारणातील कार्यकर्त्यांचे महत्त्व वाढले. असे एकगठ्ठा कार्यकर्ते गणेशोत्सव मंडळांकडे उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आमदार, नगरसेवक वेगवेगळ्या पद्धतीने मंडळांवर खैरात करतात. जुन्या इमारती, चाळी, झोपडपट्ट्यांमधील लोकांना पुनर्विकासाकरिता राजी करण्याकरिता व आपल्या हितसंबंधातील बिल्डरमार्फत ही कामे मिळवण्याकरिताही हा उत्सव हीच पर्वणी असते.घरोघरी पुजला जाणारा गणपती मखरातून उचलून वाड्यांच्या अंगणात आणून बसवण्यामागे लोकमान्य टिळक यांचा राजकीय हेतू होता. त्यामुळे गणेशोत्सव आणि राजकारण यांचा घट्ट संबंध आहे. प्लेगच्या साथीनंतर गणेशोत्सवातच चाफेकर यांना रॅण्डच्या वधाची प्रेरणा लोकमान्यांनी दिली आणि रॅण्डचा वध झाल्यावर ‘पुण्याच्या गणेशखिंडीत गणपती पावला,’ असा सूचक निरोप मिळण्याची वाट पाहत टिळक पहाटेपर्यंत जागे होते, असे दाखले इतिहासात आढळतात. त्या वेळी ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथून टाकणे, हा या उत्सवामागील हेतू होता.साधारणपणे १९९० साल उजाडेपर्यंत काही मोजकेच सार्वजनिक गणेशोत्सव लोकप्रिय होते. लालबागच्या गणेशगल्लीचा राजा, माटुंग्याचा वरदाभाईचा गणपती, चेंबूर टिळकनगरचा राजनचा गणपती... अशी वानगीदाखल काही नावे नमूद करता येतील. उंच मूर्ती, प्रकाशयोजना अथवा भव्यदिव्य सेट ही या गणपती मंडळांची वैशिष्ट्ये होती. टी.एन. शेषन केंद्रीय निवडणूक आयुक्त झाले आणि देशाला या पदाची सर्वप्रथम जाणीव झाली. त्यांनी जाहीर, गोंगाटी निवडणूक प्रचारावर निर्बंध आणले. शेषन यांचा हेतू शुद्ध होता. मात्र, कुठलाही नियम आपल्या सोयीनुसार वाकवण्यात वाकबगार असलेल्या राजकीय नेत्यांना गणेशोत्सव महत्त्वाचा वाटू लागला. गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते हे भावी राजकीय नेते असतात. त्यामुळे प्रस्थापित आमदार, नगरसेवक यांना निवडणूक प्रचाराकरिता लागणारे कार्यकर्त्यांचे जाळे हे गणेशोत्सव मंडळांकडून प्राप्त होते. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची फौज असलेल्या लोकप्रिय गणेशोत्सव मंडळांना घसघशीत देणग्या देऊन कमानी, जाहिराती करणे, मूर्तीकरिता पैसे देणे, कार्यकर्त्यांना एकसमानकुर्ते-पायजमे देणे, स्पर्धांकरिता पारितोषिके प्रायोजित करणे आदी अनेक गोष्टी लोकप्रतिनिधींना कराव्या लागतात. याकरिता मतदारसंघातील व्यापारी, हॉटेल, बारमालक, छोटे-मोठे उद्योजक, बिल्डर यांच्याकडून लोकप्रतिनिधी पैसे गोळा करतात. दहीहंडी किंवा गुढीपाडव्याच्या शोभायात्रेसारखे उत्सव एका दिवसात संपतात. मात्र, गणेशोत्सव हा १० दिवस साजरा होत असल्याने आणि प्रत्येक घरातील अबालवृद्ध (यामध्ये महिलाही आल्या) या उत्सवाशी जोडलेले असतात. त्यामुळे गणेशोत्सव हे आपल्या मतपेटीशी संपर्क साधण्याचे माध्यम असते. आमदार, नगरसेवक यांना गणेशोत्सवात घरगुती गणेशोत्सवांना भेटी देणे अनिवार्य असते. बऱ्याचदा आपण म्हणतो की, निवडणुकीत पैशांचे वाटप केले जाते. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यावर आयोगाचे लक्ष सर्वांवर असते. गणेशोत्सवात आपल्याला हमखास मते देणाºया सोसायट्या, चाळी, झोपड्यांमध्ये जाऊन गणपतीसमोर घरातील प्रत्येक माणशी दोन ते अडीच हजार रुपयांप्रमाणे आठ-दहा हजार रुपये ठेवले, तर ती वरकरणी दक्षिणा दिसत असली, तरी मतांच्या बेगमीकरिता दिलेला पहिला हप्ता असू शकतो. प्रत्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर प्रतिस्पर्धी उमेदवार किती रुपयांची बोली लावत आहे, हे समजल्यावर उर्वरित रक्कम प्रचारफेरीत ओवाळणी म्हणून टाकली जाऊ शकते किंवा घरपोच केली जाऊ शकते.सार्वजनिक उत्सवांचे आयोजन होणाºया चाळी, जुन्या इमारती, झोपडपट्ट्या यांच्या पुनर्विकासाचे मोठे आव्हान मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांत आहे. बहुतांश लोकप्रतिनिधींचे ठरावीक बिल्डरांसोबत हितसंबंध आहेत. त्यामुळे विशिष्ट विभागात विशिष्ट बिल्डरांचीच कामे सुरू असलेली दिसतात. गणेशोत्सव मंडळांना खूश करण्याकरिता हे बिल्डर पैसा पुरवतात. मंडळ खिशात घातले गेले की, पुनर्विकासाकरिता तोच आमदार, नगरसेवक पुढाकार घेऊन त्या बिल्डरचे घोडे दामटतो. अनेक ठिकाणी पुनर्विकासावरून आमदार विरुद्ध नगरसेवक यांचे संघर्ष सुरू असण्याचे एक कारण गणेशोत्सव मंडळांवर दोघांनीही पैशांची खैरात केली, हेही असते. तात्पर्य हेच की, निवडणुकीच्या खिंडीत प्रतिस्पर्धी चीतपट होऊन गणपती पावायचा असेल, तर त्याची आराधना गणेशोत्सवातच करायला हवी.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सव