शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गंगा, यमुना अन् माणुसकी

By admin | Updated: March 23, 2017 23:14 IST

गंगा आणि यमुना या दोन केवळ नद्या नाहीत, तो संस्कृतीचा प्रवाह असल्याने भारतीयांसाठी त्या पूजनीय आहेत. तीर्थ म्हणून त्यांचे स्थान आहे.

गंगा आणि यमुना या दोन केवळ नद्या नाहीत, तो संस्कृतीचा प्रवाह असल्याने भारतीयांसाठी त्या पूजनीय आहेत. तीर्थ म्हणून त्यांचे स्थान आहे. एकदा तरी गंगास्नान करावे, गंगातीरी वास्तव्य असावे अशी मनोकामना करणारे कोट्यवधी लोक या देशात आहेत. या दोन्ही नद्या सांस्कृतिक अस्मिता असल्या, तरी त्या प्रदूषित करण्याचा अक्षम्य गुन्हा आम्ही पिढ्यान्पिढ्या करीत आहोत. एकीकडे त्यांना पूजनीय मानायचे आणि त्याचवेळी गंगेची गटार करायची, ही दोन्ही कामे मानभावीपणे निष्ठेने आपण करीत असतो. नद्यांची ही हेळसांड फक्त या दोन नद्यांपुरती नाही, तर देशातील सर्व नद्या, ओढे, ओहोळ मानवाने प्रदूषित केले. त्यामुळे एकाही नदीचे पाणी शुद्ध नाही. गंगेच्या शुद्धीकरणाची मोहीम राजीव गांधी यांच्या काळात सुरू झाली आणि आतासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यासाठी ‘नमामि गंगे’ हा विशेष कार्यक्रम हाती घेतला. एवढे प्रयत्न होऊनही गंगा आणि यमुनेमधील प्रदूषण काही कमी झालेले नाही. सर्व सरकारी प्रयत्नांकडे जनतेने दुर्लक्ष केल्यामुळे सरकारी यंत्रणेने हात टेकले. अखेर उत्तराखंड उच्च न्यायालयाने पुढाकार घेऊन अखेरचा प्रयत्न म्हणून या दोन्ही नद्यांना जिवंत व्यक्तीचा दर्जा दिला. ही देशातील पहिलीच घटना आहे. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीस इजा पोहोचविणाऱ्यास, त्याला अपमानित केल्यास, त्याच्या जीवितास धोका निर्माण केल्यास कायद्यानुसार ज्या कलमाखाली गुन्हा नोंदविला जातो तसाच गुन्हा या दोन नद्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध दाखल केला जाईल. गेल्याच आठवड्यात न्यूझीलंडमध्ये व्हांगानुई या नदीला असाच दर्जा देण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी मोहम्मद सलीम नावाच्या इसमाने यासंबंधी याचिका दाखल केली होती, त्यावर उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. लाखो भारतीयांच्या मनात या नद्यांविषयी पवित्र भावना असल्यामुळे त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्यांना जिवंत व्यक्तीचा दर्जा देणे आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ‘नमामी गंगा’ प्रकल्पाचे संचालक, उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि अ‍ॅडव्होकेट जनरल अशा तीन अधिकाऱ्यांकडे गंगा आणि यमुनेचे पालकत्व सोपविण्यात आले. त्यांना या पाल्यांची सर्वच काळजी घ्यायची आहे. नद्या स्वच्छ राखण्याची जबाबदारी आपली आहे हे सामान्य माणूस स्वीकारणार नाही तोपर्यंत कायदे अपुरे पडतील. गंगा आणि यमुना आता केवळ नद्या नसून व्यक्ती म्हणून त्यांना कायदेशीर अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यांना माणसाप्रमाणे वागण्याची माणुसकी आपण दाखवणार का? नाही तर गडूमध्ये आणलेले गंगाजल देव्हाऱ्यात ठेवून पूजणारे आपण तीच गंगा प्रदूषित करतो या ढोंगी अध्यात्माचा त्याग करणार का, हे प्रश्न कायम आहेत. कारण गंगा आणि यमुना आता आपल्यासारख्याच आहेत.