शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

गंगा, यमुना अन् माणुसकी

By admin | Updated: March 23, 2017 23:14 IST

गंगा आणि यमुना या दोन केवळ नद्या नाहीत, तो संस्कृतीचा प्रवाह असल्याने भारतीयांसाठी त्या पूजनीय आहेत. तीर्थ म्हणून त्यांचे स्थान आहे.

गंगा आणि यमुना या दोन केवळ नद्या नाहीत, तो संस्कृतीचा प्रवाह असल्याने भारतीयांसाठी त्या पूजनीय आहेत. तीर्थ म्हणून त्यांचे स्थान आहे. एकदा तरी गंगास्नान करावे, गंगातीरी वास्तव्य असावे अशी मनोकामना करणारे कोट्यवधी लोक या देशात आहेत. या दोन्ही नद्या सांस्कृतिक अस्मिता असल्या, तरी त्या प्रदूषित करण्याचा अक्षम्य गुन्हा आम्ही पिढ्यान्पिढ्या करीत आहोत. एकीकडे त्यांना पूजनीय मानायचे आणि त्याचवेळी गंगेची गटार करायची, ही दोन्ही कामे मानभावीपणे निष्ठेने आपण करीत असतो. नद्यांची ही हेळसांड फक्त या दोन नद्यांपुरती नाही, तर देशातील सर्व नद्या, ओढे, ओहोळ मानवाने प्रदूषित केले. त्यामुळे एकाही नदीचे पाणी शुद्ध नाही. गंगेच्या शुद्धीकरणाची मोहीम राजीव गांधी यांच्या काळात सुरू झाली आणि आतासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यासाठी ‘नमामि गंगे’ हा विशेष कार्यक्रम हाती घेतला. एवढे प्रयत्न होऊनही गंगा आणि यमुनेमधील प्रदूषण काही कमी झालेले नाही. सर्व सरकारी प्रयत्नांकडे जनतेने दुर्लक्ष केल्यामुळे सरकारी यंत्रणेने हात टेकले. अखेर उत्तराखंड उच्च न्यायालयाने पुढाकार घेऊन अखेरचा प्रयत्न म्हणून या दोन्ही नद्यांना जिवंत व्यक्तीचा दर्जा दिला. ही देशातील पहिलीच घटना आहे. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीस इजा पोहोचविणाऱ्यास, त्याला अपमानित केल्यास, त्याच्या जीवितास धोका निर्माण केल्यास कायद्यानुसार ज्या कलमाखाली गुन्हा नोंदविला जातो तसाच गुन्हा या दोन नद्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध दाखल केला जाईल. गेल्याच आठवड्यात न्यूझीलंडमध्ये व्हांगानुई या नदीला असाच दर्जा देण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी मोहम्मद सलीम नावाच्या इसमाने यासंबंधी याचिका दाखल केली होती, त्यावर उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. लाखो भारतीयांच्या मनात या नद्यांविषयी पवित्र भावना असल्यामुळे त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्यांना जिवंत व्यक्तीचा दर्जा देणे आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ‘नमामी गंगा’ प्रकल्पाचे संचालक, उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि अ‍ॅडव्होकेट जनरल अशा तीन अधिकाऱ्यांकडे गंगा आणि यमुनेचे पालकत्व सोपविण्यात आले. त्यांना या पाल्यांची सर्वच काळजी घ्यायची आहे. नद्या स्वच्छ राखण्याची जबाबदारी आपली आहे हे सामान्य माणूस स्वीकारणार नाही तोपर्यंत कायदे अपुरे पडतील. गंगा आणि यमुना आता केवळ नद्या नसून व्यक्ती म्हणून त्यांना कायदेशीर अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यांना माणसाप्रमाणे वागण्याची माणुसकी आपण दाखवणार का? नाही तर गडूमध्ये आणलेले गंगाजल देव्हाऱ्यात ठेवून पूजणारे आपण तीच गंगा प्रदूषित करतो या ढोंगी अध्यात्माचा त्याग करणार का, हे प्रश्न कायम आहेत. कारण गंगा आणि यमुना आता आपल्यासारख्याच आहेत.