शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

क्षणभंगुर जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 12:21 AM

आपण ज्या जगात राहतो त्याचे नाव मर्त्यलोक आहे. मर्त्य हा शब्द ‘मृत्यू’ या शब्दापासून तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ आहे मरणारा. शेवटी या जगात जेवढ्या काही वस्तू आहेत, त्या सजीव असोत वा निर्जीव, सर्वांचा नाश हा एक दिवस अटळ आहे. जेव्हा आपण सजीव किंवा निर्जीव पदार्थांची तुलना करतो, तेव्हा आपल्याला समजते की निर्जीव पदार्थांचे जीवन सजीव पदार्थांपेक्षा निश्चित जास्त आहे.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायआपण ज्या जगात राहतो त्याचे नाव मर्त्यलोक आहे. मर्त्य हा शब्द ‘मृत्यू’ या शब्दापासून तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ आहे मरणारा. शेवटी या जगात जेवढ्या काही वस्तू आहेत, त्या सजीव असोत वा निर्जीव, सर्वांचा नाश हा एक दिवस अटळ आहे. जेव्हा आपण सजीव किंवा निर्जीव पदार्थांची तुलना करतो, तेव्हा आपल्याला समजते की निर्जीव पदार्थांचे जीवन सजीव पदार्थांपेक्षा निश्चित जास्त आहे. निर्जीव पदार्थ शेवटपर्यंत उपयोगात येतो. परंतु सजीवांमधून जीव निघून गेल्यानंतर त्याचे कलेवर पूर्णत: खराब होते किंवा ते जाळले जाते अथवा ते जमिनीमध्ये दफन केले जाते. सजीवांसाठी अन्न, पाणी व वायु आवश्यक आहे, तर हाच नियम निर्जीवांसाठी लागू नाही. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सजीव व निर्जीव दोन्ही ऊर्जेपासून तयार झालेले आहेत व या ऊर्जेचा नाश होत नाही. केवळ एका ऊर्जेचे रूपांतरण होते.भारतीय तत्त्वज्ञानात मानवी जीवनाच्या मृत्यूसंदर्भात खूपच खोलवर चर्चा झालेली आहे. मृत्यू काय आहे व त्याचे रहस्य काय? याचे फारच मोठे स्पष्टीकरण उपनिषद्, गीता तसेच इतरही ग्रंथातून पहायला मिळते. कठोपनिषदामध्ये नचिकेताची कहाणी खूपच चमत्कारिक आहे. नचिकेताच्या प्रश्नांना कंटाळून त्याच्या पित्याने त्यास यमराजास दान दिले. नचिकेता आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार यमराजाकडे गेला व त्याने यमराजांना जीवन व मृत्यूच्या संदर्भात खूपच गहन प्रश्न विचारले, ज्याचे वर्णन कठोपनिषदामध्ये पाहायला मिळते.यासंबंधी केल्या गेलेल्या विचारमंथनातून असे समजते की मानवाचे जीवन क्षणभंगुर आहे. केव्हा, कुठे व कसा मानवाचा मृत्यू होईल, हे पूर्णत: अनिश्चित आहे. शेवटी मानवाने नेहमीच यासाठी तयार असायला हवे. मृत्यूमध्ये शरीरही सोडले जाते. शेवटी हे जग आणि या जगातील सर्व संपन्नता निरर्थक होते. याच करणामुळे भारतीय अध्यात्मशास्त्रात मृत्यूवर कसा विजय मिळवावा हे शिकविले जाते. निर्वाण किंवा समाधी हे या मृत्यूवरील विजयाचेच प्रतीक आहे. संतांनीही याचे वर्णन आपल्या साहित्यात खूप सुंदररीत्या केलेले आहे. संत कबीर यांचे खालील कथन याच गोष्टीचे द्योतक आहे-‘‘ जस की तस धर दिन्ही चदरिया’’

टॅग्स :newsबातम्या