शहरं
Join us  
Trending Stories
1
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
2
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
3
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
4
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
6
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
7
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
8
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
9
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
10
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
11
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
12
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
13
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
14
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
15
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
16
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
17
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
18
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
19
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
20
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल

पाच दिवसांचा आठवडा: उद्देश सफल होईल का?

By रवी टाले | Published: February 13, 2020 7:35 PM

पाच दिवसांचा आठवडा: उद्देश सफल होईल का ही शंकाच आहे.

अखेर महाराष्ट्रसरकारने राज्य सरकारी कर्मचाºयांना पाच दिवसांचा आठवडा लागू केलाच! बºयाच दिवसांपासून सरकारचा तसा विचार असल्याची चर्चा सुरू होती. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे त्या चर्चेवर पडदा पडला. अर्थात हा निर्णय सरसकट सर्वच राज्य सरकारी कर्मचाºयांना लागू होणार नाही. अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत कर्मचाºयांसह इतरही काही सेवांमधील कर्मचाºयांना पूर्ववत सहा दिवसच काम करावे लागणार आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाºयांमध्ये आनंदाची लहर पसरणे स्वाभाविकच आहे; मात्र हा निर्णय राज्याच्या दृष्टीने लाभदायक असेल की नुकसानदायक, या मुद्यावरून दोन तट पडले आहेत. अगदी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही काही मंत्र्यांनी या निर्णयाला विरोध केल्याचे वृत्त बाहेर झिरपले आहे. आठवड्यात केवळ पाचच दिवस शासकीय कामकाज चालणार असल्याने सरकारचा आस्थापना, वीज, पाणी, शासकीय गाड्यांचे इंधन यावर होणार असलेला खर्च वाचणार आहे आणि त्यामुळे हा निर्णय लाभदायकच ठरणार आहे, असे निर्णयाच्या समर्थकांचे म्हणणे आहे. वस्तुत: या युक्तिवादातच विरोधाभास आहे. एकीकडे दैनंदिन कामकाजाची वेळ वाढविल्यामुळे आठवड्यातील कामाचे एकूण तास कमी होणार नाहीत, असेही म्हणायचे आणि दुसरीकडे वीज, पाणी यावरील खर्चात बचत होणार असल्याचेही म्हणायचे! जर कामाचे तास पूर्ववतच राहणार असतील, तर मग या खर्चात कशी बचत होऊ शकेल? वीज व पाण्यावरील खर्चातील बचतीप्रमाणेच शासकीय वाहनांच्या इंधन खर्चातही बचत होणार असल्याचा निर्णयाच्या समर्थकांचा दावा आहे. रविवार आणि सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी रस्त्यांवर सर्रास शासकीय वाहने धावताना बघणाºयांचा तरी या दाव्यावर विश्वास बसणे शक्य नाही. आता रविवारला जोडून आणखी एक सुटी मिळाली म्हटल्यावर इंधनाचा खर्च कमी होईल की वाढेल, हे ज्याचे त्याने ठरवावे! काही सन्माननीय अपवाद वगळता, आपल्या देशातील सरकारी अधिकारी व कर्मचारी कार्यक्षमता, निस्पृहता, सेवाभाव, प्रामाणिकता इत्यादी गुणांसाठी ना पूर्वी ओळखले जात होते, ना आता ओळखले जातात! एकदा सरकारी नोकरीत चिकटलो, की आयुष्यभर आपले कुणीच काहीही वाकडे करू शकत नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास असतो आणि तो ठायीठायी त्यांच्या वर्तणुकीतून झळकतही असतो. लालफीतशाही हा शब्द अशा अधिकारी-कर्मचाºयांमुळेच रुढ झाला आहे. गत शतकातील साठ-सत्तरच्या दशकात, कार्यालयात आल्यावर खुर्चीला कोट टांगून ठेवून दिवसभर अदृश्य होणाºया कर्मचाºयांवर अनेक विनोद होत असत. काळ बदलला असला तरी परिस्थितीत काही फार बदल झालेला नाही. कालौघात मस्टर (हजेरीपट) जाऊन बायोमेट्रिक यंत्रे आली खरी; पण त्यांचा किती उपयोग होतो, हे सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार काम पडणाºयांना चांगलेच ठाऊक असते. अनेक कार्यालयांमधील ती यंत्रे कामच करीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कामाचे तास वाढवण्याचा कितपत उपयोग होईल, याबाबत शंकाच आहे. मुळात पाच दिवसांचा आठवडा ही संकल्पना पाश्चात्य देशांमध्ये अस्तित्वात आली ती कर्मचाºयांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी! सहा दिवस कामाच्या ठिकाणी कष्ट करणाºया कर्मचाºयांना एक दिवस घरची कामे उरकण्यासाठी आणि एक दिवस विश्रांती घेण्यासाठी अथवा एखाद्या रमणीय ठिकाणी जाऊन ताजेतवाने होण्यासाठी मिळावा, ही त्यामागील कल्पना! पाश्चात्य देशांमध्ये आपल्या देशाप्रमाणे भरमसाठ सार्वजनिक सुट्या नसतात. त्यामुळे त्या देशांमध्ये पाच दिवसांच्या आठवड्याची गरज होतीच! श्रम संस्कृतीमध्ये विश्वास असलेल्या त्या देशांमध्ये त्याचे लाभही दिसून आले. आपल्या देशात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी ही संकल्पना आणली होती. केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये तेव्हापासून पाच दिवसांचाच आठवडा आहे; मात्र त्यामुळे त्या कार्यालयांच्या कार्यक्षमतेमध्ये किती सुधारणा झाली, यावर एकदा संशोधन व्हायला हवे. राजा बोले अन् दळ हाले, अशी म्हण आहे. लोकशाहीत राजाची जागा लोकांनी निवडून दिलेल्या सत्ताधाºयांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय लागू होणारच आहे! आता किमान निर्णयामागील उद्देश कसा सफल होईल, याची काळजी तरी त्यांनी घ्यावी, अशी अपेक्षाच तेवढी सर्वसामान्य जनता बाळगू शकते!
टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र