शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
5
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
6
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
7
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
8
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
9
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
10
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
11
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
12
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
13
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
15
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
16
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
17
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
18
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
19
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
20
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

युती सरकारची पहिल्याच अधिवेशनात आर्थिक परीक्षा

By admin | Updated: December 6, 2014 23:14 IST

गेली 15 वर्षे ज्यांची सत्ता राज्यावर होती, ते आता विरोधी पक्षात आहेत. अर्थात जे विरोधी पक्षात होते ते सत्तेत आले आहेत.

गेली 15 वर्षे ज्यांची सत्ता राज्यावर होती, ते आता विरोधी पक्षात आहेत. अर्थात जे विरोधी पक्षात होते ते सत्तेत आले आहेत. सरकारची लोकप्रियता ही नेहमी त्यांनी घेतलेल्या आर्थिक निर्णयांवर अवलंबून असते. परंतु हे निर्णय घेताना तारतम्य बाळगले नाही तर काय होते, याचे एक ताजे उधाहरण म्हणजे मागील आघाडी सरकार.
 
निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या तिजोरीला न पेलणारा बोजा टाकून सरकारने आपली विश्वासाहर्ता गमावली. परंतु या सर्व गोष्टींचा आता विचार करून उपयोग नाही; कारण आता सत्ता युतीची आहे. भाजपा व सेनेने निवडणुकीत जी आश्वासने दिली, ती आता पाळण्यासाठी काही धाडसी पावले उचलावी लागतील. वेळ पडल्यास काही तत्कालीन अप्रिय निर्णयही घ्यावे लागतील, म्हणूनच शासनाची आता आर्थिक परीक्षा आहे.
या अधिवेशनाच्या परीक्षेत काठावर पास होण्याएवढे गुण मिळाले तरी ते 1क्क् टक्के गुण मिळाल्यासारखेच आहेत. कारण आता लोकांच्या एवढय़ा अपेक्षा वाढल्या आहेत किंवा वाढविल्या गेल्या आहेत, की या मधल्या थोडय़ा तरी अपेक्षा पूर्ण होणो गरजेचे आहे, नाहीतर जनक्षोभ वाढेल. अर्थात ‘पी हळद, हो गोरी’ असे नक्कीच अपेक्षित जनतेने देखील करू नय़े थोडा काळ, वेळ सरकारला दिलाच पहिजे. परंतु सरकारनेही आम्ही आता दिलेल्या आश्वसनांच्या पूर्ततेकडे वाटचाल करीत आहोत, असे निर्णय व काम केले पाहिजे. पुढील आर्थिक गोष्टींकडे त्यानी लक्ष देणो गरजेचे आहे - दुधाचा हमीभाव, एलबीटी, चटईक्षेत्न, ऊसदर, बंधारे, ऊर्जा, वाहतूक व्यवस्था, भाजीपाला, सार्वजनिक आरोग्य, शिक्षणाचे बाजारीकरण इत्यादींवरील सर्व बाबींवर एकाचवेळी सुधारणा करता येणार नाही. तशी अपेक्षाही नाही. परंतु थोडे थोडे दुरुस्त या नात्याने सर्वस्पर्शी निर्णय घ्यावे लागतील. विशेषत: सहकार, सार्वजनिक बांधकाम व शिक्षण या तीन महत्त्वाच्या खात्यांबाबत दक्ष राहावे लागेल. ही तीन खाती राज्याचा आर्थिक कणा आहेत. मागील सरकारमधील बहुतेकांनी आपले साम्राज्य या तीन क्षेत्नांमध्ये निर्माण केले आहे. 
दूध, साखर व शिक्षण या तीन महत्त्वाच्या घटकांवर आघाडी सरकारमधीलच बहुतेकांचे साम्राज्य होते व आता त्यांच्यावर अंकुश ठेवणारे दुसरे सरकार आल्यामुळे ते नाराज झाले आहेत. जनतेला पुढे करून ते आपला असंतोष आता प्रकट करणार, हे नक्की. याचा सारासार विचार करून आता शासनाने आर्थिक आघाडीवर लढले पाहिजे अन्यथा लोकांमध्ये दिशाभूल करण्याचे तंत्न मागील आघाडी सरकारमधील अनेकांना चांगले अवगत आहे, हे या शासनाला विसरून चालणार नाही. 
केवळ आर्थिक श्वेतपत्रिका काढून हा प्रश्न सुटणार नाही, यासाठी अन्य ठोस उपाययोजना कराव्या लागतील. ज्या गोष्टींवर ठोस उपाययोजना होण्याची गरज आहे, त्या म्हणजे टोल, ऊसदर, दूध भाव, सहकारी सोसायटी, साखर, एमएमआरडीसी इत्यादी. 
या शासनाकडे जादूची कांडी नाही, याचे जरी सर्वाना भान असले तरी शासनानेसुद्धा शास्त्नशुद्ध कायदेशीर व लोकाभिमुख उपाययोजना करून विविध निर्णय व त्याप्रमाणो अंमलबजावणी करावी, ज्यामुळे लोकांमध्ये या शासनाची विश्वासार्हता वाढेल व आर्थिक आघाडीवर शासनाला या विविध समस्यांवर मात करता येईल व येणा:या अधिवेशनात आर्थिक परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत होईल.  (लेखिका अर्थशास्त्रच्या 
प्राध्यापिका आहेत.)
 
- डॉ. वसुधा गर्दे