शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

युती सरकारची पहिल्याच अधिवेशनात आर्थिक परीक्षा

By admin | Updated: December 6, 2014 23:14 IST

गेली 15 वर्षे ज्यांची सत्ता राज्यावर होती, ते आता विरोधी पक्षात आहेत. अर्थात जे विरोधी पक्षात होते ते सत्तेत आले आहेत.

गेली 15 वर्षे ज्यांची सत्ता राज्यावर होती, ते आता विरोधी पक्षात आहेत. अर्थात जे विरोधी पक्षात होते ते सत्तेत आले आहेत. सरकारची लोकप्रियता ही नेहमी त्यांनी घेतलेल्या आर्थिक निर्णयांवर अवलंबून असते. परंतु हे निर्णय घेताना तारतम्य बाळगले नाही तर काय होते, याचे एक ताजे उधाहरण म्हणजे मागील आघाडी सरकार.
 
निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या तिजोरीला न पेलणारा बोजा टाकून सरकारने आपली विश्वासाहर्ता गमावली. परंतु या सर्व गोष्टींचा आता विचार करून उपयोग नाही; कारण आता सत्ता युतीची आहे. भाजपा व सेनेने निवडणुकीत जी आश्वासने दिली, ती आता पाळण्यासाठी काही धाडसी पावले उचलावी लागतील. वेळ पडल्यास काही तत्कालीन अप्रिय निर्णयही घ्यावे लागतील, म्हणूनच शासनाची आता आर्थिक परीक्षा आहे.
या अधिवेशनाच्या परीक्षेत काठावर पास होण्याएवढे गुण मिळाले तरी ते 1क्क् टक्के गुण मिळाल्यासारखेच आहेत. कारण आता लोकांच्या एवढय़ा अपेक्षा वाढल्या आहेत किंवा वाढविल्या गेल्या आहेत, की या मधल्या थोडय़ा तरी अपेक्षा पूर्ण होणो गरजेचे आहे, नाहीतर जनक्षोभ वाढेल. अर्थात ‘पी हळद, हो गोरी’ असे नक्कीच अपेक्षित जनतेने देखील करू नय़े थोडा काळ, वेळ सरकारला दिलाच पहिजे. परंतु सरकारनेही आम्ही आता दिलेल्या आश्वसनांच्या पूर्ततेकडे वाटचाल करीत आहोत, असे निर्णय व काम केले पाहिजे. पुढील आर्थिक गोष्टींकडे त्यानी लक्ष देणो गरजेचे आहे - दुधाचा हमीभाव, एलबीटी, चटईक्षेत्न, ऊसदर, बंधारे, ऊर्जा, वाहतूक व्यवस्था, भाजीपाला, सार्वजनिक आरोग्य, शिक्षणाचे बाजारीकरण इत्यादींवरील सर्व बाबींवर एकाचवेळी सुधारणा करता येणार नाही. तशी अपेक्षाही नाही. परंतु थोडे थोडे दुरुस्त या नात्याने सर्वस्पर्शी निर्णय घ्यावे लागतील. विशेषत: सहकार, सार्वजनिक बांधकाम व शिक्षण या तीन महत्त्वाच्या खात्यांबाबत दक्ष राहावे लागेल. ही तीन खाती राज्याचा आर्थिक कणा आहेत. मागील सरकारमधील बहुतेकांनी आपले साम्राज्य या तीन क्षेत्नांमध्ये निर्माण केले आहे. 
दूध, साखर व शिक्षण या तीन महत्त्वाच्या घटकांवर आघाडी सरकारमधीलच बहुतेकांचे साम्राज्य होते व आता त्यांच्यावर अंकुश ठेवणारे दुसरे सरकार आल्यामुळे ते नाराज झाले आहेत. जनतेला पुढे करून ते आपला असंतोष आता प्रकट करणार, हे नक्की. याचा सारासार विचार करून आता शासनाने आर्थिक आघाडीवर लढले पाहिजे अन्यथा लोकांमध्ये दिशाभूल करण्याचे तंत्न मागील आघाडी सरकारमधील अनेकांना चांगले अवगत आहे, हे या शासनाला विसरून चालणार नाही. 
केवळ आर्थिक श्वेतपत्रिका काढून हा प्रश्न सुटणार नाही, यासाठी अन्य ठोस उपाययोजना कराव्या लागतील. ज्या गोष्टींवर ठोस उपाययोजना होण्याची गरज आहे, त्या म्हणजे टोल, ऊसदर, दूध भाव, सहकारी सोसायटी, साखर, एमएमआरडीसी इत्यादी. 
या शासनाकडे जादूची कांडी नाही, याचे जरी सर्वाना भान असले तरी शासनानेसुद्धा शास्त्नशुद्ध कायदेशीर व लोकाभिमुख उपाययोजना करून विविध निर्णय व त्याप्रमाणो अंमलबजावणी करावी, ज्यामुळे लोकांमध्ये या शासनाची विश्वासार्हता वाढेल व आर्थिक आघाडीवर शासनाला या विविध समस्यांवर मात करता येईल व येणा:या अधिवेशनात आर्थिक परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत होईल.  (लेखिका अर्थशास्त्रच्या 
प्राध्यापिका आहेत.)
 
- डॉ. वसुधा गर्दे