शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

युती सरकारची पहिल्याच अधिवेशनात आर्थिक परीक्षा

By admin | Updated: December 6, 2014 23:14 IST

गेली 15 वर्षे ज्यांची सत्ता राज्यावर होती, ते आता विरोधी पक्षात आहेत. अर्थात जे विरोधी पक्षात होते ते सत्तेत आले आहेत.

गेली 15 वर्षे ज्यांची सत्ता राज्यावर होती, ते आता विरोधी पक्षात आहेत. अर्थात जे विरोधी पक्षात होते ते सत्तेत आले आहेत. सरकारची लोकप्रियता ही नेहमी त्यांनी घेतलेल्या आर्थिक निर्णयांवर अवलंबून असते. परंतु हे निर्णय घेताना तारतम्य बाळगले नाही तर काय होते, याचे एक ताजे उधाहरण म्हणजे मागील आघाडी सरकार.
 
निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या तिजोरीला न पेलणारा बोजा टाकून सरकारने आपली विश्वासाहर्ता गमावली. परंतु या सर्व गोष्टींचा आता विचार करून उपयोग नाही; कारण आता सत्ता युतीची आहे. भाजपा व सेनेने निवडणुकीत जी आश्वासने दिली, ती आता पाळण्यासाठी काही धाडसी पावले उचलावी लागतील. वेळ पडल्यास काही तत्कालीन अप्रिय निर्णयही घ्यावे लागतील, म्हणूनच शासनाची आता आर्थिक परीक्षा आहे.
या अधिवेशनाच्या परीक्षेत काठावर पास होण्याएवढे गुण मिळाले तरी ते 1क्क् टक्के गुण मिळाल्यासारखेच आहेत. कारण आता लोकांच्या एवढय़ा अपेक्षा वाढल्या आहेत किंवा वाढविल्या गेल्या आहेत, की या मधल्या थोडय़ा तरी अपेक्षा पूर्ण होणो गरजेचे आहे, नाहीतर जनक्षोभ वाढेल. अर्थात ‘पी हळद, हो गोरी’ असे नक्कीच अपेक्षित जनतेने देखील करू नय़े थोडा काळ, वेळ सरकारला दिलाच पहिजे. परंतु सरकारनेही आम्ही आता दिलेल्या आश्वसनांच्या पूर्ततेकडे वाटचाल करीत आहोत, असे निर्णय व काम केले पाहिजे. पुढील आर्थिक गोष्टींकडे त्यानी लक्ष देणो गरजेचे आहे - दुधाचा हमीभाव, एलबीटी, चटईक्षेत्न, ऊसदर, बंधारे, ऊर्जा, वाहतूक व्यवस्था, भाजीपाला, सार्वजनिक आरोग्य, शिक्षणाचे बाजारीकरण इत्यादींवरील सर्व बाबींवर एकाचवेळी सुधारणा करता येणार नाही. तशी अपेक्षाही नाही. परंतु थोडे थोडे दुरुस्त या नात्याने सर्वस्पर्शी निर्णय घ्यावे लागतील. विशेषत: सहकार, सार्वजनिक बांधकाम व शिक्षण या तीन महत्त्वाच्या खात्यांबाबत दक्ष राहावे लागेल. ही तीन खाती राज्याचा आर्थिक कणा आहेत. मागील सरकारमधील बहुतेकांनी आपले साम्राज्य या तीन क्षेत्नांमध्ये निर्माण केले आहे. 
दूध, साखर व शिक्षण या तीन महत्त्वाच्या घटकांवर आघाडी सरकारमधीलच बहुतेकांचे साम्राज्य होते व आता त्यांच्यावर अंकुश ठेवणारे दुसरे सरकार आल्यामुळे ते नाराज झाले आहेत. जनतेला पुढे करून ते आपला असंतोष आता प्रकट करणार, हे नक्की. याचा सारासार विचार करून आता शासनाने आर्थिक आघाडीवर लढले पाहिजे अन्यथा लोकांमध्ये दिशाभूल करण्याचे तंत्न मागील आघाडी सरकारमधील अनेकांना चांगले अवगत आहे, हे या शासनाला विसरून चालणार नाही. 
केवळ आर्थिक श्वेतपत्रिका काढून हा प्रश्न सुटणार नाही, यासाठी अन्य ठोस उपाययोजना कराव्या लागतील. ज्या गोष्टींवर ठोस उपाययोजना होण्याची गरज आहे, त्या म्हणजे टोल, ऊसदर, दूध भाव, सहकारी सोसायटी, साखर, एमएमआरडीसी इत्यादी. 
या शासनाकडे जादूची कांडी नाही, याचे जरी सर्वाना भान असले तरी शासनानेसुद्धा शास्त्नशुद्ध कायदेशीर व लोकाभिमुख उपाययोजना करून विविध निर्णय व त्याप्रमाणो अंमलबजावणी करावी, ज्यामुळे लोकांमध्ये या शासनाची विश्वासार्हता वाढेल व आर्थिक आघाडीवर शासनाला या विविध समस्यांवर मात करता येईल व येणा:या अधिवेशनात आर्थिक परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत होईल.  (लेखिका अर्थशास्त्रच्या 
प्राध्यापिका आहेत.)
 
- डॉ. वसुधा गर्दे