शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आर्थिक अडचण आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 3:43 PM

बेस्ट आणि तिचे कर्मचारी यांच्या व्यथा गेल्या काही वर्षांपासून वाढतच आहेत. याची कारणे बेस्ट व तिच्या कर्मचाऱ्यांनीच शोधायला हवीत. 

ठळक मुद्देबेस्टची आर्थिकस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे कर्मचाऱ्यांना काही वेळा वेतन वेळेवर मिळत नाहीवर्षांपासूनच्या मागण्या काही पूर्ण होत नाही. परिणामी दर तीन किंवा सहा महिन्यांनी बेस्टचे कर्मचारी संपाचे हत्यार उपसतातबेस्ट आणि तिचे कर्मचारी यांच्या व्यथा गेल्या काही वर्षांपासून वाढतच आहेत. याची कारणे बेस्ट व तिच्या कर्मचाऱ्यांनीच शोधायला हवीत. 

- विनायक पात्रुडकर

कर्मचाऱ्यांच्या मागण्या संपत नाही. मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे संपाचे हत्यार असतेच. आर्थिक अडवणीत असलेल्या प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणे शक्य होत नसते. अशा विवंचनेत बेस्ट गेल्या काही वर्षांपासून सापडत आहे. बेस्टची आर्थिकस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.  दुसरीकडे येथील कर्मचाऱ्यांना काही वेळा वेतन वेळेवर मिळत नाही. बोनससाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते. न्यायालयाच्या आदेशामुळे कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो. त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या काही पूर्ण होत नाही. परिणामी दर तीन किंवा सहा महिन्यांनी बेस्टचे कर्मचारी संपाचे हत्यार उपसतात. 

संप करताना सर्वसामान्यांना होणाऱ्या  त्रासाचा विचार केला जात नाही. ही स्वार्थी वृत्ती प्रत्येकाचीच असते. पण बेस्ट आणि तिचे कर्मचारी यांच्या व्यथा गेल्या काही वर्षांपासून वाढतच आहेत. याची कारणे बेस्ट व तिच्या कर्मचाऱ्यांनीच शोधायला हवीत. काही वर्षांपूर्वी मुंबईकरांसाठी बेस्ट हा वाहतुकीचा उत्तम पर्याय होता. त्यावेळी बस वेळेवरही येत होती. आता तिला वाहतूक कोंडीचे कारण आहेच म्हणा.  तेव्हा शेअर टॅक्सी नव्हती. त्यामुळे छोट्या अंतरावर जाण्यासाठी मुंबईकरांना बसशिवाय पर्याय नव्हता. अशा प्रकारे तेजीत असलेल्या बसला उतरती कळा लागली. मुंबईकरांना शेअर टॅक्सीचा पर्याय आला. हळूहळू खासगी कंपन्यांच्या अ‍ॅप बेस्ड टॅक्सी आल्या.  बेस्टचे प्रवासी कमी होवू लागले. तिजोरी रिकामी होऊ लागली. याची झळ लागल्यानंतर बेस्टने उपाय सुरू केले. छोट्या अंतरासाठी बस सेवा सुरू केली. फेऱ्या वाढवल्या. तरीदेखील बेस्टच्या अडचणी काही कमी झाल्या नाहीत. कर्मचाऱ्यांच्या मागण्याही या काळात वाढत गेल्या. 

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, वेतन वाढ करावी, या प्रमुख मागण्या आजवर प्रलंबितच आहेत. याच प्रमुख मागण्या पुढे करून कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. हा संप होऊ नये यासाठी बैठक झाली, पण ती निष्फळ ठरली. त्यामुळे संप अटळ आहे. कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेचा संप सर्वसार्मान्यांना फटका देणाराचा असतो. त्यामुळे त्याचे समर्थन सर्वसामान्यांकडून होणार नाही. मात्र कामगारांचे प्रश्न सोडवायलाच हवेत. कामगार चळचळ इतिहासजमा झाली आहे. नवीन कार्यप्रणालीत कामगारांना संप करण्याची मुभा ठेवलेली नाही. परिणामी बेस्ट कामगारांना न्याय मिळायलाच हवा, पण त्यात सर्वसामान्य भुरडला जाऊ नये, एवढीच अपेक्षा.

 

टॅग्स :BESTबेस्टMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाMumbaiमुंबई