शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

फिफा विश्वचषक : भारतीय फुटबॉलला ‘संजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 03:14 IST

१७ वर्षे गटाच्या फिफा विश्वचषक फुटबॉलचा थरार उद्या शुक्रवारपासून भारतात सुरू होत आहे. देशाच्या क्रीडा विश्वात या खेळाची लोकप्रियता वाढविण्याचा हा प्रयत्न आहे.

अयाज मेमन, संपादकीय सल्लागार१७ वर्षे गटाच्या फिफा विश्वचषक फुटबॉलचा थरार उद्या शुक्रवारपासून भारतात सुरू होत आहे. देशाच्या क्रीडा विश्वात या खेळाची लोकप्रियता वाढविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळेच केंद्र शासनाने आयोजनासाठी सर्वतोपरी मदतीचा हात दिला. मोठ्या प्रमाणावर टीव्ही प्रसारण होणार असल्याने फुटबॉलचे जुनेजाणते चाहते तर आनंदी आहेतच पण युवावर्ग मोठ्या संख्येने या खेळाकडे वळणार आहे.भारतीय संघ देखील स्पर्धेत सहभागी होणार. पण ही केवळ हजेरी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यामुळे भारतीय प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचविण्याचे काम निश्चितपणे होणार आहे. भारत जेतेपदापर्यंत मुसंडी मारु शकतो, अशी आशा बाळगणे अतिशयोक्ती ठरेल. पण या स्तरावर निव्वळ सहभाग असणे हे देखील नव्या दमाच्या प्रतिभावान खेळाडूंना दीर्घकाळासाठी लाभदायी ठरू शकेल. ही ज्युनियर्स खेळाडूंची स्पर्धा असली तरी खेळाचा स्तर अतिशय दर्जेदार असेल यात शंका नाही. जगभरात फुटबॉल खेळाडूंची शोधमोहिम ८ ते १२ या वयोगटात सुरू होते. या खेळाडूंवर मेहनत घेऊन त्यांच्यातील टॅलेंट हेरले जाते. ही मुले १६-१७ वर्षांत पदार्पण करताच त्यांच्यापैकी काहीजण क्लब आणि देशासाठी खेळण्यास सज्ज होतात. या स्पर्धेच्या निमित्ताने युरोप, लॅटिन अमेरिका आणि आशियातील बलाढ्य युवा खेळाडूंविरुद्ध खेळण्याचा अमूल्य असा अनुभव भारतीय खेळाडूंना घेता येणार आहे. या निमित्ताने क्रीडाविश्वातील युवाशक्तीला एका सूत्रात बांधण्याचे देखील काम होणार आहे.भारतात फुटबॉलची स्थिती फारशी चांगली नाही. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या १५ वर्षांत या खेळाची लोकप्रियता भरास आली होती. खरेतर १९५० साली भारतीय फुटबॉल संघाने फिफा विश्वचषकाची पात्रता देखील गाठली होती. नंतर १९५६ साली भारतीय संघ आॅलिम्पिकसाठीही पात्र ठरला होता. त्यावेळी भारत चौथ्या स्थानावर राहिला. त्याच वर्षी १९५६ च्या आशियाडचे सुवर्ण भारतानेच जिंकले. १९६२ च्या आशिया चषकात पुन्हा एकदा सुवर्णमय कामगिरी झाली होती. भारतीय फुटबॉलची ताकद वाढण्यामागे खरे कारण होते क्लब संस्कृती. दुर्दैवाने ते चित्र पालटले. प्रतिभावान खेळाडूंकडे लक्ष देण्यात व्यवस्था कमी पडली. प्रशासनात राजकारण शिरल्याने खेळाडू एकाकी पडला. भारतीय फुटबॉल एका मर्यादेत अडकला. दरम्यान भारतीय फुटबॉल माघारत असल्याची काहींना जाणीव झाली, पण तोवर बरेच पाणी वाहून गेले होते. बहुतेक देशांनी फुटबॉलमध्ये वेगाने प्रगती केली. भारतीय फुटबॉलला मात्र पाहिजे तशी प्रगती करता आली नाही. १९५० ते ६० हा सुवर्णकाळ मानल्यास त्यानंतर चार दशके भारत फुटबॉलमध्ये संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. गेल्या दशकात भारतीय फुटबॉलला दलदलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण परंपरागत विचारसरणी असणाºया राष्ट्रीय महासंघाला गतिशीलता प्रदान करणे सोपे नाही. जागतिकीकरणामुळे फुटबॉलची शक्ती खºया अर्थाने कळली. या समीकरणाचा भारतीय फुटबॉलला कसा लाभ मिळवून देता येईल, हे अ. भा. फुटबॉल महासंघाच्या प्रशासकांसाठी आव्हान आहे. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणे म्हणजे मोठ्या महत्त्वकांक्षा व दृष्टिकोन पूर्ण झाला असे म्हणण्यापेक्षा आयोजनाने भारतीय संस्कृतीला आपले पावित्र्य अधोरेखित करता येईल.

टॅग्स :Sportsक्रीडा