शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

सण पर्यावरणपूरक करण्यावर भर हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 07:38 IST

दृष्टिकोन

सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १0 या वेळेतच फटाके फोडण्याचे आदेश दिल्याने गेल्या दिवाळी सणाच्या काळात त्याचे कोणते परिणाम होतात याकडे सर्वांचं लक्ष खिळलं होतं. यंदा फटाके फुटण्याचं प्रमाण २0 ते ३0 टक्क्यांनी कमी होतं. एकूणच ध्वनी आणि वायुप्रदूषणाच्या मुद्द्यावर जनजागृती वाढत जाणे अपेक्षित आहे.

फटाक्यांमुळे प्रदूषण होणं ही बाब आता काही नवीन राहिलेली नाही. सर्वसामान्यांना या प्रदूषणाचा त्रास होतो. पन्नास - साठ वर्षांपूर्वीपर्यंत प्रदूषण नव्हतं. वाहनांची संख्या तेव्हा आजच्या इतकी नव्हती. झाडांची बेसुमार कत्तलही आजच्या इतकी झाली नव्हती. पण गेल्या काही वर्षांत परिस्थिती झपाट्याने बदलली. जे बदल झालेत त्या बदलांनी पराकोटीची स्थिती गाठली आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्याबाबत दिलेला निर्णय हा काही तडकाफडकी दिलेला नाही. असा निर्णय देण्यामागे एक विचार असतो. न्यायालयाने फटाके वाजवण्यावर बंदी घातलेली नाही तर वेळेची मर्यादा ठरवून दिली आहे. कारण कशावर तरी बंदी घातली की त्या क्षेत्रातला भ्रष्टाचार वाढतो, असा आजवरचा अनुभव आहे.

आपल्या समाजात कित्येक बाबतींत तारतम्य बाळगलं जात नाही. एकदा मुभा मिळाली की ऊस मुळापासून खायचा ही सर्वसाधारण मानसिकता असते. घटनेने आपल्याला हक्क दिलेत आणि त्यासोबत जबाबदाऱ्याही दिल्यात याची जाणीव क्वचितच ठेवली जाते. न्यायालयाने दिलेला लोकहिताचा निर्णय हा आपल्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी हितकारक आहे, हे सर्वांत आधी लक्षात घ्यायला हवं. तो निर्णय देताना वैज्ञानिक कारणं, अर्थकारण असे वेगवेगळे मुद्दे न्यायालयाने तपासलेले असतात. त्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम हे इष्टच असतील, यात शंका बाळगण्याचं कारण नाही. वास्तविक फटाक्यांचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. सर्वांनी दीपावलीनिमित्त दिव्यांचा सण साजरा करावा, एकत्र यावं, फराळ करावा अशीच परंपरा आहे. आपल्या सणांची वैशिष्ट्यं अशी की, आपले सगळे सण मूळात पर्यावरणपूरक आहेत. पण नंतर आपणच ते पर्यावरणदूषक केले आहेत. त्यामुळे आता समाजाने न्यायालयाने दिलेला निर्णय आनंदाने स्वीकारत त्याचं पालन केलं पाहिजे.

न्यायालयाने दिलेले निकाल विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेले असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालांची दखल घेतलेली असते. राज्य घटनेच्या चौकटीत आपण हे निकाल स्वीकारले पाहिजेत. मार्गदर्शक तत्त्वांची दखल घेतली पाहिजे. अगदी आता लहान मुलांनाही हे पटतं. पण मोठ्यांना ते पटत नाही हे दुर्दैव आहे. काळाच्या ओघात सार्वजनिक गणेशोत्सव, रंगपंचमी यांसारख्या सणांचं स्वरूप बदलत आहे. नको त्या अट्टाहासापायी सणांच्या काळात प्रदूषण वाढतं. परिणामी कान, नाक घसा यांसारख्या असंख्य आजारांचं प्रमाण वाढतंय, याचीही दखल सर्वांनी घेणं आवश्यक आहे. फटाके वाजवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केलं. त्याचप्रमाणे धर्मगुरू, राजकीय नेते, सेलिब्रिटी यांनी असं आवाहन करण्यात आघाडीवर राहिलं पाहिजे. समाज मनावर त्याचा योग्य तो परिणाम होतो. आपले सण पर्यावरणपूरक कसे करता येतील ते आपणच कटाक्षाने पाहिलं पाहिजे.

डॉ. महेश बेडेकर

ध्वनिप्रदूषणाचे अभ्यासक 

टॅग्स :fire crackerफटाकेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय