शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी भागाचा दौरा; आभार आणि अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 17:40 IST

केंद्राकडे मागणी केलेल्या ७ हजार कोटींचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून घेऊन राज्यातील दुष्काळी भागाला विनाविलंब लाभ पोहोचविण्याची अपेक्षाही केली आहे.

धर्मराज हल्लाळे

ऐन दिवाळीत उस्मानाबादचा दौरा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे जनतेने आभार मानले. मात्र त्याचवेळी केंद्राकडे मागणी केलेल्या ७ हजार कोटींचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून घेऊन राज्यातील दुष्काळी भागाला विनाविलंब लाभ पोहोचविण्याची अपेक्षाही केली आहे. राज्यातील २६ जिल्ह्यात १५१ तालुक्यांमध्ये, २५० महसूल मंडळात दुष्काळी लाभ दिले जाणार आहेत. त्यात पाणीटंचाई निवारणाला प्राधान्य असेल. परंतु, दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्थाच कोलमडते. पीक येईल आणि देणी फिटतील या अपेक्षेचा भंग होतो. कर्ज कायम राहते. त्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या शिक्षण व आरोग्याच्या गरजा पुढच्या वर्षभरात कशा भागवायच्या हा मोठा प्रश्न असतो. पीक विमा मिळेल. टँकरने पाणीपुरवठा होईल. परंतु, तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी असलेल्या मुलांचा खर्च कसा भागवायचा. त्यांचे शैक्षणिक शुल्क कसे भरायचे, हा प्रश्न सतावतो. त्यात सर्वात पहिल्यांदा शेतकरी कुटुंबातील मुलींचे शिक्षण बंद होते. मुलांच्याही सुविधांवर परिणाम होतो. अनेकांचे शिक्षण अर्धवट राहते. शिक्षणाबरोबरच दूसरा सर्वात मोठा खर्च आरोग्याचा असतो. शासनाच्या कितीही योजना असल्या तरी दररोज रूग्णालयाची चढावी लागणारी पायरी ही खिसा रिकामा करणारी ठरते. अचानक उद्भवणारे आजारपण आणि त्याचा खर्च हा शेतकरी कुटुंबासमोरचा प्रश्न असतो. दुष्काळी उपाययोजनांमध्ये स्वाभाविकच जगणे सुसह्य करण्याला प्राधान्य दिले जाते. दैनंदिन खर्च भागविणे हे सरकारच्याही मर्यादे पलिकडचे आहे. त्यामुळे शेती पिकणे आणि माल योग्य भागात विकणे हाच एकमेव शाश्वत पर्याय आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या प्रारंभाला उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला. राज्यामध्ये आजपर्यंत कधीही दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी इतक्या गतीने पावले उचलली नाहीत, असा दावा त्यांनी केला. आॅक्टोबर अखेर दुष्काळा संदर्भातील घोषणा केल्या आणि लवकरच मदतीसाठी प्रस्ताव पाठवित आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाणीटंचाईचे आराखडे तयार आहेत.  त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे सरकारचे आश्वासन आहे. शेतकरी आणि दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार पावले उचलत आहे, हे दाखवून दिले. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी २२०० कोटींचा प्रस्ताव नाबार्डकडे सादर केला आहे. ही सर्व मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती दिलासा देणारी आहे. परंतु, अंमलबजावणी कधी होणार हा इथल्या जनतेचा प्रश्न आहे.

ज्या गावांमध्ये पेयजलाचे संकट येईल तिथे सरकार टँकरने पाणी नेईल. मात्र जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न हा मोठा आहे. रोजगार हमीची कामे केली जातील. दुष्काळ्यामुळे कोरड्याठाक पडलेल्या प्रकल्पातील गाळ उपसण्याची कामे होतील.  ज्यामुळे गरजू शेतकऱ्यांची जमीन सुपीक होईल अशी अपेक्षा आहे. आज मात्र जे पेरले आहे ते उगवलेले नाही. खरीप हातातून गेले. रब्बी येणार नाही, हीच वस्तूस्थिती आहे. त्यामुळे मदतीकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा पशुधनाची चिंता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबद्दल आभार व्यक्त करताना मोठ्या अपेक्षासुद्धा आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांचे तर दोन्हीही हंगाम गेल्यामुळे थेट पावसाळ्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत उसनवारी आणि कर्ज हे पाचविला पुंजले आहे. त्या दुष्टचक्रातून कधी सुटका होईल, हाच यक्ष प्रश्न आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWaterपाणीEducationशिक्षणFarmerशेतकरी