शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

आत्मभान जागृत करणारा ‘परिवार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 1:37 AM

लक्ष्मीपूजनाला मोरवड या दीड हजार लोकसंख्येच्या गावात सातपुड्यातून शेकडो आदिवासी बांधव सहकुटुंब यंदा पुन्हा जमले. संत गुलाम महाराज यांच्या समाधीसमोर हातात लाल ध्वज आणि आरती घेऊन ‘आप की जय’ म्हणत परस्परांची आरती ओवाळली.

- मिलिंद कुलकर्णीलक्ष्मीपूजनाला मोरवड या दीड हजार लोकसंख्येच्या गावात सातपुड्यातून शेकडो आदिवासी बांधव सहकुटुंब यंदा पुन्हा जमले. संत गुलाम महाराज यांच्या समाधीसमोर हातात लाल ध्वज आणि आरती घेऊन ‘आप की जय’ म्हणत परस्परांची आरती ओवाळली. गेली ८० वर्षे ही प्रथा सुरू आहे. आदिवासी बांधवांमधील आत्मभान जागृत करणा-या या अबोल चळवळीचे कार्य विस्मयकारी असेच आहे.‘आप की जय’ या परिवाराचे संस्थापक असलेले संत गुलाम महाराज यांचे जीवनकार्य आणि त्यांनी स्थापन केलेला परिवार हा त्यांच्या प्रागतिक व सुधारणावादी विचारांचा अनोखा आविष्कार म्हणायला हवा. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा या तालुक्याच्या शहरापासून अवघ्या ५ कि.मी.वर मोरवड हे गाव आहे. १८९८ ते १९३८ असे अवघे ४० वर्षे आयुर्मान लाभलेले गुलाम महाराज हे निरक्षर होते. सालदारी करणाºया कुटुंबात जन्मलेल्या महाराजांनी स्वत: गुरे राखण्याचे काम केले. पंढरपूरची वारी आणि फैजपूर (जि.जळगाव) येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला लावलेली हजेरी यातून महाराजांची आध्यात्मिक व राष्टÑीयत्वाची जाण लक्षात येते. आदिवासी बांधवांमध्ये आत्मभान जागृत करण्यासाठी या परिवाराची त्यांनी स्थापना केली. या परिवारातील सदस्यांसाठी आचारसंहिता निश्चित केली. ८० वर्षांपूर्वीचा काळ लक्षात घेता या आचारसंहितेचे महत्त्व लक्षात यावे. रोज आंघोळ करा, शौचास जाताना पाणी वापरा, गंध व कुंकू लावा, दारू पिऊ नका, भांग-गांजा घेऊ नका, मांस खाऊ नका, खरे बोला; लबाडी करू नका, फसवू नका, ‘आप’ची आरती करा, परस्परांची आरती करा ही साधी सोपी शिकवण त्यांनी आदिवासी बांधवांना दिली.आपण सर्व परमात्म्याचे अंश आहोत, या भावनेतून त्यांनी ‘आप’ या नवीन शब्दाची योजना केली. क्रांतीचा रंग लाल असल्याने या परिवाराच्या ध्वजाचा रंग तोच निश्चित केला. दर सोमवारी मोरवड गावी एकत्र येऊन सामुदायिक आरती समारंभ त्यांनी सुरू केला. आदिवासी बांधव सहकुटुंब एकत्र येतात. सायंकाळी हातात आरती घेऊन गावातून मिरवणूक काढतात. नंतर महाराजांच्या समाधीस्थळी येऊन ‘आप’ तत्त्वास ओवाळतात. ही प्रथा सुरू करीत असताना महाराजांची काही बंधने परिवाराला घातली. स्वत:ला कधीही त्यांनी ओवाळून घेतले नाही. तसेच केवळ तेलवातीच्या आरतीशिवाय कोणतीही सामुग्री या समारंभास आणू नये, असा दंडक घातला.विशेष म्हणजे या परिवाराची स्थापना झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात महाराजांचे निधन झाले. गावातील चौकात त्यांची समाधी उभारण्यात आली. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी सीतामाता, बंधू रामदास महाराज आणि पुत्र शंकर महाराज यांनी या परिवाराचा विस्तार केला. रामदास महाराज यांचे पुत्र चंद्रसेन महाराज या परिवाराची सध्या धुरा सांभाळत आहेत. ८० वर्षांपूर्वीच्या शिकवणुकीत कुठेही फरक पडलेला नाही. आश्रम नाही, विश्वस्त संस्था नाही, मंदिर नाही, दुकाने नाही. महाराष्टÑ, गुजरात आणि मध्य प्रदेशात या परिवाराच्या कार्याचा विस्तार झाला आहे. वर्षातून चारवेळा सामुदायिक आरती समारंभ होतात. आता वेगवेगळ्या ठिकाणी समारंभ होऊ लागले आहेत. आदिवासी बांधवांमध्ये आत्मभान, जागृती आली आहे. शिक्षण, शेतीसह प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.

टॅग्स :Familyपरिवार