शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

फडणवीस सरकराच्या दिव्याखाली अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 5:20 AM

आभासी प्रतिमा आणि वस्तुस्थिती यांच्यात टोकाचे अंतर असते. सध्या राज्य सरकारच्या ‘लाभार्थी’च्या जाहिराती जोरात सुरू आहेत.

आभासी प्रतिमा आणि वस्तुस्थिती यांच्यात टोकाचे अंतर असते. सध्या राज्य सरकारच्या ‘लाभार्थी’च्या जाहिराती जोरात सुरू आहेत. प्रत्यक्षात कोणाला, किती लाभ झाला? हा कदाचित शोधाचा विषय ठरू शकेल. याबाबत पनवेलमधील आदिवासी पाड्याचे उदाहरण बोलके ठरेल. पनवेल महापालिकेच्या हद्दीत वाघºयाची आणि सागाची वाडी हे आदिवासी पाडे येतात. या प्रभागामधून भाजपाचा नगरसेवकही निवडून आला आहे, पण याच नगरसेवकाच्या घरात अद्याप विजेचा प्रकाश पोहोचलेला नाही. मुंबईपासून अवघ्या ५० किलोमीटरवर असलेल्या पनवेल परिसरात अत्याधुनिक विमानतळ उभारले जात आहे, तसेच सिडकोनेही प्रचंड मोठी वसाहत निर्माण केली आहे. मात्र, विकासाचा हा प्रवाह या आदिवासी पाड्यांपर्यंत अजून का पोहोचलेला नाही? इथे वर्षानुवर्षे निवडून येणाºया जिल्हा परिषद सदस्याने अथवा ग्रामपंचायत सदस्याने प्रशासनापर्यंत मूलभूत समस्या का मांडल्या नाहीत? किंवा त्याने मांडलेल्या समस्यांना कचºयाची टोपली दाखविली गेली का? हेही तपासायला हवे. पनवेल महापालिकेत निवडून आलेल्या भाजपा नगरसेवकांच्या वॉर्डाची, किंबहुना त्यांच्या राहत्या घराची जर ही अवस्था असेल, तर सामान्यांचे काय? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. या भाजपाची सत्ता असलेल्या पनवेल महापालिकेतील आदिवासी पाड्यात, तीन वर्षांमध्ये एकाही आदिवासीला कोणत्याच सरकारी योजनेचा लाभ मिळालेला नाही. सूर्य मावळला की, ‘गावात अंधार व घरात रॉकेलच्या दिव्याचा आधार’ अशी स्थिती आहे. भाजपा नगरसेवकाच्या आईला चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. एकीकडे केंद्र सरकारने ‘पंतप्रधान उज्ज्वला योजना’ सुरू केली आहे. ग्रामीण भागात चुलीला पर्याय म्हणून एलपीजी गॅस देण्याची घोषणा केली, पण अजून नगरसेवकाच्या घरातही तो पोहोचू शकलेला नाही. घरात वापराचे पाणी आणण्यासाठी दोन किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. गावामध्ये शाळा नाही. आरोग्याची सुविधा, शिधावाटप दुकान नाही, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी समाजमंदिरही नाही. नगरसेवकाच्या गावात व प्रभागात जाण्यासाठी कच्चा रस्ताही नाही. पायवाटेने पाच किलोमीटर डोंगर चढून जावे लागते. स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास सुरू असलेल्या पनवेलमधील सर्वच आदिवासी पाड्यांची स्थिती अशी बिकट आहे. हे मूलभूत प्रश्न सुटले, तरच देश खºया अर्थाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकेल. केवळ जाहिरातबाजी करून वस्तुस्थिती फार काळ लपविता येत नाही, हेच या घटनांवरून सिद्ध होते. त्यातून सरकार किती शिकणार, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस