शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

ओरिसाकडून निम्न खनिजांचा पुरेपूर उपयोग, २.५० लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 1:00 AM

अवघा ५६ लाख टन निम्न खनिजांचा साठा असलेल्या ओरिसाने त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करीत त्यातून उद्योग उभारणीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

मुंबई : अवघा ५६ लाख टन निम्न खनिजांचा साठा असलेल्या ओरिसाने त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करीत त्यातून उद्योग उभारणीचे प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्रात मात्र या खनिजांचा साठा तब्बल ८.७६ कोटी टन असतानादेखील हे क्षेत्र महसूलकडे दिल्याने त्यातून उद्योग व रोजगारनिर्मितीत अडथळा येतोय.ओरिसा सरकारने २०२५ पर्यंत २.५० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य निश्चित केले आहे. यासाठी मुंबईत उद्योजकांना भेटायला आलेले ओरिसाचे उद्योग प्रधान सचिव संजीव चोप्रा यांनी गुरुवारी निवडक पत्रकारांशी चर्चा केली. त्यावेळी निम्न खनिजांसंबंधी ‘लोकमत’ने प्रश्न विचारला. त्याच्या उत्तराने महाराष्टÑ आणि ओरिसा यांच्या धोरणातील तफावत दिसून आली.केंद्र सरकारने २०१५ मध्ये सर्व निम्न खनिजे राज्याकडे हस्तांतरित केली. त्यानंतर महाराष्टÑाने ही खनिजे महसूल विभागाकडे हस्तांतरित केल्याने अद्याप त्यातून उद्योग असे तयार झालेलेच नाहीत.यासंबंधी संजीव चोप्रा यांनी सांगितले की, ओरिसा सरकारने या खनिजांसाठी पोलाद व खनिजे या विशेष मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्याअंतर्गत आता या खनिज क्षेत्रांची लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यावर लवकरच उद्योग उभे होतील.२.०२ लाख कोटी रुपयांचे उद्योगओरिसा हा पूर्व महाराष्टÑासारखाच (विदर्भ) खनिजांनी समृद्ध प्रदेश आहे. यामुळेच मागील वर्षात तेथे खनिजे, धातू व ऊर्जा क्षेत्रावर आधारित २.०२ लाख कोटी रुपयांचे उद्योग आले. ओरिसा सरकार मात्र स्वत:ला खनिज उद्योगांपुरते मर्यादित न ठेवता वस्रोद्योग, फार्मा, आॅटो यासारख्या अन्य क्षेत्रांत समोर आणू पाहत आहे. त्यासाठीच आर्थिक विकास कॉरिडॉर, विशेष औद्योगिक क्षेत्रे उभी केली जात असल्याचे चोप्रा यांनी सांगितले.१४ सामंजस्य करारआजवर केवळ चक्रीवादळामुळे चर्चेत असलेल्या ओरिसाने आता उद्योग क्षेत्रात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच ‘मेक इन इंडिया’अंतर्गत ७१ हजार कोटी रुपयांचे १४ सामंजस्य करार झाले. त्यातील नऊ कंपन्यांची कामे सुरू झाली आहेत, असे चोप्रा म्हणाले.

टॅग्स :Indiaभारत