शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

मुलांसोबत शाळा आणि शिक्षकांचीही अध्ययन क्षमता तपासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 05:08 IST

शाळेतील अध्ययन निष्पत्तीची पातळी कमी असल्यामुळे भारताची मनुष्यबळ क्षमता खाली येत आहे.

आशिष धवन, अध्यक्ष, सेंट्रल स्क्वेअर फाउंडेशनदर्जेदार शिक्षण आणि अध्ययनामुळे व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षांना चालना मिळते आणि त्या महत्त्वाकांक्षा वास्तवात उतरविण्यासाठीच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या आयुष्यात परिवर्तन घडून येते. हे सर्व लक्षात घेत भारत या जगातील सर्वात तरुण देशात, जिथे ६-१४ या वयोगटातील २६ कोटी विद्यार्थी आहेत, तिथे शिक्षण आणि अध्ययनाचे महत्त्व खूपच आहे. शाळेतील अध्ययन निष्पत्तीची पातळी कमी असल्यामुळे भारताची मनुष्यबळ क्षमता खाली येत आहे. 

विद्यार्थी अध्ययन निष्पत्तीसंदर्भात झालेल्या संशोधनातून दिसून आले आहे की, भारतातील ६-८ वयोगटातील दर २ पैकी १ मूल शाळेत जात आहे, पण त्याचे शिक्षण होत नाही. ही आकडेवारी चिंता अधिक वाढविणारी आहे. कारण अर्थ समजून घेऊन वाचन करण्याची मूलभूत क्षमता नसल्यामुळे शाळेतील उपस्थिती आणि अध्ययन यातील दरी प्रचंड आहे. एक प्रभावी व्यक्ती म्हणून घडण्यासाठी हे अत्यंत मूलभूत कौशल्य आहे. अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट २0१६ या अहवालानुसार तिसरीतील केवळ एक चतुर्थांश विद्यार्थी लघुकथा वाचू आणि समजू शकतात आणि त्यांना काही सोपी वाक्ये रचता येतात किंवा दोन अंकी संख्यांची वजाबाकी करता येते. ही अतिशय गंभीर बाब आहे, हे नक्कीच.
भारत सरकारच्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेनुसारसुद्धा (एनएएस) अर्थबोध न होता वाचता येणाऱ्या मुलांचे प्रमाण खूप असल्याचे दिसून आले आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर मुलाने चालायला शिकण्याआधीच धावण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वप्रथम मूलभूत अध्ययनाच्या बाबतीत आपल्याकडे स्पष्ट आणि मोजता येण्यासारखे लक्ष्य असणे आणि ते साध्य करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. निर्णयकर्ते, शिक्षक, शाळा व्यवस्थापक, प्रशासन आणि शिक्षणक्षेत्रात काम करणाºया संस्थांना या मुद्द्यावर प्राधान्याने काम करण्याबद्दल जाणीव झाली तरच आपल्याला लक्षणीय बदल दिसून येऊ शकेल. या दिशेने वाटचाल करतानाचे पुढचे पाऊल म्हणेज मुले इयत्ता तिसरीपर्यंत अर्थबोधासह वाचन करण्यास शिकतील यावर आपले लक्ष केंद्रित करणे आणि मोजता येण्यासारखे लक्ष्य ठेवणे. उदा. मुळाक्षरे व शब्दांची ओळख किंवा अचूक तोंडी वाचन करता येणे.
दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देता यावे यासाठी आवश्यक इनपुट्स आणि प्रशिक्षण शाळा आणि शिक्षकांना मिळत असल्याची खातरजमा करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आम्हाला वाटते की, शैक्षणिक उपाययोजनेत वर्गातील भिन्न अध्ययन पातळ्यांसाठी योग्य ठरणारे सर्वसमावेशक प्रशिक्षण प्रारूप समाविष्ट करण्यात यावे. त्याचप्रमाणे अध्ययन - अध्यापन साहित्य हे विद्यार्थ्याच्या पातळीनुसार असावे, बाल साहित्याचा समावेश असावा आणि मुलांना निश्चित प्रकारची अध्ययन मदत उपलब्ध करून देणाºया नियमित चाचण्या घेण्यात याव्या.
या सर्व उपायोजनांसोबतच सुरुवातीच्या इयत्तांमधील मुलांना कसे शिकवावे आणि त्यासाठी शैक्षणिक साहित्याचा वापर कसा करावा याचे परिणामकारक प्रशिक्षण शिक्षकांना देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांना नियमितपणे प्रशिक्षण व आवश्यकतेनुसार मार्गदर्शनाची जोड देणे आवश्यक आहे. वर्गाबाहेरही, यासंदर्भात मागे राहिलेल्या शाळा, जिल्हे व राज्ये यांना कशा प्रकारे मदत करता येईल याबाबतीत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉलची गरज आहे.
आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे वळू या. शाळा, जिल्हा आणि राज्य पातळीवरील आपल्या कामगिरीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आपल्या ध्येयसिद्धीच्या दृष्टिकोनातून आपण कितपत हेतू साध्य केले आहेत हे जाणून घेऊन त्यानुसार पुढील कृती करणे आवश्यक ठरते. प्रत्येक जिल्ह्यामधील गरजू शाळांची नोंद होणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना प्रशिक्षण, अध्यापन किंवा साहित्यासंदर्भातील अधिक स्रोत उपलब्ध करून देता येतील.भारतातील स्रोत लक्षात घेता पुढील पाच वर्षांत मूलभूत अध्ययन पातळी सर्वांपर्यंत पोहोचविणे शक्य आहे, ही सकारात्मक बाब आहे. राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती, योग्य कृती आराखडा आणि सातत्य आणि शिक्षक व पालकांकडून सक्रिय सहकार्य असेल तर मुलांच्या शिक्षणाची खातरजमा आपण निश्चितच करू शकतो.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षकEducationशिक्षण