शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
5
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
6
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
7
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
8
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
9
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
10
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
11
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
12
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
13
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
14
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
15
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
16
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
17
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
18
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
19
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सगळेच मिंधे, कसले आॅडिट करता?

By अतुल कुलकर्णी | Updated: October 2, 2017 01:34 IST

दादरच्या रेल्वे पुलावर दोन्ही बाजूने फेरीवाल्यांनी दुकाने थाटलेली. पायी जाणारे जीव मुठीत घेऊन चालायचे. ही बाब तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली ते तेथून रोज ये जा करणाºया पादचा-यांनी. आर.आर. स्वत: एकदा त्या पुलावर गेले. सगळे फेरीवाले उठवले गेले. पुन्हा येथे फेरीवाले दिसले तर तुमची नोकरी जाईल असा ...

दादरच्या रेल्वे पुलावर दोन्ही बाजूने फेरीवाल्यांनी दुकाने थाटलेली. पायी जाणारे जीव मुठीत घेऊन चालायचे. ही बाब तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली ते तेथून रोज ये जा करणाºया पादचा-यांनी. आर.आर. स्वत: एकदा त्या पुलावर गेले. सगळे फेरीवाले उठवले गेले. पुन्हा येथे फेरीवाले दिसले तर तुमची नोकरी जाईल असा दम त्यांनी तिथल्या पोलीस अधिका-यांना दिला. त्यानंतर काही महिने तो पूल फेरीवाल्यांसाठी बंद राहिला. मात्र आर. आर. गेले तसे फेरीवाले पुन्हा आले. आजही दादरच नाही तर मुंबईतल्या सगळ्या रेल्वे पुलांवर फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. रेल्वेचे अधिकारी ते पोलीस सगळ्यांना हे फेरीवाले हप्ते देतात. त्यामुळे त्यांना उठवण्याची हिंमत कोणातही नाही.खुलेआम स्टेशनवर गॅस सिलेंडर लावून बटाटेवडे तळण्यापासून खायचे पदार्थ केले जातात. त्यांना कोणी जाब विचारत नाही. रेल्वे ट्रॅकच्या दुतर्फा असणाºया झोपड्या स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदारांसाठी मतपेट्यांचे अड्डे आहेत. रेल्वेच्या जागेत ठिकठिकाणी नाल्याच्या पाण्यावर पालेभाजी पिकवली जाते. ती राजरोस विकली जाते. त्यावर आजपर्यंत कधी कारवाईची हिंमत अधिका-यांंनी दाखवलेली नाही. कारण हेच अधिकारी अशा लोकांकडून वरकमाई काढून घेतात. रेल्वेचे प्रश्न अधिकाºयांना माहिती नाहीत असे नाही. सगळ्यांना सगळे माहिती आहे, हिंमत मात्र कोणाकडेही नाही कारण सगळे मिंधे झालेले आहेत.गोयल यांनी अनेक वर्षे मुंबईत लोकलने प्रवास केलाय. त्यांना सगळे विषय माहिती आहेत. त्यांनी जर या सगळ्या विषयात कारवाईची हिंमत दाखवली तर आज संतप्त झालेले मुंबईकर त्यांना डोक्यावर घेऊन फिरतील. या रेल्वे अपघाताने शुक्रवारी २२ बळी घेतले. गेल्या आठ महिन्यात मुंबई रेल्वेने दोन हजार बळी घेतले आहेत. हजारो कोटींचे उत्पन्न मुंबई लोकलमधून मिळवणारे केंद्र सरकार मुंबईच्या हाती मात्र कटोरा देत आले हे पुन्हा एकदा लख्खपणे समोर आले. मात्र या सगळ्यात अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची पुरती लाज निघाली. ही जमात किती निर्ढावलेली आहे हे या अपघाताने अधोरेखित केले. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५ साली अपघातग्रस्त एलफिन्स्टन पुलाच्या दुरुस्तीचे काम मंजूर केले होते. मग त्याचे टेंडर २०१७ संपत आले तरी का निघाले नाही? कोण अधिकारी त्याला जबाबदार होता याचा जाब कोणी विचारायचा? त्या अधिकाºयांना शिक्षा कोणी करायची? सगळे एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे होतात. ज्यांच्या अक्षम्य चुकीमुळे हे रेंगाळले त्याचे नाव आणि कारण जनतेला कळलेच पाहिजे.मुंबईत येणा-या रेल्वेच्या अधिका-यांना या शहराविषयी, इथल्या प्रश्नांविषयी आस्था नाही, ते कधी लोकलने प्रवास करत नाहीत. रेल्वेचे अनेक कर्मचारी, अधिकारी रात्री मुंबईहून सुटणा-या एक्स्प्रेसच्या एसी डब्यात तिकीट काढलेल्या प्रवाशांच्या जागेवर बसून ठाणे, कल्याणपर्यंत फुकटात प्रवास करतात. त्यांना लोकलचे दु:ख कधी कळावे? गोयल यांनी सात दिवसात आॅडिट करण्याची घोषणा केली आहे पण आधी या मानसिकतेचे आॅडिट करा, अधिकाºयांच्या जबाबदा-या निश्चित करा. तरच रोज रेल्वे अपघातात हकनाक बळी जाणे थांबेल. नाहीतर एकदिवस या संतापाचा उद्रेक होईल तो थांबवणे अशक्य असेल...!