शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

सगळेच मिंधे, कसले आॅडिट करता?

By अतुल कुलकर्णी | Updated: October 2, 2017 01:34 IST

दादरच्या रेल्वे पुलावर दोन्ही बाजूने फेरीवाल्यांनी दुकाने थाटलेली. पायी जाणारे जीव मुठीत घेऊन चालायचे. ही बाब तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली ते तेथून रोज ये जा करणाºया पादचा-यांनी. आर.आर. स्वत: एकदा त्या पुलावर गेले. सगळे फेरीवाले उठवले गेले. पुन्हा येथे फेरीवाले दिसले तर तुमची नोकरी जाईल असा ...

दादरच्या रेल्वे पुलावर दोन्ही बाजूने फेरीवाल्यांनी दुकाने थाटलेली. पायी जाणारे जीव मुठीत घेऊन चालायचे. ही बाब तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली ते तेथून रोज ये जा करणाºया पादचा-यांनी. आर.आर. स्वत: एकदा त्या पुलावर गेले. सगळे फेरीवाले उठवले गेले. पुन्हा येथे फेरीवाले दिसले तर तुमची नोकरी जाईल असा दम त्यांनी तिथल्या पोलीस अधिका-यांना दिला. त्यानंतर काही महिने तो पूल फेरीवाल्यांसाठी बंद राहिला. मात्र आर. आर. गेले तसे फेरीवाले पुन्हा आले. आजही दादरच नाही तर मुंबईतल्या सगळ्या रेल्वे पुलांवर फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. रेल्वेचे अधिकारी ते पोलीस सगळ्यांना हे फेरीवाले हप्ते देतात. त्यामुळे त्यांना उठवण्याची हिंमत कोणातही नाही.खुलेआम स्टेशनवर गॅस सिलेंडर लावून बटाटेवडे तळण्यापासून खायचे पदार्थ केले जातात. त्यांना कोणी जाब विचारत नाही. रेल्वे ट्रॅकच्या दुतर्फा असणाºया झोपड्या स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदारांसाठी मतपेट्यांचे अड्डे आहेत. रेल्वेच्या जागेत ठिकठिकाणी नाल्याच्या पाण्यावर पालेभाजी पिकवली जाते. ती राजरोस विकली जाते. त्यावर आजपर्यंत कधी कारवाईची हिंमत अधिका-यांंनी दाखवलेली नाही. कारण हेच अधिकारी अशा लोकांकडून वरकमाई काढून घेतात. रेल्वेचे प्रश्न अधिकाºयांना माहिती नाहीत असे नाही. सगळ्यांना सगळे माहिती आहे, हिंमत मात्र कोणाकडेही नाही कारण सगळे मिंधे झालेले आहेत.गोयल यांनी अनेक वर्षे मुंबईत लोकलने प्रवास केलाय. त्यांना सगळे विषय माहिती आहेत. त्यांनी जर या सगळ्या विषयात कारवाईची हिंमत दाखवली तर आज संतप्त झालेले मुंबईकर त्यांना डोक्यावर घेऊन फिरतील. या रेल्वे अपघाताने शुक्रवारी २२ बळी घेतले. गेल्या आठ महिन्यात मुंबई रेल्वेने दोन हजार बळी घेतले आहेत. हजारो कोटींचे उत्पन्न मुंबई लोकलमधून मिळवणारे केंद्र सरकार मुंबईच्या हाती मात्र कटोरा देत आले हे पुन्हा एकदा लख्खपणे समोर आले. मात्र या सगळ्यात अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची पुरती लाज निघाली. ही जमात किती निर्ढावलेली आहे हे या अपघाताने अधोरेखित केले. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५ साली अपघातग्रस्त एलफिन्स्टन पुलाच्या दुरुस्तीचे काम मंजूर केले होते. मग त्याचे टेंडर २०१७ संपत आले तरी का निघाले नाही? कोण अधिकारी त्याला जबाबदार होता याचा जाब कोणी विचारायचा? त्या अधिकाºयांना शिक्षा कोणी करायची? सगळे एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे होतात. ज्यांच्या अक्षम्य चुकीमुळे हे रेंगाळले त्याचे नाव आणि कारण जनतेला कळलेच पाहिजे.मुंबईत येणा-या रेल्वेच्या अधिका-यांना या शहराविषयी, इथल्या प्रश्नांविषयी आस्था नाही, ते कधी लोकलने प्रवास करत नाहीत. रेल्वेचे अनेक कर्मचारी, अधिकारी रात्री मुंबईहून सुटणा-या एक्स्प्रेसच्या एसी डब्यात तिकीट काढलेल्या प्रवाशांच्या जागेवर बसून ठाणे, कल्याणपर्यंत फुकटात प्रवास करतात. त्यांना लोकलचे दु:ख कधी कळावे? गोयल यांनी सात दिवसात आॅडिट करण्याची घोषणा केली आहे पण आधी या मानसिकतेचे आॅडिट करा, अधिकाºयांच्या जबाबदा-या निश्चित करा. तरच रोज रेल्वे अपघातात हकनाक बळी जाणे थांबेल. नाहीतर एकदिवस या संतापाचा उद्रेक होईल तो थांबवणे अशक्य असेल...!