शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

गुलामीतून बाहेर पडण्यासाठी इंग्रजीपासून सुटका आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 11:46 IST

महाराणी एलिझाबेथ, किंग चार्ल्स, ब्रिटन-भारत संबंध याविषयी माजी केंद्रीय मंत्री नटवर सिंह यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांची बातचीत.

राणी एलिझाबेथ यांचे भारताशी कसे संबंध होते? सन १९६१, ८३ आणि ९७ अशा तीन वेळा महाराणी भारत दौऱ्यावर आल्या. १९८३  मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मला राष्ट्रकुल देशांच्या संमेलनाचे मुख्य समन्वयक म्हणून नेमले होते. संमेलनाचे उद्घाटन महाराणींच्या हस्ते झाले. यावेळी मी सतत त्यांच्याबरोबर होतो.

संस्मरणीय अशी काही घटना त्यावेळी घडली का? मदर तेरेसा यांना राष्ट्रपती भवनात एक इन्व्हेस्टीचर समारंभ आयोजित करून ब्रिटनचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ द्यावा, अशी महाराणींची इच्छा होती. हेमवतीनंदन बहुगुणा यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहून याला विरोध दर्शवला. त्यांचे म्हणणे असे होते की, हा समारंभ केवळ राष्ट्रपतीच आयोजित करू शकतात. इंदिरा गांधी यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून माझ्यावर जबाबदारी टाकली. मी महाराणींना सांगितले की, हा समारंभ राष्ट्रपती भवनात आयोजित होऊ शकत नाही. त्या म्हणाल्या, सगळी निमंत्रणे तर गेली आहेत. माध्यमांना कळविण्यात आले आहे. आता हे थांबवता येणार नाही. मी इंदिराजींच्या कानांवर ही गोष्ट घातली. त्यांच्या वतीने महाराणी यांना मी पुन्हा एकदा म्हणालो, ‘आपला कार्यक्रम तर होऊन जाईल; परंतु विरोधी पक्ष याविषयी भारतीय संसदेत चर्चा उपस्थित करील.’ त्यांच्याही हे लक्षात आले. कार्यक्रम रद्द झाला.आणि प्रिन्स चार्ल्स? तेही पाच-सहा वेळा भारतात आले. त्यांचा पहिला दौरा १९७५  मध्ये झाला. त्यावेळी त्यांचे काका आणि भारताचे शेवटचे व्हाॅइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन त्यांच्याबरोबर होते. त्यावेळी अनेक कार्यक्रमांत ते सहभागी झाले. पत्रकार परिषदा झाल्या. ते पोलोचा सामनाही खेळले; परंतु ते लॉर्ड माउंटबॅटन यांच्या सततच्या टोकण्यामुळे त्रस्त झाले होते. कधी कपड्यांवरून, तर कधी दुसऱ्या कुठल्या कारणावरून माउंटबॅटन हे त्यांना सारखे बोलत होते. परत जाताना मी त्यांना पुन्हा भारतातभेटीचे निमंत्रण दिले तेव्हा प्रिन्स चार्ल्स हळूच म्हटले, ‘मी नक्की येईन; पण या माउंटबॅटन यांना बरोबर आणणार नाही.’ मी हसून म्हणालो, ‘सर, तो आपला निर्णय असेल.’

राजे म्हणून चार्ल्स यांच्यासमोर कोणती आव्हाने असतील? ब्रिटनकडे सध्या फारसे पैसे नसतील; परंतु तरीही जागतिक राजकारणात त्यांचे एक महत्त्वाचे स्थान आहे. राष्ट्रकुलात ५४  देश आहेत. चार्ल्स यांना सर्व राष्ट्राध्यक्षांशी बोलून संवाद कायम ठेवावा लागेल. त्याचबरोबर युरोपमधल्या राष्ट्राध्यक्षांनाही भेटावे लागेल. अमेरिकेशी संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

ब्रिटनचे राजे हे नाममात्र राष्ट्राध्यक्ष नाहीत काय? कोणतेही राष्ट्राध्यक्ष ब्रिटनमध्ये आल्यावर राजांना भेटतात. त्याची तयारी करावीच लागते. येणारे पाहुणे काय सांगतील? त्यांना काय उत्तर द्यायचे, हे ठरवावे लागते. स्वतः ब्रिटनमध्ये किंवा बाहेर दौऱ्यावर जाण्याची तयारी करावी लागते. देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून रोज बऱ्याच कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागते.

रस्त्यांची नावे बदलली जात आहेत. गुलामीची मानसिकता दूर करण्यासाठी याचा उपयोग होईल?इंग्रजांपासून सुटका पाहिजे असेल तर सर्वप्रथम इंग्रजीपासून सुटका मिळवली पाहिजे. जोवर आपण सगळे कामकाज इंग्रजीतून करत आहोत, तोवर गुलामीच्या मानसिकतेपासून आपल्याला सुटका कशी मिळेल? चीन, फ्रान्स, जर्मनी, स्पेन असे अनेक देश आपापल्या भाषांत काम करतात. मग भारतामध्ये इंग्रजीला सर्वोच्च दर्जा का दिला जातो? राष्ट्रपती भवनातून तर ब्रिटिश व्हाॅइसरॉय भारतावर राज्य करत होते. आधी ‘किंग्स वे’ नाव असल्यामुळे राजपथाचे नाव बदलले गेले. तर्कसंगतीनुसार आता जनपथाचा नंबर लागतो; कारण त्या रस्त्याचे नाव आधी ‘क्वीन्स वे’ होते.