शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

भारतासारख्या अतिविशाल व औद्योगिक क्षेत्रात आटलेले रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:40 AM

भारतासारख्या अतिविशाल व औद्योगिक क्षेत्रात मागास देशात लहान उद्योग हीच रोजगारनिर्मितीची प्रमुख केंद्रे आहेत.

भारतासारख्या अतिविशाल व औद्योगिक क्षेत्रात मागास देशात लहान उद्योग हीच रोजगारनिर्मितीची प्रमुख केंद्रे आहेत. त्यालाच फटका बसला. भारतात बेरोजगारीचे दुखणे बरेच मुरलेले आहे.शेती व पाण्याइतकीच देशासमोरील सर्वांत गंभीर समस्या म्हणजे रोजगार. हाताला काम मिळाले की, फक्त जगणे सुसह्य होत नाही, तर कुटुंबात, समाजात स्थान मिळून आत्मविश्वास वाढतो. कौशल्यपूर्ण रोजगार प्रतिष्ठा मिळवून देतो. यामुळे रोजगारांची संख्या, स्वरूप, वेतन या बाबी महत्त्वाच्या ठरतात. रोजगाराच्या या सर्व आघाड्यांवर भारताची पीछेहाट सुरू आहे. भारतात बेरोजगारी प्रचंड नाही. सरकारी आकडेवारीनुसार ती पाच टक्के आहे, परंतु सीएमआयई ही संस्था दर आठवड्याला रोजगाराचे सर्वेक्षण करते. तिची आकडेवारी अधिक विश्वासार्ह मानली जाते. बेरोजगारीचा सीएमआयईचा अलीकडील आकडा ७.४ टक्के आहे. काळजीचा भाग म्हणजे, दर महिन्याला हा आकडा फुगत चालला आहे. वर्षभरात सुमारे एक कोटी ३० लाख रोजगार कमी झाले. ग्रामीण भागात सुमारे ९० लाख रोजगार कमी झाले, तर शहरी भागात १० लाख. ४० ते ५९ हा वयोगट वगळता अन्य सर्व वयोगटांतील रोजगार कमी झाले. बेरोजगार होण्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे, तर पुरुषांमध्ये अशिक्षितांचे. सुशिक्षित, शहरी लोकांना बेरोजगारीची झळ तुलनेने कमी बसली आहे. शेतीवर काम करणारे पुरुष, लहानसहान व्यवसायांत किंवा दुकानांत काम करणारे पुरुष यांना बेरोजगारीचा फटका सर्वांत अधिक बसला आहे. पगारदार वर्गातही ३० लाख रोजगार कमी झाले. आयटी क्षेत्रही गेली दोन दशके मध्यमवर्गासाठी पर्वणी होती. आता तेथील रोजगार वेगाने कमी होत आहेत. आयटी कंपन्यांचा नफाही घटला आहे. सहज नोकरी मिळेल, अशी स्थिती आता उच्च शिक्षितांसाठीही राहिलेली नाही. सेवाक्षेत्रात रोजगार असले, तरी तेथील पगार कमी होत आहेत. चांगले व स्थिर वेतन मिळण्याची शाश्वती अनेक ठिकाणी राहिलेली नाही. ही स्थिती जगातील अनेक देशांत आहे. चीनमधील बेरोजगारीचे प्रमाणही सात टक्क्यांवर गेले आहे. फॉक्सकॉनसारख्या विशाल उत्पादन केंद्रातील अनेक युनिटमध्ये टाळेबंदी झाली आहे. तंत्रज्ञानातील बदल आणि जगातील मंदावलेले अर्थव्यवहार, यामुळे अनेक देशांमध्ये रोजगारवाढ मंदावली. नोटाबंदी व जीएसटीमुळे भारतात त्याची तीव्रता वाढली. यामुळेच भारतात रोजगारवाढीसाठी अधिक जोमाने प्रयत्न होणे आवश्यक होते. मोदी सरकार त्यामध्ये कमी पडले, असे खेदाने म्हणावे लागते. खासगी गुंतवणुकीला उत्तेजन देण्यात मोदी सरकारला अपयश आले. त्याचबरोबर, लहान व मध्यम उद्योगांत अधिक गुंतवणूक कशी होईल, याकडे मोदी सरकारने लक्षपूर्वक पाहिले नाही. खासगी गुंतवणुकीत २०१३ पासूनच मरगळ येऊ लागली होती. ती घालविण्याला प्राधान्य देणे गरजेचे होते. भारतासारख्या अतिविशाल व औद्योगिक क्षेत्रात मागासलेल्या देशात लहान उद्योग हीच रोजगारनिर्मितीची प्रमुख केंद्रे आहेत. सुशिक्षितांबरोबर अल्पशिक्षितांनाही तेथे रोजगार मिळतो. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला लहान उद्योग अधिक चालना देतात. या उद्योगांसमोरच्या अडचणी दूर करून, प्रशासनाच्या जंजाळातून त्यांना बाहेर काढले असते, तर भारतात रोजगाराच्या संधी अनेक पटींनी वाढल्या असत्या. आर्थिक क्षेत्राचे शुद्धिकरण करण्याच्या नादात लहान उद्योगांतील गुंतवणुकीकडे लक्ष दिले गेले नाही. ओस पडत चाललेल्या औद्योगिक वसाहतीतून हे दिसते. काही दशकांच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढली आहे हे खरे असले, तरी मोदी सरकारने काय केले, हा प्रश्न उरतोच. बेरोजगारीचे संकट दिसताच, चीनमध्ये रोजगार कायम ठेवणाऱ्या कंपन्यांना जादा करसवलती मिळू लागल्या. कामगारांसाठी कंपन्यांनी मोठी खरेदी केल्यास सवलती दिल्या गेल्या. यामुळे अनेक कंपन्यांतील रोजगार टिकून राहिले आहेत़ याशिवाय सरकारने पोलिसांसह अन्य विभागांत मोठ्या प्रमाणात नोकरभरती सुरू केली. याउलट, सरकारमध्ये रोजगार आहेच कुठे, असे आपले मंत्री सांगत सतत आहेत. मध्यम उद्योगांना व्यवसाय करणे सुलभ होईल, अशी प्रशासकीय रचना करणे व कामगार कायद्यात सुधारणा करणे या मुख्य बाबींवर मोदी सरकारच्या काळात फारसे काम झाले नाही. शेतीचे उत्पन्न वाढले, पण अन्य उद्योग वाढले नाहीत. त्यामुळे शेतीवर अवलंबून असणाºयांची संख्या कमी झाली नाही. आता या दोन्ही क्षेत्रांत बेरोजगारीचा फटका बसत आहे. रोजगार वाढविणाºया लहान व मध्यम उद्योगांमध्ये गुंतवणुकीचे चक्र गतिमान करणे, हा मुख्य उपाय बेरोजगारी रोखण्यासाठी आहे. त्यासाठी काही धाडसी निर्णय विद्यमान किंवा आगामी सरकारला घ्यावे लागतील़