शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक धोरण 2020 - अकारण घाई नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 02:21 IST

केंद्र शासनाने धोरण ठरवावे, शिफारशी कराव्यात, निधी द्यावा आणि राज्यांनी त्यांच्या पद्धतीने याची अंमलबजावणी करावी, असे अपेक्षित आहे.

प्राचार्य हर्षवर्धन कडेपूरकर

नव्या शैक्षणिक धोरणातील ३ ते १८ वयोगटांतील मुलांसाठी सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याचा निर्धार, जीडीपीच्या सहा टक्क्यांपर्यंत शिक्षणावर खर्च करण्याची घोषणा, उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांतील लवचिकता या प्रमुख मुद्द्यांबाबत अधिक विचारमंथन व्हायला हवे. शिक्षण प्रक्रियेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असलेल्या सर्व जणांनी या विचारमंथनाबरोबरच धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये आपली भूमिका काय आहे, हेही समजून घेणे आवश्यक आहे.राज्यघटनेतील तरतुदींनुसार ‘शिक्षण’ हा केंद्रआणि राज्य सरकारांचा सामाईक विषय आहे.

केंद्र शासनाने धोरण ठरवावे, शिफारशी कराव्यात, निधी द्यावा आणि राज्यांनी त्यांच्या पद्धतीने याची अंमलबजावणी करावी, असे अपेक्षित आहे. राज्यातील शिक्षण संस्था, शिक्षक संघटना, पालक संघटना, विद्यार्थी संघटना, शासकीय अधिकारी व इतर संबंधितांना विश्वासात घेऊन याबाबतचे निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाला पुढाकार घ्यावा लागेल. स्वागतार्ह बदल अमलात आणावेत, गैरसोयीच्या बदलांबाबत केंद्राशी चर्चा करावी, राज्याची अस्मिता सांभाळून या धोरणाच्या परिणामकारक अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा.या धोरणाने शिक्षण क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी केली आहेत. अकरावी, तसेच बारावीचे वर्ग शाळांना जोडण्याचा निर्णय अमलात आणताना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल. सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, वाचनालये, क्रीडांगणे, आदी सर्व साधनसुविधा आज बहुतांश शाळांमध्ये नाहीत. राज्यातील बहुतांश शासकीय आणि अनुदानित शाळांच्या इमारतींची अवस्था दयनीय आहे. वेतनेतर अनुदानाचे प्रश्न निकाली निघालेले नाहीत. शासकीय बंधनांमुळे मुलांकडून यासाठी वेगळे शुल्कहीघेता येत नाही. यासाठी लागणारा निधी सरकार देऊ शकेल, अशी परिस्थिती नाही.शिक्षणावर जीडीपीच्या सहा टक्के खर्च करण्याची तरतूद नमूद आहे. आज प्रत्यक्षात दोन ते तीनटक्के एवढीच तरतूद आहे. उद्योगजगताकडून सीएसआरच्या माध्यमातून निधी मिळण्याची शक्यता नाही. कारण कोरोनामुळे त्यांचेच आर्थिक गणित फसलेले आहे. मगहा निधी येणार कोठून आणि साधन सुविधांनी शाळा सज्ज होणारकशा? याउलट अकरावी आणि बारावीचे वर्ग शाळांकडे जाणार असल्यामुळे यासाठी उभ्या केलेल्या साधनसामग्रीचे आता काय करायचेहा प्रश्न बहुतांश वरिष्ठ महाविद्यालयांना पडणार आहे.थोडक्यात, नवीन धोरणामधील प्रमुख मुद्द्यांवर केंद्र आणि राज्य सरकारांचे विचारमंथन व यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद होईपर्यंत नवीन धोरणाची अंमलबजावणी घाईने करू नये.

शिक्षणतज्ज्ञ, नाशिक.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण