शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

Education: आपल्या मुलांची ओझं वाहण्याची क्षमता दुप्पट झाली की काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 06:31 IST

Education: मुलांना दप्तराचं ओझं नको म्हणताना, आता पुस्तकाचं वजनच दुप्पट होणार आहे. कारण काय? - तर सरकार आता पुस्तकात कोरी पानं घालायला निघालं आहे!

- गीता महाशब्दे(शिक्षण क्षेत्रातल्या कार्यकर्त्या)पाठ्यपुस्तकात कोरी पाने घालण्याच्या नव्या शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेवर उलटसुलट चर्चा सुरू आहे. आजवर एकातरी विद्यार्थ्याने, पालकाने, शिक्षकाने, शिक्षणतज्ज्ञाने अशी मागणी केली? महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि बालभारती या राज्यातील  महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था; त्यांच्यापैकी कोणी अशी मागणी केली? एन.सी.इ.आर.टी. या केंद्र पातळीवरील संस्थेने असं काही कधी सुचवलं? - असं काहीही दिसत नाही.  कोणताही शास्त्रीय किंवा शैक्षणिक आधार नसलेला हा निर्णय नव्या सरकारने तातडीने घेतलेला आहे. प्रत्येक छापील पानानंतर एक कोरं पान घालणार असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सूचित केलेलं आहे. म्हणजे पाठ्यपुस्तकांची पृष्ठसंख्या दुप्पट होणार, पुस्तकाची किंमत वाढणार. समग्र शिक्षा अभियानाकडून येणाऱ्या निधीतून शासकीय व अनुदानित शाळांमधील मुलांना पाठ्यपुस्तकं मोफत दिली जातात. त्यासाठीची जास्तीची आर्थिक तरतूद केली आहे का? - हे माहिती नाही.पालकांवरचा आर्थिक बोजा वाढणारच!हा निर्णय जाहीर केल्यानंतर शिक्षकांकडून मतं मागवली गेली. खरंतर संबंधितांची मतं  निर्णय घेण्याच्या आधी  मागवली पाहिजेत. तसंच, ‘निर्णय चांगला आहे, चुकीचा आहे, अनावश्यक आहे, घातक आहे,’ असे पर्यायही द्यावेत. ‘या निर्णयाला तुमचा पाठिंबा आहे का?,’ असा प्रश्न गूगल फॉर्ममध्ये विचारण्याचं धारिष्ट्यदेखील फॉर्मकर्त्यांनी दाखवावं.काही ठळक मुद्दे :मुलांना दप्तराचं ओझं नको, असं कारण सांगून याचवर्षी पहिलीच्या पाठ्यपुस्तकाचे चार भाग करण्यात आले. हाही अनावश्यक निर्णय. आता अचानक पुस्तकाचं वजनच दुप्पट होणार आहे. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकाची  पृष्ठसंख्या आधी ठरलेली असते. कारण आर्थिक मर्यादा! पाठ्यपुस्तक लेखकांना अनेक महत्त्वाच्या गोष्टी पाठ्यपुस्तकात द्यायची इच्छा असतानाही जागेअभावी त्या गाळाव्या लागतात.  ही पानांची मर्यादा शिथिल होणार असेल, तर कोरी पानं न देता त्या-त्या विषयासाठीच्या अधिक सखोल बाबी त्यात द्याव्यात. ‘शिक्षक शिकवताना मुलांनी नोंदी घ्याव्यात किंवा शिक्षकांनी नोटस् द्याव्यात,’ अशी अपेक्षा शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. ज्ञानरचनावादी पद्धतीनुसार मुलांनी स्वतःच्या मनाने लिखाण करणं अपेक्षित आहे. सर्व विषयांच्या पुस्तकांमध्ये स्वाध्याय व उपक्रम दिलेले आहेत. त्याबद्दल लिहायला प्रत्येक मुलाला लागणारी जागा कमी-जास्त असणार. पुस्तकातलं कोरं पान ही लिखाणाची कमाल मर्यादा ठरण्याची आणि त्यामुळे मुलांच्या सर्जनशीलतेला मारक ठरण्याची शक्यता आहे.पुस्तक शिकवून संपलं, पानं कोरीच राहिली किंवा पानं संपली आणि पुस्तक शिकवणं चालूच आहे, असंही होणारच! नेम धरून तितकंच कसं काय लिहितील मुलं? पाठ्यपुस्तकात कोरे कागद घालण्याऐवजी मुलांना चित्र काढण्यासाठी कोरे कागद, गणितासाठी चौकटीच्या वह्या आणि इतर विषयांसाठी रेघी वह्या द्याव्यात. शैक्षणिकदृष्ट्या निरूपयोगी असा हा निर्णय बालभारतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर लादला जात आहे की काय? अशी शंका येण्यास जागा आहे. तसं असेल तर त्याबद्दल प्रश्न विचारण्याची, आवाज उठविण्याची, विरोध करण्याची क्षमता किंवा तशी शक्यता महत्त्वाच्या संस्थांमध्ये न दिसणं ही राज्यातील मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने जास्त गंभीर बाब आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार भारतातील प्रत्येक बालकाला आठवीपर्यंतचं शिक्षण मोफत पूर्ण करता यावं, याची शासनावर सक्ती आहे. ही जबाबदारी शासन  झटकू पाहत आहे. स्वतःची छाप पाडण्यासाठी नव्या शासनाने शाळाबंदीचा प्रस्ताव मागे घ्यावा. शिक्षक व अधिकाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा भरून यंत्रणा सक्षम करावी. शिक्षकांना वर्गात मुलांबरोबर पूर्णवेळ काम करायला मिळेल, अशी व्यवस्था करावी. पाठ्यपुस्तकात कोरे कागद घालण्यासारख्या कॉस्मेटिक बाबींनी काय साध्य होणार आहे?  geetamahashabde@gmail.com

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळाGovernmentसरकार